शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र वाढवा पण, पर्यायी व्यवस्थेचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:01 IST

जिल्ह्यात अद्यापही ५ ते ६ लाख क्विंटल कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. हा सर्व कापूस मान्सुनपूर्वी हमीभावात खरेदी करावा, यासाठी सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र वाढविण्याची मागणी जोर धरत आहे. पण, कापूस खरेदी केंद्र वाढवायचे कसे? हा मोठा प्रश्न आहे. याबाबत अद्यापही निर्णय झाला नसल्याने प्रत्येक नोंदणी केंद्रावरील शेतकऱ्यांची यादी वाढतच आहे.

ठळक मुद्देकापूस खरेदीचा प्रश्न गंभीर : जिनिंग-प्रेसिंगवरच भिस्त मात्र, अडचणींचा डोलारा कायमच, निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भाव वाढीच्या प्रतिक्षेत असंख्य शेतकऱ्यांनी कापूस घरातच भरुन ठेवला. पण, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरातच लॉकडाऊन करण्यात आल्याने कापूस खरेदीला ब्रेक लागला. परिणामी लाख मोलाच सोनं कवडीमोल भावात विकण्याची वेळ आली. जिल्ह्यात अद्यापही ५ ते ६ लाख क्विंटल कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. हा सर्व कापूस मान्सुनपूर्वी हमीभावात खरेदी करावा, यासाठी सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र वाढविण्याची मागणी जोर धरत आहे. पण, कापूस खरेदी केंद्र वाढवायचे कसे? हा मोठा प्रश्न आहे. याबाबत अद्यापही निर्णय झाला नसल्याने प्रत्येक नोंदणी केंद्रावरील शेतकऱ्यांची यादी वाढतच आहे.जिल्ह्यात आठ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत वायगाव, देवळी, सेलू, हिंगणघाट, सिंदी (रेल्वे), समुद्रपूर, खरांगणा व रोहणा या आठ केंद्रावर सीसीआयची कापूस खरेदी सुरु आहे. यासोबतच महाकॉकडूनही कापसाची हमीभावात कापूस खरेदी होत आहे. जिल्ह्यात सीसीआय, महाकॉट तसेच करार केलेल्या २५ जिनिंग-प्रेसिंगच्या माध्यमातून जवळपास २६ लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. अद्यापही आठही तालुक्यातील कापूस उत्पादकांकडे ५ ते ६ लाख कापूस शिल्लक आहे. दरम्यानच्या काळात लॉकडाऊन झाल्यामुळे कापूस खरेदीचा ओघ मंदावला. त्यामुळे कापूस उत्पादकांची चिंतेत आणखीच भर पडली. खरीप हंगाम पंधरा दिवसावर आल्याने या दिवसात कापूस विकण्यासाठी धडपड करायची की खरिपाची तयारी करायची, खरीपाची तयारी करायची म्हटली तर बी-बियाण्यांकरिता पैशाची गरज आहे. कापूसच घरात असल्याने पैसे तरी आणणार कुठून, असे अनेक प्रश्न सध्या शेतकºयांना भांडावून सोडत आहे. शेतकऱ्यांच्या या अवस्थेचा विचार करुन सीसीआयकडून कापूस खरेदी सुरु करण्यात आली. मात्र, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमामुळे दररोज मोजक्याच गाड्या घेतल्या जात असल्याने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी चांगलीच वाढली आहे. सीसीआयचे मोजके केंद्र, गाड्याचीच आवकही मोजकीच मात्र, नोंदणीकृती शेतकऱ्यांची संख्या असंख्य असल्याने कापूस खरेदीचा प्रश्न आता दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सर्वत्र मान्सुनचे वेध लागल्याने पावसाळा सुरु होण्यापूर्वीच शेतकºयांचा कापूस खरेदी व्हावा, या जिल्ह्यातील सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र वाढविण्याची एकमुखी मागणी होत आहे. तसेच पर्यायही सुचविले जात आहे.हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी करणाऱ्यांवर कारवाई कराजून महिन्यापासून खरीप हंगाम सुरु होत आहे. खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांचा संपूर्ण कापूस खरेदी करुन त्यांना मोबदला त्वरीत देने आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केल्यानंतर सात दिवसाच्या आत संपूर्ण रक्कम देण्याची व्यवस्था करण्यात यावी. अनेक व्यापाऱ्यांनी हमी भावापेक्षा कमीभावामध्ये कापूस खरेदी करुन तो कापूस सिसीआयला विकल्या जातो. त्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून हमी भावापेक्षा कमी भावाने कापूस खरेदी केल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन सोमवारी खासदार रामदास तडस यांनी भारतीय कपास निगमचे मुख्य महाव्यवस्थापक यांना अकोला येथील महाव्यवस्थापक यांच्या माध्यमातून देण्यात आले.जिनिंग-प्रेसिंगची कामगारांनी वाढविली अडचणजिल्ह्यातील सर्व कापूस खरेदी करण्याकरिता जिनिंग-प्रेसिंगमध्ये सीसीआयची कापूस खरेदी सुरु करण्याची मागणी होत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील जिनिंगमध्ये काम करणारे परप्रांतीय मजूर आपापल्या गावी निघून गेल्याने आता मजुरांची वानवा आहे. स्थानिक मजुरांना जास्त मजुरी देऊनही ते जिनिंगमध्ये काम करायला तयार नाही. एका जिनिंगमध्ये गाडी खाली करणे, कापसाची गंजी लावणे, जिनिंग प्रोसेसिंग करणे, सरकी भरुन लोडींग करणे, गाठी लोडींग करणे आदी कामाकरिता दररोज ५० ते ६० मजुरांची आवश्यकता असते. त्यामुळे या काळात हे मजूर आणाणचे कुठून असा प्रश्न जिनर्सने उपस्थित केला आहे. पण, शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता जिनर्स व जिल्हा प्रशासनाने समन्वय साधून तोडगा काढण्याची गरज आहे.गाड्यांची संख्या वाढवावीवर्धा सहित संपूर्ण विदर्भात कापूस जास्त प्रमाणात होत असतो, पंरतु कोविड-१९ महामारीमुळे विदर्भातील भारतीय कपास निगमची कापूस खरेदी कमी असल्यामुळे शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक आहे. त्यामुळे वर्ध्यासह संपूर्ण विदर्भात कापूस खरेदी केंद्राची संख्या वाढविण्यात यावी. लॉकडाऊन ३.० मध्ये कापसाची खरेदी सुरु झाली परंतु, खरेदी केंद्रावर दर दिवसाला ५० गाड्यापर्यंत शेतकºयांचा कापूस खरेदी केला जातो. या गतीने कापूस खरेदी केल्यास संपूर्ण शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणे शक्य होणार नाही. यामध्ये वाढ करुन दररोज १५० ते २०० गाड्या कापूस खरेदी करण्याची मागणी होत आहे.वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे इतर जिल्ह्यातील सीमेवर शेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्रावर नोंद केलेली आहे परंतु, त्यांचा कापूस खरेदी केंद्रावर आणण्याकरिता त्यांना जिल्हा हद्दीवर अडविण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर आणण्याकरिता परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आल्याने जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी शेतकऱ्यांना कापूस खरेदी केंद्रावर कापूस घेऊन जाण्याकरिता परवानगी देण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.

टॅग्स :Socialसामाजिक