शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५०० वर तळ्यांची नोंद

By admin | Updated: March 20, 2016 02:14 IST

मागेल त्याला शेततळे योजनेत आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी तहसील कार्यालयात आयोजित शेततळे ...

मागेल त्याला शेततळे योजना : हिंगणघाट, समुद्रपूर, आष्टी तालुक्याची आघाडीवर्धा : मागेल त्याला शेततळे योजनेत आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी तहसील कार्यालयात आयोजित शेततळे नोंदणी शिबिरास जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. महसूल व कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. शनिवारी आयोजित शिबिरात दुपारपर्यंत सुमारे ५०० शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.शेततळ्यांच्या माध्यमातून पिकांना संरक्षित सिंचन देण्यासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी, तसेच उत्पादन वाढण्यासोबतच पावसाचा खंड पडल्यास पिकांना जीवनदान मिळावे म्हणून शेततळे ही संकल्पना अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे शासनाने शेततळे बांधकामासाठी ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार शेततळे मिळणार असून अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बॅँक खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना असल्याने तालुकास्तरावर दोन दिवसांचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिली. मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या देवळी तहसील कार्यालयातील शिबिराला जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेततळे योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. देवळी तालुक्यातील १५० गावांत ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी महसूल व कृषी विभागातर्फे ग्रामपंचायतस्तरावर विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. चोंडी येथील शेतकरी दिनेश लोहबे यांनी शेततळ्यासाठी सर्वप्रथम अर्ज सादर करून या विशेष अभियानाचा शुभारंभ केला. लोहबे या शेतकऱ्याकडे सात हेक्टर जमीन असून कापूस, सोयाबीन व तूर ही पिके ते घेतात. यामुळे कापूस व सोयाबीनसाठी संरक्षित सिंचनाच्या दृष्टीने शेततळी बांधण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. सोबतच उत्तम डिघोळे, मंगेश येंडे, अंबादास येंडे, माणिक काळे, दिलीप कैलुके, विजय कैलुके आदी शेतकऱ्यांनीही शेततळ्यांसाठी अर्ज केले आहेत. शेततळे योजनेच्या विशेष शिबिरामध्ये शनिवारी दुपारपर्यंत हिंगणघाट येथे सर्वाधिक १०३ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले. समुद्रपूर येथे ८६, आष्टी ५० तसेच कारंजा, आर्वी, सेलू आणि वर्धा तालुक्यात ३० ते ४० शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी मागणी अर्ज सादर केले आहेत. सायंकाळपर्यंत या शिबिरांमध्ये शेतकऱ्यांनी आपली मागणी नोंदविली असून रविवारी (दि.२०) सकाळी १० ते सायंकाळपर्यंत शिबिराच्या माध्यमातून नोंदणी करण्यात येणार आहे. अनियमित पावसामुळे पिकांचे नुकसान रोखण्यास शेततळे उपयोगी ठरणार आहेत. यामुळे या योजनेमध्ये जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी होत शेततळ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)विशेष शिबिरांना शेतकऱ्यांचा प्रतिसादशासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना सबंध राज्यात लागू केली आहे. या योजनेसाठी जिल्हाभर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत असून ५०० वर शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यात सर्वाधिक अर्ज हिंगणघाट, आष्टी आणि समुद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केले आहेत. कारंजा, आर्वी, सेलू आणि वर्धा तालुक्यातील शेतकऱ्यांकडूनही शेततळ्यांसाठी अर्ज करून नोंदणी केली जात असल्याचे सांगण्यात आले.विदर्भात अनियमित पावसामुळे गत काही वर्षांपासून कापूस, सोयाबीन पिकांचे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्याकरिता शेततळे उपयोगी पडणार आहेत. यामुळेही जिल्ह्यातील शेतकरी शेततळे योजनेचा ला घेण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे दिसून येते.