शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजनेला मुदत वाढ

By admin | Updated: November 10, 2014 22:48 IST

हवामानावर आधारित कृषी विभागाच्या पीक विमा योजनेला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी ही मुदत ३१ आॅक्टोबरपर्यंतच होती. रब्बीची तालुक्यातील पेरणी आटोपत असून

आर्वी : हवामानावर आधारित कृषी विभागाच्या पीक विमा योजनेला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी ही मुदत ३१ आॅक्टोबरपर्यंतच होती. रब्बीची तालुक्यातील पेरणी आटोपत असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम लांबणीवर पडला. त्यात पावसाने दडी मारल्याने अपेक्षित उत्पादन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हाती लागल्याच्या आशा मावळल्या. तसेच उरलेल्या शेतातील सोयाबीन पीक कापणीला होणाऱ्या उत्पादनापेक्षा अधिक खर्च येत असल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन तसेच शेतात जनावरांसाठी सोडून रबी हंगामाची तयारी सुरू केली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रबी हंगाम पेरणीला प्रारंभ झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. हवामानावर आधारित पीक विमा योजनेंतर्गत दरवर्षी गहू, हरभरा पिकाची निवड केली जाते. परंतू यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप व रबी पिकाच्या पेरणीचा घोळ झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित पीक झाले नाही. नोव्हेंबर महिना उजाडला तरी खरीप हंगामाचे पीक घरी न आल्याने पुढच्या रबी पिकाची पेरणी कशी करावी या विवंचनेत तालुक्यातील शेतकरी सापडला आहे. दरवर्षी साधारण: दिवाळीपूर्वी रबीतील गहू व हरभरा पिकाची ५० टक्के पेरणी शेतकरी आटोपत असते. परंतू यावर्षी मात्र दिवाळी उलटून दहा दिवस झाले तरी रब्बी हंगामाची शेत मशागतीची कामे झालेले नाही. रब्बी हंगामाची शेत मशागतीची कामे आता सुरू झाली असून नोव्हेंबरचा पहिला आठवडा सुरू झाला आहे. अद्याप रबी हंगामातील गहू व हरभरा पीक पेरणीला प्रारंभ झाला नाही. केवळ मशागतीचे काम झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरीप पिकांची कापणी केली नाही. अनेक शेतात मशागतीचे काम सुरू असल्याचे एकूण चित्र आहे. रबी पिकांना व तुरीला अपेक्षित असणारी थंडी ही सुरू न झाल्याने या हंगामाची सर्व कामे संथगतीने सुरू आहे. यात या उशिरा पेरणी प्रारंभामुळे रबी हंगामातील पीक विमा योजनेला कृषी विभागाने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ घेता यावा यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच याचा फायदा होईल. नोव्हेंबर महिन्यात रबीची १५ ते २० टक्के पेरणी आटोपून जाते. मात्र यावर्षी तालुक्यातील निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने रब्बी हंगामासाठी आर्थिक जुळवाजुळव सुरू आहे. नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा सुरू झाला असूनही अजूनही रबी हंगाम पेरणीला तालुक्यात अद्याप प्रारंभ झाला नाही. अद्याप मशागतीची कामे सुरू आहे. सोयाबीन पिकाने दगा दिला तर ओलीताची कपाशी वगळता इतर कोरडवाहू शेतकऱ्यांची पऱ्हाटीवर लाल्या रोगाने आक्रमण केल्याने दोन्ही हंगाम शेतकऱ्यांच्या हातून निघून गेल्याने आता त्यांची आर्थिक भिस्त रब्बी हंगामावर आहे. राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत हवामानावर आधारित रबी हंगामातील हरभरा व गहू पिकांसाठी ३० नोव्हेंबर अंतिम तारीख दिली आहे. नोव्हेंबरचा पहिला आठवडा उजाडला तरी अद्याप रबी हंगामाची एक टक्केही पेरणी झाली नसल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांकडे काही कालावधी शिल्लक आहे.(तालुका प्रतिनिधी)