शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

वर्धेतील पाच जणांना केले दोन वर्षांकरिता हद्दपार

By admin | Updated: March 20, 2016 02:14 IST

शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता समाज विघातक गुन्हे करणाऱ्या ...

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे कारवाईवर्धा : शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता समाज विघातक गुन्हे करणाऱ्या पाच जणांना वर्धेतून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे करण्यात आली. राकेश मुन्ना पांडे (२५), गणेश श्यामराव पेंदोर (२८), दीपक ऊर्फ सोनू विजय वासनिक (२३), अमोल गणेश गेडाम (२४) चौघेही रा. इतवारा बाजार तर सचिन ऊर्फ भुरी श्याम अरखेल (२८) रा. पुलफैल या पाच जणांचा यात समावेश आहे. हद्दपारीची कारवाई करण्यात आलेल्या पाचही जणांवर शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरी, शस्त्र बाळगणे, खून, खुनाचा प्रयत्न करणे, अपहरण, दहशत पसरविणे, मारपीट करणे यासह अवैध दारू विक्रीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. हद्दपारीची कारवाई झालेले पाचही जण टोळीने गुन्हे करीत असल्याचे समोर आले आहे. या टोळीचा म्होरक्या राकेश पांडे हा होता. गुन्हेगारी टोळीचा बिमोड करणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ प्रमाणे ठाणेदार एम.पी. बुराडे यांनी या पाच जणांवर हद्दपारीचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेकडे सादर केला. एलसीबीने हा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता. यावर अधीक्षकांनी आदेश काढून या पाच जणांना दोन वर्षाकरिता वर्धेतून हद्दपार केले. या आदेशाच्या अंमलाकरिता शहर ठाण्याकडून कारवाई करण्यात येणार आहे. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एम. डी. चाटे, शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम. पी. बुराडे यांनी केली.(प्रतिनिधी)