शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

न्यायासाठी सहपरिवार बेमुदत उपोषण

By admin | Updated: December 3, 2015 02:26 IST

न्यायालयीन प्रकरणाचा निकाल लागून दीड वर्षाचा कालावधी लोटला; पण त्यांना कामावर रूजू करून घेतले नाही.

सहायक शिक्षकाचे आंदोलन : न्यायालयाच्या निर्वाळ्यानंतरही फरफट सुरूचवर्धा : न्यायालयीन प्रकरणाचा निकाल लागून दीड वर्षाचा कालावधी लोटला; पण त्यांना कामावर रूजू करून घेतले नाही. यामुळे कृषक विद्यालयातील पंजाब शेंडे या सहायक शिक्षकाने परिवारासह शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर १६ नोव्हेंबरपासून ठिय्या आंदोलन सुरू केले. शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी आश्वासन व पोलिसांत तक्रार देत आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले. या घटनेस १५ दिवस लोटले असताना त्यांना कामावर घेतले नाही. यामुळे शेंडे यांनी पुन्हा मंगळवारपासून जि.प. समोर परिवारासह उपोषणास सुरुवात केली आहे.स्थानिक कृषक विद्यालयात सहायक शिक्षक म्हणून कार्यरत पंजाब जगन्नाथ शेंडे यांनी ५ डिसेंबर २००६ रोजी जि.प. च्या तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयाने बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक केली, अशी तक्रार केली. यात नोकरीची मान्यता रद्द करीत फौजदारी कारवाई करण्यात आली. शिवाय शेंडे यांची शिक्षक पदाची मान्यता रद्द करा, अन्यथा तुमच्या शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल, असा दबावही संस्था चालकावर आणला. परिणामी, सदर शिक्षकाला नोकरीपासून वंचित व्हावे लागले. या प्रकरणी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांना शेंडे यांच्या विरूद्ध पुरावा म्हणून कुठलीही कागदपत्रे न्यायालयात सादर करता आली नाही. परिणामी, न्यायालयाने शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या कारभारावरच ताशेरे ओढत शेंडे यांच्या बाजूने या प्रकरणाचा निकाल दिला. या निर्णयाला तब्बल दीड वर्षाचा कालावधी लोटला; पण अद्याप शिक्षणाधिकारी कार्यालयाने त्यांना रूजू करून घेण्याचे आदेश दिले नाही. यामुळे त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.निर्दोषत्व सिध्द होऊनही टाळाटाळवर्धा : कामावर पूर्ववत रुजू करून घेण्यासाठी त्यांनी अनेकदा अर्ज, विनंती केली. कार्यालयात चकरा मारल्या, परंतु त्यांना न्याय मिळाला नाही. न्यायालयातून त्यांचे निर्दोषत्व सिद्ध होऊनही नोकरी न मिळाल्याने शेंडे कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे जि. प. शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर चकरा मारून थकलेल्या शेंडे यांनी परिवारासह बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा शिक्षण विभागाला दिला होता. यावर शिक्षण विभागाने कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे १६ नोव्हेंबर रोजी शेंडे आपल्या कुटुंबियांसह शिक्षण विभागासमोर उपोषणाला बसले. त्यावेळी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी आश्वासन देत लवकर कामावर पूर्ववत रुजू करण्यात येणार असल्याचे सांगितले. तरीही शेंडे कुटुंबीय आंदोलन मागे घेण्यास तयार नसल्याने शिक्षणाधिकारी यांनी ठाणेदार मगर यांच्या दबावाने आंदोलन मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप शेंडे यांनी केला. त्यालाही आता पंधरा दिवस लोटले असून अद्याप कामावर रुजू करण्याची कुठलीही कारवाई न केल्याने सोमवारपासून पुन्हा शेंडे परिवाराने जि. प. समोर ठिय्या आंदोलन सुरू केले.(शहर प्रतिनिधी)