शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

पाणीपुरवठा योजनेवर दीड कोटींचा खर्च, तरी हिंगणीकर तहानलेलेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 05:00 IST

तांत्रिक सल्लागार ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद वर्धा, राष्ट्रीय पेयजल योजना या निधीतून २०१७-१८ या वर्षांत २ लाख २५ हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यासह जलवाहिनी अंथरण्यात आली. पाणीपुरवठ्याकरिता घरोघरी नळजोडणी देण्यात आल्या. प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम पूर्णत्वास जाऊन २६ जुलै २०२० रोजी लोकार्पण सोहळासुद्धा थाटामाटात पार पडला. मात्र, वर्ष लोटूनही योजना ठप्प आहे. 

ठळक मुद्देढिसाळ नियोजन : योजना कुचकामी ठरल्याची ग्रामस्थांची ओरड

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणी : पिण्याच्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्याकरिता दीड कोटी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली.  मात्र, वर्षभरापासून ग्रामस्थांना थेंबभरदेखील पाणी मिळाले नसल्याने योजना कुचकामी ठरल्याची  ओरड होऊ लागली आहे.ग्रामपंचायतीची सदस्यीय संख्या १५ असून १० हजार गावाची लोकसंख्या आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामस्थांना पाणी टंचाईचे चटके सोसावे लागत आहेत. जलसंकट कायमचे निकाली काढण्याच्या अनुषंगाने शासनाने राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेला १ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी पाणीपुरवठा योजनेकरिता मंजूर केला. तांत्रिक सल्लागार ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद वर्धा, राष्ट्रीय पेयजल योजना या निधीतून २०१७-१८ या वर्षांत २ लाख २५ हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यासह जलवाहिनी अंथरण्यात आली. पाणीपुरवठ्याकरिता घरोघरी नळजोडणी देण्यात आल्या. प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम पूर्णत्वास जाऊन २६ जुलै २०२० रोजी लोकार्पण सोहळासुद्धा थाटामाटात पार पडला. मात्र, वर्ष लोटूनही योजना ठप्प आहे. या योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचे संपूर्ण देयके अदा  झाले. पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली म्हणून ग्रामस्थांनी अनामत रक्कम भरून नळजोडणीकरिता अर्जसुद्धा केले. मात्र, एक वर्षापासून एक थेंबभरसुद्धा पाणी ग्रामस्थांना मिळाले नाही. तसेच राम टेकडीवरील बांधण्यात आलेला जलकुंभसुद्धा अद्याप उघडा असून कोरडाच आहे. कोटी रुपये  खर्च करूनही योजना कार्यान्वित न झाल्याने कुचकामी ठरल्याची ओरड आता ग्रामस्थ करीत आहेत. 

आगामी काही दिवसांमध्ये जलजीवन योजनेअंतर्गत सर्वांना मोफत तीन हजार कनेक्शन देण्यात येणार आहे. हिंगणी येथील एकाही व्यक्तीने एक वर्षापासून नळजोडणीकरिता ग्रामपंचायतीकडे अर्ज केलेला नाही.-ईश्वर मेश्रे, ग्रामसेवक, हिंगणी.

पाणीपुरवठा योजनेवर दीड कोटी रुपयांचा खर्च झाला. मात्र, वर्ष लोटूनही एकाही घरी नळजोडणी न झाल्यामुळे खंत वाटत आहे. आताही ग्रामस्थांना पावसाळ्यात गढूळ पाणी प्यावे लागत आहे.-अनिस शेख,अध्यक्ष, पाणीपुरवठा समिती, हिंगणी.

माझ्या कार्यकाळात ५० ते ६० लोकांनी नळजोडणीकरिता अर्ज केले होते. ग्रामपंचायत कार्यालयात संबंधितांनी अनेकवार येरझारा केल्या. नळजोडणीकरिता अनामत रकमेचा भरणाही केला.  मात्र, ग्रामसेवकाने दखल न घेता अनामत रक्कम परत केली.-शुभांगी मुडे, माजी सरपंच, हिंगणी. 

तत्कालीन पदाधिकाऱ्यांकडून आतापर्यंत पाणी पुरवठायोजनेच्या कागदपत्रांची पूर्तता केल्या गेली नाही. तसेच पाणी टाकीवर लावण्यात आलेल्या पंपाचे ३५ हजार रुपयांचे देयक ग्रामपंचायतीकडे आले असून ते कंत्राटदाराला भरण्यास सांगितले आहे.-दामिनी डेकाटे,  सरपंच, हिंगणी.

 

टॅग्स :Waterपाणी