शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

वर्धा जिल्ह्यात वृक्षलागवडीवर १३ कोटी खर्च; पण किती जगली याचा हिशेब नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 14:42 IST

वर्धा जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ ते २८ नोव्हेंबर २०१७ या अडीच वर्षांत वृक्ष लागवड व संगोपणावर एकूण १२ कोटी ९२ लाख ९६ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे; पण प्रखर उन्हामुळे झाडे करपतात आणि वृक्ष लागवडीवर झालेला खर्च व्यर्थ ठरतो.

ठळक मुद्देपर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न जगलेल्या झाडांचा हिशेब बेपत्ता

गौरव देशमुख।आॅनलाईन लोकमतवर्धा : ग्लोबल वॉर्मिंगमुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे. वाढते औद्योगिककरण आणि वृक्षतोड यामुळे प्रदूषण वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊनच शासनाद्वारे शतकोटी वृक्ष लागवड, दोन कोटी वृक्ष लागवड आदी उपक्रम हाती घेण्यात आले. गावोगावी रस्ता दुतर्फा झाडे लावण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले; पण झाडे किती जगली, याचा हिशेब कुठेही आढळत नाहीत. शासनाने ३२ महिन्यांत वृक्ष लागवडीवर १३ कोटी रुपयांचा खर्च केल्याचे समोर आले आहे.वनविभाग, सामाजिक वनिकरण, ग्रामपंचायत तथा अन्य विभागांमार्फत फळबाग व वृक्ष लागवड करण्यात आली; पण झाडे लावल्यानंतर त्यांच्या संवर्धनाकडे फारसे लक्ष दिले जात नाही, हे वास्तव आहे. वर्धा जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ ते २८ नोव्हेंबर २०१७ या अडीच वर्षांत वृक्ष लागवड व संगोपणावर एकूण १२ कोटी ९२ लाख ९६ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे; पण प्रखर उन्हामुळे झाडे करपतात आणि वृक्ष लागवडीवर झालेला खर्च व्यर्थ ठरतो. २०१५-२०१६ ते २०१७-२०१८ या अडीच वर्षांत कोटीच्या घरात झाडे लावण्यात आली. या अडीच वर्षांत लावलेले वृक्ष वनविभाग, वनीकरण, ग्रा.पं., पं.स. जि.प., न.प. तथा शाळांमार्फत लावण्यत आलीत; पण किती झाडे जिवंत आहेत, याचा लेखाजोखा कुणाकडेच नाही.पावसाळ्यात वृक्ष लागवडीला उधाण येते; पण हिवाळा, उन्हाळा सुरू होताच वृक्षांचा विसर पडतो. त्या रोपट्यांचे संवर्धन करण्याची गरज कुणालाही वाटत नाही. प्रशासनाच्या बाबतीतही हिच बाब समोर येत आहे. वर्धा जिल्ह्यात वनविभाग, सामाजिक वनिकरण, पंचायत समिती, ग्रामपंचायतीमार्फत एकूण ४ हजार ७८१ कामे प्रस्तावित आहेत. यात एप्रिल २०१५ ते २८ नोव्हेंबर २०१७ या अडीच वर्षांत १२ कोटी ९२ लाख ९६ हजार रुपये खर्च करण्यात आला; पण झाडे जगतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लागवडीनंतर वृक्षांच्या संवर्धनाकडे कितपत लक्ष दिले जाते, हा प्रश्नच आहे. शासन, प्रशासनाने याचा विचार करणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :Green Planetग्रीन प्लॅनेटforest departmentवनविभाग