शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

शेतमालाचे भाव घसरले; शेतकरी हतबल

By admin | Updated: June 16, 2014 23:40 IST

लोकसभा निवडणूक संपताच शेतमालाचे भाव वाढणार अशी आशा शेतकरी वर्गाला होती. मात्र सोयाबीन कपाशी, चणा, तूर आदी पिकांचे भाव गत काही दिवसात कोसळले आहे. पेरणीच्या तोंडावर असे झाल्याने

वायगाव(नि.) : लोकसभा निवडणूक संपताच शेतमालाचे भाव वाढणार अशी आशा शेतकरी वर्गाला होती. मात्र सोयाबीन कपाशी, चणा, तूर आदी पिकांचे भाव गत काही दिवसात कोसळले आहे. पेरणीच्या तोंडावर असे झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. आधारभूत किंमती पेक्षाही कमी भावात खरेदी केली जात असल्याने नुकसान होत आहे.केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमीदराच्या वर शेतमालाची खरेदी करणे बंधनकारक आहे. पण सर्वत्र शेतमालाचे भाव कोसळले असून ते आधारभूत किंमतीच्या खाली आले आहे. अवकाळी पावसाने शेतमालावर चांगलाच मार बसला. सोयाबीन अत्यल्प भावाने विकावे लागले. मार्च महिना संपताच सोयाबीनचे भाव झपाट्याने वाढले. ४ हजार ८०० रुपये क्विंटल पर्यंत ते पोहचले. लोकसभा निवडणुकीपर्यंत ते स्थित होते. निवडणूक संपताच ते घसरत ३ हजार ९०० ते ४ हजार पर्यंत कोसळले. पेरणीसाठी सोयाबीन घ्यायला गेल्यास शासकीय कंपनीची ३० किलोची बॅग घेण्यासाठी अंदाजे २ हजार ३०० रुपये मोजावे लागते. त्याचप्रमाणे तूर निवडणुकीदरम्यान ५ हजार रुपयांपर्यंत पोहचले होते. निवडणूक संपताच ते ३ हजार ते ३ हजार ८०० रुपये क्विंटल पर्यंत घसरले. लागवडीसाठी तूर खरेदी करताना मात्र प्रती किलो १२० ते १३० रुपये भावाने विकत घ्यावे लागत आहे. गत वर्षी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने व शासनाने चन्याची आधार भूत किंमत ३ हजार १०० रुपये केल्याने चण्याचा पेऱ्यात शेतकऱ्यांनी वाढ केली. निवडणुकीदरम्यान चना २ हजार ८०० ते ३ हजार १०० रुपयापर्यंत पोहचला निवडणूक संपताच चण्याचे भाव चांगलेच घसरून ते १ हजार ८०० ते २ हजार ३०० पर्यंत येऊन पोहचले. तसेच कापूस निवडणुकीच्या आधी ५ हजार ४०० रुपये होता. निवडणूक संपताच कापसाची किंमत ३ हजार ५०० ते ४ हजार २०० रुपयांपर्यंत येऊन पडली. वखरणी, डवरणी, तसेच बियाणे, खत व मजुरीचे दर गगणाला भिडले आहे. त्यात नैसर्गिक आपत्तीला तोड देता देता शेतकरी पुरता दमून गेला. नवा गडी नवा राज यामुळे नव्याने शासन बसल्यावर शेतमालाचे भाव वाढतील अशी आशा शेतकरी वर्गाला होती. आपले अच्छे दिन येतील असे त्याला वाटत होते. पण तसे झाले नाही. देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी पूर्णत: हालावला गेला आहे. निवडणुकीच्या आधी सर्वपक्षीय नेते शेतकऱ्यांचे हित असल्याचा दावा करीत होते. पण निवडणूक संपताच त्यांचे शब्द हवेत विरले आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. पण मशागतीला लावण्यासाठी त्याच्याकडे पैसा नाही. बँका कर्जपुरवठा करण्यास तयार नाही. त्यामुळे पैसा कसा आणि कुठून तयार करावा असा प्रश्न त्याला पडला आहे. त्यातच शेतमालाचे भाव घसरल्याने शेतकरी हतबल झाला आहे.(वार्ताहर)