शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

न्यायासाठी सहपरिवार बेमुदत उपोषण

By admin | Updated: December 3, 2015 02:26 IST

न्यायालयीन प्रकरणाचा निकाल लागून दीड वर्षाचा कालावधी लोटला; पण त्यांना कामावर रूजू करून घेतले नाही.

सहायक शिक्षकाचे आंदोलन : न्यायालयाच्या निर्वाळ्यानंतरही फरफट सुरूचवर्धा : न्यायालयीन प्रकरणाचा निकाल लागून दीड वर्षाचा कालावधी लोटला; पण त्यांना कामावर रूजू करून घेतले नाही. यामुळे कृषक विद्यालयातील पंजाब शेंडे या सहायक शिक्षकाने परिवारासह शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर १६ नोव्हेंबरपासून ठिय्या आंदोलन सुरू केले. शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी आश्वासन व पोलिसांत तक्रार देत आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले. या घटनेस १५ दिवस लोटले असताना त्यांना कामावर घेतले नाही. यामुळे शेंडे यांनी पुन्हा मंगळवारपासून जि.प. समोर परिवारासह उपोषणास सुरुवात केली आहे.स्थानिक कृषक विद्यालयात सहायक शिक्षक म्हणून कार्यरत पंजाब जगन्नाथ शेंडे यांनी ५ डिसेंबर २००६ रोजी जि.प. च्या तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयाने बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक केली, अशी तक्रार केली. यात नोकरीची मान्यता रद्द करीत फौजदारी कारवाई करण्यात आली. शिवाय शेंडे यांची शिक्षक पदाची मान्यता रद्द करा, अन्यथा तुमच्या शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल, असा दबावही संस्था चालकावर आणला. परिणामी, सदर शिक्षकाला नोकरीपासून वंचित व्हावे लागले. या प्रकरणी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांना शेंडे यांच्या विरूद्ध पुरावा म्हणून कुठलीही कागदपत्रे न्यायालयात सादर करता आली नाही. परिणामी, न्यायालयाने शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या कारभारावरच ताशेरे ओढत शेंडे यांच्या बाजूने या प्रकरणाचा निकाल दिला. या निर्णयाला तब्बल दीड वर्षाचा कालावधी लोटला; पण अद्याप शिक्षणाधिकारी कार्यालयाने त्यांना रूजू करून घेण्याचे आदेश दिले नाही. यामुळे त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.निर्दोषत्व सिध्द होऊनही टाळाटाळवर्धा : कामावर पूर्ववत रुजू करून घेण्यासाठी त्यांनी अनेकदा अर्ज, विनंती केली. कार्यालयात चकरा मारल्या, परंतु त्यांना न्याय मिळाला नाही. न्यायालयातून त्यांचे निर्दोषत्व सिद्ध होऊनही नोकरी न मिळाल्याने शेंडे कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे जि. प. शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर चकरा मारून थकलेल्या शेंडे यांनी परिवारासह बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा शिक्षण विभागाला दिला होता. यावर शिक्षण विभागाने कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे १६ नोव्हेंबर रोजी शेंडे आपल्या कुटुंबियांसह शिक्षण विभागासमोर उपोषणाला बसले. त्यावेळी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी आश्वासन देत लवकर कामावर पूर्ववत रुजू करण्यात येणार असल्याचे सांगितले. तरीही शेंडे कुटुंबीय आंदोलन मागे घेण्यास तयार नसल्याने शिक्षणाधिकारी यांनी ठाणेदार मगर यांच्या दबावाने आंदोलन मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप शेंडे यांनी केला. त्यालाही आता पंधरा दिवस लोटले असून अद्याप कामावर रुजू करण्याची कुठलीही कारवाई न केल्याने सोमवारपासून पुन्हा शेंडे परिवाराने जि. प. समोर ठिय्या आंदोलन सुरू केले.(शहर प्रतिनिधी)