शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल तारण योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 22:38 IST

शेतमालाची काढणी सुरू झाल्याबरोबर शेतकऱ्याकडे निघालेला माल साठवणुकीसाठी जागेचा अभाव व आर्थिक अडचण राहत असल्याने तो बाजारात विक्रीसाठी आणावा लागतो.

ठळक मुद्देसुधीर कोठारी : कृउबासतील शुभारंभ कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शेतमालाची काढणी सुरू झाल्याबरोबर शेतकऱ्याकडे निघालेला माल साठवणुकीसाठी जागेचा अभाव व आर्थिक अडचण राहत असल्याने तो बाजारात विक्रीसाठी आणावा लागतो. बाजारपेठेत शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यास भावही योग्य मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन सन १९९२ पासून बाजार समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र कृषी पणन मंडळातर्फे शेतमाल तारण कर्ज योजना राबविली जात आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे प्रतिपादन अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी केले.हिंगणघाट बाजार समितीच्या आवारात आयोजित शेतमाल तारण योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिष वडतकर, संचालक उत्तम भोयर, ओमप्रकाश डालीया, मधुकर डंभारे, मधुसुदन हरणे, अशोक उपासे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी शेतकरी रितेश तळवेकर रा. सिंदी (रेल्वे) यांचा सत्कार करण्यात आला.कृउबासचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी पुढे म्हणाले, ज्या शेतकऱ्यांना पैशाची अडचण आहे, पण माल विकायचा नाही तसेच माल साठवणुकीसाठी घरी जागेचा अभाव आहे, अशा शेतकºयांनी आपला शेतमाल वखार महामंडळाच्या गोदामामध्ये साठवणूक करावा. साठवणुकीच्या दिवशी सदर मालाचे बाजारातील दर लक्षात घेता वखार पावतीवर ७० टक्केपर्यंत बाजार समितीमार्फत तारण कर्ज अग्रीम दिल्या जाते. वखार पावतीवर बाजार समितीमार्फत दिलेले तारण कर्ज शेतकऱ्यांनी सहा महिन्याचे आत समितीला जमा केल्यास वखार महामंडळाच्या गोदाम भाड्याची अर्धी रक्कम समितीमार्फत संबंधित शेतकºयाला परत करण्यात येते. वखार महामंडळाच्या गोदामामध्ये साठवणूक केलेल्या मालाची शेतकरी स्वत: विक्री करू शकतो. तर बाजार समिती हिंगणघाट येथील गोदामात केवळ सोयाबीन या शेतमालाची साठवणूक करण्यात येत आहे. त्यावर ७० टक्के तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यात शेतकºयाला गोदाम भाडे, हमालीचा खर्च लागत नाही. तो बाजार समिती करते. शिवाय शेतमालाची विक्रीही बाजार समितीमार्फत केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला अशोक उपासे, विनोद वानखेडे, सुरेश सातोकर, बळीराम नासर, संजय तपासे, राजेश मंगेकर, सुरेश वैद्य, बापुराव महाजन, शेषकुमार येरलेकर, पंकज कोचर, राजेश कोचर, सुरेखा सायंकार, माधुरी चंदनखेडे, संजय कातरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव टी. सी. चांभारे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांनी शेतकºयांना सदर योजनेची सोप्या शब्दात माहिती दिली.