शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

गंभीर गुन्ह्यांच्या तपासात समुद्रपूर पोलिसांना अपयश

By admin | Updated: July 6, 2017 01:26 IST

गतकाही महिन्यांत समुद्रपूर पोलीस ठाण्यांंतर्गत चोऱ्या, गोळीबार यासारख्या गंभीर घटना घडल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क समुद्रपूर : गतकाही महिन्यांत समुद्रपूर पोलीस ठाण्यांंतर्गत चोऱ्या, गोळीबार यासारख्या गंभीर घटना घडल्या आहेत. मात्र या गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलीस अपयशी ठरले. मे महिन्यात धुमनखेडा व बेलघाट येथे शंकर बोरेकर यांच्या घरी चोरी झाली. या चोरीत १८,५०० रुपयांचा ऐवज पळविला तर जून महिन्यात मेनखात येथे मोहन मंगरुळकर यांच्या घरी १.५० लाख रुपयांची चोरी झाली. कोल्ही येथे शफात अहमद पटेल व त्यांच्या जावयाच्या घरून रोख १ लाख व दागिने असा १.८३ लाखाचा ऐवज लंपास केला. ग्रामीण भागातील वाढती बेरोजगारी, दुष्काळी स्थिती यासारखी कारणे वाढत्या चोऱ्यांमागे असावे असे बोलले जाते. यामुळे सर्वसामान्यांचे जीवन असुरक्षित होत असून ते दहशतीखाली वावरत आहे. येथे कार्यरत ठाणेदार रणजीतसिंग चव्हाण यांना लाचलुचपत विभागाने १.२५ लाखांची लाच घेतांना पकडले होते. या कृतीमुळे पोलिसांवरील विश्वासनियता कमी झाल्याने नव्या ठाणेदारांपुढे मोठे आव्हान आहे.