शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

कर्जासाठी शेतकरी सावकारांच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:00 IST

कोरोना संसर्गाच्या भितीने कृषी क्षेत्राचे संपूर्ण अर्थकारण बिघडले आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून शेतीचे ‘अर्थचक्र’च लॉकडाऊन झाले आहे. त्यात शासनाच्या कर्जमाफी योजनेचे कामकाज रखडल्याने शेतकऱ्यांना यावर्षी पीककर्ज मिळाले नाही. २०२० अखेरपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांच्या नावे पीककर्ज थकबाकी असल्याने त्या शेतकऱ्यांना नवे पीककर्ज मिळाले नाही.

ठळक मुद्देजिल्ह्यातील २६ हजार नागरिकांवर ८३ कोटींचे कर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज वाटपाबाबत शासनाने बँकांना निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील बँकांनी आखडता हात घेतल्याने शेतकरी कर्जासाठी खासगी सावकारांचे उंबरठे झिजवत आहे. जिल्ह्यातील २६ हजार ९३० नागरिकांवर खासगी सावकारांचे तब्बल ८३ कोटी ८० लाख ८३ हजारांचे कर्ज आहे. सरकार केवळ कोरोनाच्या मागे लागल्याने यंदाचा खरीप हंगाम आणि पर्यायाने शेतकरीही संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत असून हे कर्ज कसे फेडावे याच विवंचनेत शेतकरी आहे.कोरोना संसर्गाच्या भितीने कृषी क्षेत्राचे संपूर्ण अर्थकारण बिघडले आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून शेतीचे ‘अर्थचक्र’च लॉकडाऊन झाले आहे. त्यात शासनाच्या कर्जमाफी योजनेचे कामकाज रखडल्याने शेतकऱ्यांना यावर्षी पीककर्ज मिळाले नाही. २०२० अखेरपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांच्या नावे पीककर्ज थकबाकी असल्याने त्या शेतकऱ्यांना नवे पीककर्ज मिळाले नाही. प्रत्येक शेतकऱ्याला तत्काळ पीककर्ज देऊ असे शासन सांगत असले तरी बहुतांश शेतकरी कर्जासाठी बँकेच्या चकरा मारीत आहे. त्यामुळे सध्या या शेतकऱ्यांकडे बि-बियाणे व खते खरेदीसाठी पैसे नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. नाईलाजास्तव शेतकरी सावकारांच्या दारी जात असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यांपूर्वी वर्धा तालुक्यात १० हजार २६१ नागरिकांकडे खासगी सावकारांचे एकूण ६ कोटी ८२ लाख १७ हजार रूपयांचे कर्ज होते. सेलू तालुक्यात ३ हजार ३०६ नागरिकांनी ३ कोटी ८ लाख ५९ हजार रूपयांचे कर्ज घेतले आहे. देवळी तालुक्यातील ६ हजार २४ नागरिकांनी खासगी सावकारांकडून ६६ कोटी १३ लाख ४ हजार रूपयांचे कर्ज घेतले. हिंगणघाट तालुक्यातील ८१९ कर्जदारांकडे १ कोटी १९ लाख ६१ हजार रुपयांचे खासगी सावकारांचे कर्ज आहे. आर्वी तालुक्यातील १९२ नागरिकांकडे ३ कोटी ७२ लाख रूपयांचे कर्ज आहे. कारंजा तालुक्यातील ३ हजार ४८९ नागरिकांकडे तीन कोटी ७२ लाख रूपयांचे कर्ज घेतल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. हातात पैसा नाही, रबीनेही खिसा गरम केला नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा सावकाराच्या दारात उभे होत असून शेतीमशागतीची कामे सुरू झाली असताना कशी करावी, याच विवंचनेत शेतकरी आहे.कागदपत्रांसाठी अडवणूकलॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना कर्ज देताना कागदपत्रांसाठी सक्ती करू नये, असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र, जिल्ह्यातील बँका शेतकऱ्यांना सातबारा, आठ अ, चतुर्सीमा, पीकपेरा, शंभर रूपयांच्या स्टॅम्पपेपरवर कर्ज नसल्याचे घोषणापत्र, आधार कार्ड, पॅनकार्ड, हैशियत दाखला, आदींसारखी कागदपत्रे मागून शेतकऱ्यांची अडवणूक करीत असल्याची माहिती आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज