शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

शेतमालाचे भाव घसरले; शेतकरी हतबल

By admin | Updated: June 16, 2014 23:40 IST

लोकसभा निवडणूक संपताच शेतमालाचे भाव वाढणार अशी आशा शेतकरी वर्गाला होती. मात्र सोयाबीन कपाशी, चणा, तूर आदी पिकांचे भाव गत काही दिवसात कोसळले आहे. पेरणीच्या तोंडावर असे झाल्याने

वायगाव(नि.) : लोकसभा निवडणूक संपताच शेतमालाचे भाव वाढणार अशी आशा शेतकरी वर्गाला होती. मात्र सोयाबीन कपाशी, चणा, तूर आदी पिकांचे भाव गत काही दिवसात कोसळले आहे. पेरणीच्या तोंडावर असे झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. आधारभूत किंमती पेक्षाही कमी भावात खरेदी केली जात असल्याने नुकसान होत आहे.केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमीदराच्या वर शेतमालाची खरेदी करणे बंधनकारक आहे. पण सर्वत्र शेतमालाचे भाव कोसळले असून ते आधारभूत किंमतीच्या खाली आले आहे. अवकाळी पावसाने शेतमालावर चांगलाच मार बसला. सोयाबीन अत्यल्प भावाने विकावे लागले. मार्च महिना संपताच सोयाबीनचे भाव झपाट्याने वाढले. ४ हजार ८०० रुपये क्विंटल पर्यंत ते पोहचले. लोकसभा निवडणुकीपर्यंत ते स्थित होते. निवडणूक संपताच ते घसरत ३ हजार ९०० ते ४ हजार पर्यंत कोसळले. पेरणीसाठी सोयाबीन घ्यायला गेल्यास शासकीय कंपनीची ३० किलोची बॅग घेण्यासाठी अंदाजे २ हजार ३०० रुपये मोजावे लागते. त्याचप्रमाणे तूर निवडणुकीदरम्यान ५ हजार रुपयांपर्यंत पोहचले होते. निवडणूक संपताच ते ३ हजार ते ३ हजार ८०० रुपये क्विंटल पर्यंत घसरले. लागवडीसाठी तूर खरेदी करताना मात्र प्रती किलो १२० ते १३० रुपये भावाने विकत घ्यावे लागत आहे. गत वर्षी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने व शासनाने चन्याची आधार भूत किंमत ३ हजार १०० रुपये केल्याने चण्याचा पेऱ्यात शेतकऱ्यांनी वाढ केली. निवडणुकीदरम्यान चना २ हजार ८०० ते ३ हजार १०० रुपयापर्यंत पोहचला निवडणूक संपताच चण्याचे भाव चांगलेच घसरून ते १ हजार ८०० ते २ हजार ३०० पर्यंत येऊन पोहचले. तसेच कापूस निवडणुकीच्या आधी ५ हजार ४०० रुपये होता. निवडणूक संपताच कापसाची किंमत ३ हजार ५०० ते ४ हजार २०० रुपयांपर्यंत येऊन पडली. वखरणी, डवरणी, तसेच बियाणे, खत व मजुरीचे दर गगणाला भिडले आहे. त्यात नैसर्गिक आपत्तीला तोड देता देता शेतकरी पुरता दमून गेला. नवा गडी नवा राज यामुळे नव्याने शासन बसल्यावर शेतमालाचे भाव वाढतील अशी आशा शेतकरी वर्गाला होती. आपले अच्छे दिन येतील असे त्याला वाटत होते. पण तसे झाले नाही. देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी पूर्णत: हालावला गेला आहे. निवडणुकीच्या आधी सर्वपक्षीय नेते शेतकऱ्यांचे हित असल्याचा दावा करीत होते. पण निवडणूक संपताच त्यांचे शब्द हवेत विरले आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. पण मशागतीला लावण्यासाठी त्याच्याकडे पैसा नाही. बँका कर्जपुरवठा करण्यास तयार नाही. त्यामुळे पैसा कसा आणि कुठून तयार करावा असा प्रश्न त्याला पडला आहे. त्यातच शेतमालाचे भाव घसरल्याने शेतकरी हतबल झाला आहे.(वार्ताहर)