शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

१,१३७ हेक्टरवरील शेतपिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:12 IST

प्रजासत्ताकदिनाच्या पूर्व संध्येला जिल्ह्याला वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. शिवाय जिल्ह्यातील काही भागात गारपीटही झाल्याने शेतकºयांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देअवकाळी पाऊस अन् गारपीट : घरांसह गोठ्यांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रजासत्ताकदिनाच्या पूर्व संध्येला जिल्ह्याला वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. शिवाय जिल्ह्यातील काही भागात गारपीटही झाल्याने शेतकºयांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शुक्रवार २५ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटामुळे एकूण १ हजार १३७ हेक्टरवरील गहू, हरभरा, भाजीपाला वर्गीय तसेच इतर पिकांचे नुकसान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.यंदाच्यावर्षी खरीप हंगामात सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने अनेक शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. त्यानंतर झालेल्या समाधानकारक पावसानंतर पेरणीच्या कामाला शेतकºयांनी गती दिली होती. वेळोवेळी योग्य निगा घेतल्याने तूर, कपाशी आदी पीकही बºयापैकी बहरले. सध्यास्थितीत कोरडवाहू शेतजमीनीवरील कपाशीची उलंगवाडी झाली असली तरी ओलिताच्या शेतात अद्यापही कपाशीचे पीक कायम आहे.शुक्रवार २५ जानेवारीला झालेल्या अवकाळी पावसामुळे कपाशीच्या झाडाची फुटलेली बोंड भिजल्या गेल्याने कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे. इतकेच नव्हे तर काही भागात गारपीट झाल्याने याचा चांगलाच फटका गहू व हरभरा या रबी पिकांनाही बसला आहे. तर संत्रा या पिकाचे गारपीटामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकरी सांगतात. वादळीवाऱ्यासह पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील शेतात उभे असलेल्या हरभरा आणि गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाºयांनी सर्वेक्षण करून झालेल्या नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर केला आहे. त्यात एकूण १ हजार १३७ हेक्टर शेतजमिनीवरील गहू, हरभरा, भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान झाल्याचे नमुद आहे. तर महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणात सेलू तालुक्यातील तीन गोठ्यांचे आणि एका घराचे अंशत: नुकसान झाल्याचे आणि आर्वी तालुक्यातील एका घराचे पूर्णत: नुकसान झाल्याचे नमुद करण्यात आले आहे. सदर नुकसानग्रस्तांना शासकीय मदत मिळावी, अशी अपेक्षा आहे.शेतपिकांचे वर्धा तालुक्यात सर्वाधिक नुकसानशुक्रवार २५ जानेवारीला झालेल्या वादळीवाऱ्यासह पाऊस आणि गारपीटामुळे वर्धा तालुक्यातील शेतपिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. वर्धा तालुक्यातील १६३ हेक्टर, सेलू तालुक्यातील ३७१ हेक्टर, देवळी तालुक्यातील २८५ हेक्टर तर आर्वी तालुक्यातील २१८.३० हेक्टर शेतजमिनीवरील गहू, हरभरा, भाजीपाला व इतर पिकांचे ३३ टक्केच्या आत आणि वर्धा तालुक्यातील ६५ हेक्टर व सेलू तालुक्यातील ३५ हेक्टर वरील शेतपिकांचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अभिप्राय जिल्हा प्रशासनाला कृषी विभागाने सादर केला आहे.

टॅग्स :agricultureशेती