शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

जिल्ह्यात ५०० वर तळ्यांची नोंद

By admin | Updated: March 20, 2016 02:14 IST

मागेल त्याला शेततळे योजनेत आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी तहसील कार्यालयात आयोजित शेततळे ...

मागेल त्याला शेततळे योजना : हिंगणघाट, समुद्रपूर, आष्टी तालुक्याची आघाडीवर्धा : मागेल त्याला शेततळे योजनेत आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी तहसील कार्यालयात आयोजित शेततळे नोंदणी शिबिरास जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. महसूल व कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. शनिवारी आयोजित शिबिरात दुपारपर्यंत सुमारे ५०० शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.शेततळ्यांच्या माध्यमातून पिकांना संरक्षित सिंचन देण्यासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी, तसेच उत्पादन वाढण्यासोबतच पावसाचा खंड पडल्यास पिकांना जीवनदान मिळावे म्हणून शेततळे ही संकल्पना अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे शासनाने शेततळे बांधकामासाठी ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार शेततळे मिळणार असून अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बॅँक खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना असल्याने तालुकास्तरावर दोन दिवसांचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिली. मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या देवळी तहसील कार्यालयातील शिबिराला जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेततळे योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. देवळी तालुक्यातील १५० गावांत ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी महसूल व कृषी विभागातर्फे ग्रामपंचायतस्तरावर विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. चोंडी येथील शेतकरी दिनेश लोहबे यांनी शेततळ्यासाठी सर्वप्रथम अर्ज सादर करून या विशेष अभियानाचा शुभारंभ केला. लोहबे या शेतकऱ्याकडे सात हेक्टर जमीन असून कापूस, सोयाबीन व तूर ही पिके ते घेतात. यामुळे कापूस व सोयाबीनसाठी संरक्षित सिंचनाच्या दृष्टीने शेततळी बांधण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. सोबतच उत्तम डिघोळे, मंगेश येंडे, अंबादास येंडे, माणिक काळे, दिलीप कैलुके, विजय कैलुके आदी शेतकऱ्यांनीही शेततळ्यांसाठी अर्ज केले आहेत. शेततळे योजनेच्या विशेष शिबिरामध्ये शनिवारी दुपारपर्यंत हिंगणघाट येथे सर्वाधिक १०३ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले. समुद्रपूर येथे ८६, आष्टी ५० तसेच कारंजा, आर्वी, सेलू आणि वर्धा तालुक्यात ३० ते ४० शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी मागणी अर्ज सादर केले आहेत. सायंकाळपर्यंत या शिबिरांमध्ये शेतकऱ्यांनी आपली मागणी नोंदविली असून रविवारी (दि.२०) सकाळी १० ते सायंकाळपर्यंत शिबिराच्या माध्यमातून नोंदणी करण्यात येणार आहे. अनियमित पावसामुळे पिकांचे नुकसान रोखण्यास शेततळे उपयोगी ठरणार आहेत. यामुळे या योजनेमध्ये जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी होत शेततळ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)विशेष शिबिरांना शेतकऱ्यांचा प्रतिसादशासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना सबंध राज्यात लागू केली आहे. या योजनेसाठी जिल्हाभर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत असून ५०० वर शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यात सर्वाधिक अर्ज हिंगणघाट, आष्टी आणि समुद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केले आहेत. कारंजा, आर्वी, सेलू आणि वर्धा तालुक्यातील शेतकऱ्यांकडूनही शेततळ्यांसाठी अर्ज करून नोंदणी केली जात असल्याचे सांगण्यात आले.विदर्भात अनियमित पावसामुळे गत काही वर्षांपासून कापूस, सोयाबीन पिकांचे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्याकरिता शेततळे उपयोगी पडणार आहेत. यामुळेही जिल्ह्यातील शेतकरी शेततळे योजनेचा ला घेण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे दिसून येते.