शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
3
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
4
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
5
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
6
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
7
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
8
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
9
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
10
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
11
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
12
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
13
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
14
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
15
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
16
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
17
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
18
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
19
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
20
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल

१,१३७ हेक्टरवरील शेतपिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:12 IST

प्रजासत्ताकदिनाच्या पूर्व संध्येला जिल्ह्याला वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. शिवाय जिल्ह्यातील काही भागात गारपीटही झाल्याने शेतकºयांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देअवकाळी पाऊस अन् गारपीट : घरांसह गोठ्यांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रजासत्ताकदिनाच्या पूर्व संध्येला जिल्ह्याला वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. शिवाय जिल्ह्यातील काही भागात गारपीटही झाल्याने शेतकºयांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शुक्रवार २५ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटामुळे एकूण १ हजार १३७ हेक्टरवरील गहू, हरभरा, भाजीपाला वर्गीय तसेच इतर पिकांचे नुकसान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.यंदाच्यावर्षी खरीप हंगामात सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने अनेक शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. त्यानंतर झालेल्या समाधानकारक पावसानंतर पेरणीच्या कामाला शेतकºयांनी गती दिली होती. वेळोवेळी योग्य निगा घेतल्याने तूर, कपाशी आदी पीकही बºयापैकी बहरले. सध्यास्थितीत कोरडवाहू शेतजमीनीवरील कपाशीची उलंगवाडी झाली असली तरी ओलिताच्या शेतात अद्यापही कपाशीचे पीक कायम आहे.शुक्रवार २५ जानेवारीला झालेल्या अवकाळी पावसामुळे कपाशीच्या झाडाची फुटलेली बोंड भिजल्या गेल्याने कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे. इतकेच नव्हे तर काही भागात गारपीट झाल्याने याचा चांगलाच फटका गहू व हरभरा या रबी पिकांनाही बसला आहे. तर संत्रा या पिकाचे गारपीटामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकरी सांगतात. वादळीवाऱ्यासह पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील शेतात उभे असलेल्या हरभरा आणि गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाºयांनी सर्वेक्षण करून झालेल्या नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर केला आहे. त्यात एकूण १ हजार १३७ हेक्टर शेतजमिनीवरील गहू, हरभरा, भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान झाल्याचे नमुद आहे. तर महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणात सेलू तालुक्यातील तीन गोठ्यांचे आणि एका घराचे अंशत: नुकसान झाल्याचे आणि आर्वी तालुक्यातील एका घराचे पूर्णत: नुकसान झाल्याचे नमुद करण्यात आले आहे. सदर नुकसानग्रस्तांना शासकीय मदत मिळावी, अशी अपेक्षा आहे.शेतपिकांचे वर्धा तालुक्यात सर्वाधिक नुकसानशुक्रवार २५ जानेवारीला झालेल्या वादळीवाऱ्यासह पाऊस आणि गारपीटामुळे वर्धा तालुक्यातील शेतपिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. वर्धा तालुक्यातील १६३ हेक्टर, सेलू तालुक्यातील ३७१ हेक्टर, देवळी तालुक्यातील २८५ हेक्टर तर आर्वी तालुक्यातील २१८.३० हेक्टर शेतजमिनीवरील गहू, हरभरा, भाजीपाला व इतर पिकांचे ३३ टक्केच्या आत आणि वर्धा तालुक्यातील ६५ हेक्टर व सेलू तालुक्यातील ३५ हेक्टर वरील शेतपिकांचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अभिप्राय जिल्हा प्रशासनाला कृषी विभागाने सादर केला आहे.

टॅग्स :agricultureशेती