शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
2
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
3
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
4
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
5
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
6
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
7
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
8
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
11
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
12
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
13
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
14
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
15
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
16
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
17
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
18
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
19
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
20
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
Daily Top 2Weekly Top 5

चाऱ्यासाठी आता वैरणपेरणीकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 22:30 IST

शासनाचे सोयाबीन हितार्थ धोरण शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडले आणि ज्वारी पीक शेतशिवारातून हद्दपार झाले. आता जनावरांसाठी कड्याळू व चाऱ्याची ज्वारी पेरण्याचा प्रसंग शेतकऱ्यांवर ओढवला आहे.

ठळक मुद्देयंत्रामुळे होते भुकटी : ज्वारी पीक शेतशिवारातून हद्दपार

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : शासनाचे सोयाबीन हितार्थ धोरण शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडले आणि ज्वारी पीक शेतशिवारातून हद्दपार झाले. आता जनावरांसाठी कड्याळू व चाऱ्याची ज्वारी पेरण्याचा प्रसंग शेतकऱ्यांवर ओढवला आहे.विदर्भात नगदी पीक कापूस तर उदरनिर्वाहासाठी ज्वारी, बाजरी, गहू आणि अन्य कडधान्य शेतकरी शेतात पिकवीत होते. कापसाच्या व्यवहारातून घर बांधणे, लग्नप्रसंग आदी कार्यासाठी तरतुदी शेतकरी करीत होते. धान्यातून शेतीव्यवहार आणि खाद्य म्हणून उपयोग प्रत्येक शेतकरी करीत असत.प्रत्येक शेतकऱ्यांकडे बैलजोडी आणि गायी राहत असत. त्यांच्यासाठी वैरण म्हणून कडबा, कुटार व गव्हाचा गवंडा अशी व्यवस्था असल्याने शेतकरी आनंदाने जीवन जगत होता. शेतीव्यवस्थेतून मानवी जीवनशैली आत्मसात केल्यानेच शेतकरी खऱ्या सुखात नांदत होता.शासनाने सोयाबीन आणले, बाजाराधीन व्यवस्था निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचा खिसा रिकामा व्हायला लागला.ज्वारीसोबत जनावरे गेली. यांत्रिक शेती जीवावर बेतणारी ठरू लागली. असे असले तरी बहुतांश शेतकऱ्यांचा कल नवनवीन तंत्रज्ञानाकडे असल्याचेच दिसून येत आहे. सोयाबीन पिकामुळे ज्याप्रमाणे ज्वारीचे पीक मागे पडले, तर यंत्राच्या साहाय्याने पिकांची काढणी केली जात असल्याने गुरांचा चारा मिळेनासा झाला आहे. यंत्राच्या साहाय्याने काढणी करीत असताना केवळ बारीक भुकटी शिल्लक राहते. ते गुरे खाऊ शकत नसल्याने दुसऱ्या चाऱ्याची व्यवस्था करावी लागते.यावरच पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी सध्या कड्याळू आणि चाऱ्याच्या लागवडीवर भर दिला आहे. बहुतांश शेतामध्ये गुरांच्या चाऱ्यासाठी कड्याळू व चाऱ्याची ज्वारीचे पीक दिसून येत आहे. हा हिरवा चारा गुरांकरिता उपयुक्त असला तरी तो चारण्याचेही तंत्रज्ञान आहे. ते शेतकऱ्यांना आत्मसात करावे लागणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती