शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

चाऱ्यासाठी आता वैरणपेरणीकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 22:30 IST

शासनाचे सोयाबीन हितार्थ धोरण शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडले आणि ज्वारी पीक शेतशिवारातून हद्दपार झाले. आता जनावरांसाठी कड्याळू व चाऱ्याची ज्वारी पेरण्याचा प्रसंग शेतकऱ्यांवर ओढवला आहे.

ठळक मुद्देयंत्रामुळे होते भुकटी : ज्वारी पीक शेतशिवारातून हद्दपार

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : शासनाचे सोयाबीन हितार्थ धोरण शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडले आणि ज्वारी पीक शेतशिवारातून हद्दपार झाले. आता जनावरांसाठी कड्याळू व चाऱ्याची ज्वारी पेरण्याचा प्रसंग शेतकऱ्यांवर ओढवला आहे.विदर्भात नगदी पीक कापूस तर उदरनिर्वाहासाठी ज्वारी, बाजरी, गहू आणि अन्य कडधान्य शेतकरी शेतात पिकवीत होते. कापसाच्या व्यवहारातून घर बांधणे, लग्नप्रसंग आदी कार्यासाठी तरतुदी शेतकरी करीत होते. धान्यातून शेतीव्यवहार आणि खाद्य म्हणून उपयोग प्रत्येक शेतकरी करीत असत.प्रत्येक शेतकऱ्यांकडे बैलजोडी आणि गायी राहत असत. त्यांच्यासाठी वैरण म्हणून कडबा, कुटार व गव्हाचा गवंडा अशी व्यवस्था असल्याने शेतकरी आनंदाने जीवन जगत होता. शेतीव्यवस्थेतून मानवी जीवनशैली आत्मसात केल्यानेच शेतकरी खऱ्या सुखात नांदत होता.शासनाने सोयाबीन आणले, बाजाराधीन व्यवस्था निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचा खिसा रिकामा व्हायला लागला.ज्वारीसोबत जनावरे गेली. यांत्रिक शेती जीवावर बेतणारी ठरू लागली. असे असले तरी बहुतांश शेतकऱ्यांचा कल नवनवीन तंत्रज्ञानाकडे असल्याचेच दिसून येत आहे. सोयाबीन पिकामुळे ज्याप्रमाणे ज्वारीचे पीक मागे पडले, तर यंत्राच्या साहाय्याने पिकांची काढणी केली जात असल्याने गुरांचा चारा मिळेनासा झाला आहे. यंत्राच्या साहाय्याने काढणी करीत असताना केवळ बारीक भुकटी शिल्लक राहते. ते गुरे खाऊ शकत नसल्याने दुसऱ्या चाऱ्याची व्यवस्था करावी लागते.यावरच पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी सध्या कड्याळू आणि चाऱ्याच्या लागवडीवर भर दिला आहे. बहुतांश शेतामध्ये गुरांच्या चाऱ्यासाठी कड्याळू व चाऱ्याची ज्वारीचे पीक दिसून येत आहे. हा हिरवा चारा गुरांकरिता उपयुक्त असला तरी तो चारण्याचेही तंत्रज्ञान आहे. ते शेतकऱ्यांना आत्मसात करावे लागणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती