शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघांचा मृत्यू
2
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
3
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
5
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
6
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
7
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
8
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
9
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
10
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
11
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
12
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
13
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
14
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
15
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
16
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
17
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
18
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
19
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
20
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल

वर्धा जिल्ह्यात वृक्षलागवडीवर १३ कोटी खर्च; पण किती जगली याचा हिशेब नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 14:42 IST

वर्धा जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ ते २८ नोव्हेंबर २०१७ या अडीच वर्षांत वृक्ष लागवड व संगोपणावर एकूण १२ कोटी ९२ लाख ९६ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे; पण प्रखर उन्हामुळे झाडे करपतात आणि वृक्ष लागवडीवर झालेला खर्च व्यर्थ ठरतो.

ठळक मुद्देपर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न जगलेल्या झाडांचा हिशेब बेपत्ता

गौरव देशमुख।आॅनलाईन लोकमतवर्धा : ग्लोबल वॉर्मिंगमुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे. वाढते औद्योगिककरण आणि वृक्षतोड यामुळे प्रदूषण वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊनच शासनाद्वारे शतकोटी वृक्ष लागवड, दोन कोटी वृक्ष लागवड आदी उपक्रम हाती घेण्यात आले. गावोगावी रस्ता दुतर्फा झाडे लावण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले; पण झाडे किती जगली, याचा हिशेब कुठेही आढळत नाहीत. शासनाने ३२ महिन्यांत वृक्ष लागवडीवर १३ कोटी रुपयांचा खर्च केल्याचे समोर आले आहे.वनविभाग, सामाजिक वनिकरण, ग्रामपंचायत तथा अन्य विभागांमार्फत फळबाग व वृक्ष लागवड करण्यात आली; पण झाडे लावल्यानंतर त्यांच्या संवर्धनाकडे फारसे लक्ष दिले जात नाही, हे वास्तव आहे. वर्धा जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ ते २८ नोव्हेंबर २०१७ या अडीच वर्षांत वृक्ष लागवड व संगोपणावर एकूण १२ कोटी ९२ लाख ९६ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे; पण प्रखर उन्हामुळे झाडे करपतात आणि वृक्ष लागवडीवर झालेला खर्च व्यर्थ ठरतो. २०१५-२०१६ ते २०१७-२०१८ या अडीच वर्षांत कोटीच्या घरात झाडे लावण्यात आली. या अडीच वर्षांत लावलेले वृक्ष वनविभाग, वनीकरण, ग्रा.पं., पं.स. जि.प., न.प. तथा शाळांमार्फत लावण्यत आलीत; पण किती झाडे जिवंत आहेत, याचा लेखाजोखा कुणाकडेच नाही.पावसाळ्यात वृक्ष लागवडीला उधाण येते; पण हिवाळा, उन्हाळा सुरू होताच वृक्षांचा विसर पडतो. त्या रोपट्यांचे संवर्धन करण्याची गरज कुणालाही वाटत नाही. प्रशासनाच्या बाबतीतही हिच बाब समोर येत आहे. वर्धा जिल्ह्यात वनविभाग, सामाजिक वनिकरण, पंचायत समिती, ग्रामपंचायतीमार्फत एकूण ४ हजार ७८१ कामे प्रस्तावित आहेत. यात एप्रिल २०१५ ते २८ नोव्हेंबर २०१७ या अडीच वर्षांत १२ कोटी ९२ लाख ९६ हजार रुपये खर्च करण्यात आला; पण झाडे जगतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लागवडीनंतर वृक्षांच्या संवर्धनाकडे कितपत लक्ष दिले जाते, हा प्रश्नच आहे. शासन, प्रशासनाने याचा विचार करणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :Green Planetग्रीन प्लॅनेटforest departmentवनविभाग