शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

दुष्काळातही रस्ता कामांवर पाण्याचा मुबलक वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 21:35 IST

वर्धा जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाईचे संकट तीव्र झाले आहे. नद्या आटल्यामुळे वर्धा शहरासह परिसरातील ११ गावांना पाच ते सात दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो, तर दुसरीकडे शहरात सुरू असलेल्या सीमेंट रस्ता बांधकामांवर मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर केला जात आहे.

ठळक मुद्देवर्धा शहरातील वास्तव : शहरी, ग्रामीण नागरिक तहानलेले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाईचे संकट तीव्र झाले आहे. नद्या आटल्यामुळे वर्धा शहरासह परिसरातील ११ गावांना पाच ते सात दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो, तर दुसरीकडे शहरात सुरू असलेल्या सीमेंट रस्ता बांधकामांवर मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर केला जात आहे. टॅँकरद्वारे पाणी आणून ते रस्त्याच्या कामात तयार करण्यात आलेल्या आळ्यांमध्ये टाकले जात आहे. एकट्या वर्धा शहरात ही परिस्थिती नाही, तर राष्ट्रीय महामार्गावरही जेथे-जेथे काम सुरू आहे, तेथे-तेथे असेच मुबलक पाणी वापरले जात आहे. शहर परिसरातील नागरिक पाण्यापासून वंचित असताना विकासकामांवर पाणी वापरण्याचा अट्टहास का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.वर्धा शहरातील सिव्हिल लाईन भागात शासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची निवासस्थान आहेत. या मार्गावर असलेल्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सध्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या कामावर मुबलक प्रमाणात पाणी टाकले जात आहे. या पाणी वापरासाठी पाईपलाईनही लावण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने वर्धा शहरासह नालवाडी, साटोडा, सिंदी (मेघे), बोरगाव (मेघे), उमरी (मेघे), आदी भागांत पाणी कपात करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र आहे.पाणी वापरावर हवी बंधनेदुष्काळी परिस्थिती उद्भवल्यास पाण्याच्या उपस्यावर तसेच त्याच्या गैरवापरावर बंधने घातली जातात. जिल्ह्याधिकाऱ्यांना याबाबतचे अधिकार आहे. मात्र, वर्धा शहरासह परिसरातील ग्रामीण भागात अनेक नागरिक आपल्या घरातील बोअरवेलचे पाणी सकाळी व सायंकाळी अंगणात शिंपतात, गाड्या धुतात, काहींनी तर कॅनमध्ये पाणी भरून ते विक्री करण्यासाठी पाठविण्याचा धंदाही सुरू केला आहे. या प्रकारावर जिल्हा प्रशासनाचे मात्र नियंत्रण नाही. ग्रामपंचायत प्रशासन निवडणूक कामात व्यस्त झाले आहे.