शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

हिंगणघाट कृउबा समिती संचालक मंडळाला मुदतवाढ

By admin | Updated: April 6, 2016 02:18 IST

दुष्काळाच्या कारणाने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.

सभापतींच्या याचिकेवर निर्णय : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश हिंगणघाट : दुष्काळाच्या कारणाने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान, संचालक मंडळाचा काळ संपत असल्याने अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी शासनाच्या आदेशाला न्यायालयात आव्हान दिले होते. यावर नवी निवडणूक होईपर्यंत विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यात आल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिला आहे. समितीच्या संचालक मंडळाची मुदत ७ एप्रील पर्यंत होती. त्यापूर्वी निवडणुका होणे आवश्यक असताना जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक घेण्यास विलंब झाला. त्यामुळे मंत्रालयाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या २३ मार्च २०१६ च्या अधिसूचनेनुसार ७ एप्रिलपासून पुढे सहा महिन्यांकरिता समितीच्या निवडणुकीला मुदतवाढ देण्यात आली. या आदेशात मुदतवाढ दुष्काळग्रस्त परिस्थितीने देण्यात आल्याचे नमुद करण्यात आले होते. या आदेशाविरोधात अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठात याचीका दाखल केली होती. त्यांनी तातडीने निवडणुका घेण्याची तसेच तोपर्यंत विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याची मागणी लावून धरली. १ सप्टेंबर २०१५ पासून संचालक मंडळाच्या निवडणुकीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करून जवळपास १५ स्मरणपत्रे दिल्याचे अ‍ॅड. कोठारी यांनी न्यायालयात सांगितले. तरीही वेळेवर निवडणुका लागल्या नाही. अशा स्थितीत संचालक मंडळाला निवडणुकीपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती; परंतु शासनाने निवडणुकीला मुदतवाढ देवून संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याचा मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अ‍ॅड. कोठारी यांच्यावतीने अ‍ॅड. अंजन डे व बाजार समितीच्यावतीने अ‍ॅड. व्हीक्टन बस्टीन यांनी बाजू मांडताना निवडणूक घेण्यास संचालक मंडळ दोषी नसल्याने निवडणुकीपर्यंत त्या संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यात आल्याचे अनेक दाखले सादर केले. तसेच यापूर्वी धामनगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाला गतवर्षी मुदतवाढ मिळण्याची बाब न्यायालयासमोर मांडली. यावर शासनाच्यावतीने अ‍ॅड. भारती डांगरे यांनी बाजु मांडून संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याची बाब मान्य केली. सदर याचीका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती वासंती नाईक व न्यायमूर्ती देशपांडे यांनी निकाली काढली.(तालुका प्रतिनिधी)