शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
2
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
3
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
4
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
5
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
6
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
7
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
8
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
9
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
10
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
11
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
12
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
13
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
14
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
15
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
16
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
17
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
18
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
19
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
20
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळातही रस्ता कामांवर पाण्याचा मुबलक वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 21:35 IST

वर्धा जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाईचे संकट तीव्र झाले आहे. नद्या आटल्यामुळे वर्धा शहरासह परिसरातील ११ गावांना पाच ते सात दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो, तर दुसरीकडे शहरात सुरू असलेल्या सीमेंट रस्ता बांधकामांवर मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर केला जात आहे.

ठळक मुद्देवर्धा शहरातील वास्तव : शहरी, ग्रामीण नागरिक तहानलेले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाईचे संकट तीव्र झाले आहे. नद्या आटल्यामुळे वर्धा शहरासह परिसरातील ११ गावांना पाच ते सात दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो, तर दुसरीकडे शहरात सुरू असलेल्या सीमेंट रस्ता बांधकामांवर मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर केला जात आहे. टॅँकरद्वारे पाणी आणून ते रस्त्याच्या कामात तयार करण्यात आलेल्या आळ्यांमध्ये टाकले जात आहे. एकट्या वर्धा शहरात ही परिस्थिती नाही, तर राष्ट्रीय महामार्गावरही जेथे-जेथे काम सुरू आहे, तेथे-तेथे असेच मुबलक पाणी वापरले जात आहे. शहर परिसरातील नागरिक पाण्यापासून वंचित असताना विकासकामांवर पाणी वापरण्याचा अट्टहास का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.वर्धा शहरातील सिव्हिल लाईन भागात शासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची निवासस्थान आहेत. या मार्गावर असलेल्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सध्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या कामावर मुबलक प्रमाणात पाणी टाकले जात आहे. या पाणी वापरासाठी पाईपलाईनही लावण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने वर्धा शहरासह नालवाडी, साटोडा, सिंदी (मेघे), बोरगाव (मेघे), उमरी (मेघे), आदी भागांत पाणी कपात करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र आहे.पाणी वापरावर हवी बंधनेदुष्काळी परिस्थिती उद्भवल्यास पाण्याच्या उपस्यावर तसेच त्याच्या गैरवापरावर बंधने घातली जातात. जिल्ह्याधिकाऱ्यांना याबाबतचे अधिकार आहे. मात्र, वर्धा शहरासह परिसरातील ग्रामीण भागात अनेक नागरिक आपल्या घरातील बोअरवेलचे पाणी सकाळी व सायंकाळी अंगणात शिंपतात, गाड्या धुतात, काहींनी तर कॅनमध्ये पाणी भरून ते विक्री करण्यासाठी पाठविण्याचा धंदाही सुरू केला आहे. या प्रकारावर जिल्हा प्रशासनाचे मात्र नियंत्रण नाही. ग्रामपंचायत प्रशासन निवडणूक कामात व्यस्त झाले आहे.