शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठ्याकरिता शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 23:31 IST

महावितरणच्यावतीने शेतीपंपाला रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत थ्रीफेज वीज पुरवठा केल्या जातो. त्यामुळे जंगली जनावरांच्या, सापांच्या भीतीने शेतीत रात्री विहिराला पाणी असूनही ओलित करावे लागत आहे.

ठळक मुद्देमंगळवारी महावितरणच्या कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : महावितरणच्यावतीने शेतीपंपाला रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत थ्रीफेज वीज पुरवठा केल्या जातो. त्यामुळे जंगली जनावरांच्या, सापांच्या भीतीने शेतीत रात्री विहिराला पाणी असूनही ओलित करावे लागत आहे. यात शेतकºयांचा जीव गेल्यास त्याची जबाबदार महावितरण घेईल काय, असे म्हणत शेतकरी संघटनांच्यावतीने मंगळवारी (५ डिसेंबर) बोरगाव मेघे येथील अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक देण्यात येणार आहे.खरीप हंगामात अतिपावसान सोयाबीन व गुलाबी बोंड अळीने कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले. रब्बी हंगामात शेतकºयांनी गहु, चना, भाजीपाला आदी पिकांची शेतात लागवड केली. रात्रीच्या वीज पुरवठ्याने शेतकरी ओलीत करू शकत नाही. जर रात्री ओलीत करताना शेतकºयांच्या किंवा शेतीत काम करणाºया मजुराच्या जीवितास हानी झाल्यास याची जबाबदारी वीज मंडळ घेणार काय? हा जाब विचारण्यासाठी व शेतकºयांची अडचण लक्षात घेवून शेतकºयांना कृषी पंपासाठी दिवसा थ्रीफेज वीजपुरवठा करावा. या मागणीसाठी वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने माजी आमदार सरोज काशीकर, शैला देशपांडे, युवा आघाडी अध्यक्ष सतीश दाणी यांच्या नेतृत्वात अधीक्षक अभियंता, कार्यालय बोरगाव(मेघे) येथे शेतकरी धडकणार आहे. या आंदोलनात सहभाग नोंदविणाºया शेतकºयांनी दुपारी १२ वाजेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा येथे एकत्र यावे असे आवाहन राज्य कार्यकारणी सदस्य मधुसुदन हरणे, जिल्हा प्रमुख उल्हास कोटंबकर, युवा आघाडी अध्यक्ष अरविंद राऊत, उपाध्यक्ष गणेश मुटे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष व जि.प. सदस्य ज्योती गजानन निकम यांनी केले आहे.