शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठ्याकरिता शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 23:31 IST

महावितरणच्यावतीने शेतीपंपाला रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत थ्रीफेज वीज पुरवठा केल्या जातो. त्यामुळे जंगली जनावरांच्या, सापांच्या भीतीने शेतीत रात्री विहिराला पाणी असूनही ओलित करावे लागत आहे.

ठळक मुद्देमंगळवारी महावितरणच्या कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : महावितरणच्यावतीने शेतीपंपाला रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत थ्रीफेज वीज पुरवठा केल्या जातो. त्यामुळे जंगली जनावरांच्या, सापांच्या भीतीने शेतीत रात्री विहिराला पाणी असूनही ओलित करावे लागत आहे. यात शेतकºयांचा जीव गेल्यास त्याची जबाबदार महावितरण घेईल काय, असे म्हणत शेतकरी संघटनांच्यावतीने मंगळवारी (५ डिसेंबर) बोरगाव मेघे येथील अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक देण्यात येणार आहे.खरीप हंगामात अतिपावसान सोयाबीन व गुलाबी बोंड अळीने कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले. रब्बी हंगामात शेतकºयांनी गहु, चना, भाजीपाला आदी पिकांची शेतात लागवड केली. रात्रीच्या वीज पुरवठ्याने शेतकरी ओलीत करू शकत नाही. जर रात्री ओलीत करताना शेतकºयांच्या किंवा शेतीत काम करणाºया मजुराच्या जीवितास हानी झाल्यास याची जबाबदारी वीज मंडळ घेणार काय? हा जाब विचारण्यासाठी व शेतकºयांची अडचण लक्षात घेवून शेतकºयांना कृषी पंपासाठी दिवसा थ्रीफेज वीजपुरवठा करावा. या मागणीसाठी वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने माजी आमदार सरोज काशीकर, शैला देशपांडे, युवा आघाडी अध्यक्ष सतीश दाणी यांच्या नेतृत्वात अधीक्षक अभियंता, कार्यालय बोरगाव(मेघे) येथे शेतकरी धडकणार आहे. या आंदोलनात सहभाग नोंदविणाºया शेतकºयांनी दुपारी १२ वाजेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा येथे एकत्र यावे असे आवाहन राज्य कार्यकारणी सदस्य मधुसुदन हरणे, जिल्हा प्रमुख उल्हास कोटंबकर, युवा आघाडी अध्यक्ष अरविंद राऊत, उपाध्यक्ष गणेश मुटे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष व जि.प. सदस्य ज्योती गजानन निकम यांनी केले आहे.