शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

वर्धा जिल्ह्यात वृक्षलागवडीवर १३ कोटी खर्च; पण किती जगली याचा हिशेब नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 14:42 IST

वर्धा जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ ते २८ नोव्हेंबर २०१७ या अडीच वर्षांत वृक्ष लागवड व संगोपणावर एकूण १२ कोटी ९२ लाख ९६ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे; पण प्रखर उन्हामुळे झाडे करपतात आणि वृक्ष लागवडीवर झालेला खर्च व्यर्थ ठरतो.

ठळक मुद्देपर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न जगलेल्या झाडांचा हिशेब बेपत्ता

गौरव देशमुख।आॅनलाईन लोकमतवर्धा : ग्लोबल वॉर्मिंगमुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे. वाढते औद्योगिककरण आणि वृक्षतोड यामुळे प्रदूषण वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊनच शासनाद्वारे शतकोटी वृक्ष लागवड, दोन कोटी वृक्ष लागवड आदी उपक्रम हाती घेण्यात आले. गावोगावी रस्ता दुतर्फा झाडे लावण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले; पण झाडे किती जगली, याचा हिशेब कुठेही आढळत नाहीत. शासनाने ३२ महिन्यांत वृक्ष लागवडीवर १३ कोटी रुपयांचा खर्च केल्याचे समोर आले आहे.वनविभाग, सामाजिक वनिकरण, ग्रामपंचायत तथा अन्य विभागांमार्फत फळबाग व वृक्ष लागवड करण्यात आली; पण झाडे लावल्यानंतर त्यांच्या संवर्धनाकडे फारसे लक्ष दिले जात नाही, हे वास्तव आहे. वर्धा जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ ते २८ नोव्हेंबर २०१७ या अडीच वर्षांत वृक्ष लागवड व संगोपणावर एकूण १२ कोटी ९२ लाख ९६ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे; पण प्रखर उन्हामुळे झाडे करपतात आणि वृक्ष लागवडीवर झालेला खर्च व्यर्थ ठरतो. २०१५-२०१६ ते २०१७-२०१८ या अडीच वर्षांत कोटीच्या घरात झाडे लावण्यात आली. या अडीच वर्षांत लावलेले वृक्ष वनविभाग, वनीकरण, ग्रा.पं., पं.स. जि.प., न.प. तथा शाळांमार्फत लावण्यत आलीत; पण किती झाडे जिवंत आहेत, याचा लेखाजोखा कुणाकडेच नाही.पावसाळ्यात वृक्ष लागवडीला उधाण येते; पण हिवाळा, उन्हाळा सुरू होताच वृक्षांचा विसर पडतो. त्या रोपट्यांचे संवर्धन करण्याची गरज कुणालाही वाटत नाही. प्रशासनाच्या बाबतीतही हिच बाब समोर येत आहे. वर्धा जिल्ह्यात वनविभाग, सामाजिक वनिकरण, पंचायत समिती, ग्रामपंचायतीमार्फत एकूण ४ हजार ७८१ कामे प्रस्तावित आहेत. यात एप्रिल २०१५ ते २८ नोव्हेंबर २०१७ या अडीच वर्षांत १२ कोटी ९२ लाख ९६ हजार रुपये खर्च करण्यात आला; पण झाडे जगतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लागवडीनंतर वृक्षांच्या संवर्धनाकडे कितपत लक्ष दिले जाते, हा प्रश्नच आहे. शासन, प्रशासनाने याचा विचार करणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :Green Planetग्रीन प्लॅनेटforest departmentवनविभाग