शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

प्रकल्प कार्यालय कार्यान्वित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 23:28 IST

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वर्धा येथील स्वतंत्र आदिवासी प्रकल्प कार्यालयाची मागणी पूर्ण केली असून ते कार्यालय तत्काळ कार्यान्वित करावे, यासह महत्त्वाच्या अकरा मागण्यांचे निवेदन आमदार डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

ठळक मुद्देपंकज भोयर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वर्धा येथील स्वतंत्र आदिवासी प्रकल्प कार्यालयाची मागणी पूर्ण केली असून ते कार्यालय तत्काळ कार्यान्वित करावे, यासह महत्त्वाच्या अकरा मागण्यांचे निवेदन आमदार डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. महाजनादेश यात्रेदरम्यानच्या वर्धा येथील सभेदरम्यान या मागण्या तातडीने पूर्ण करण्याचीही विनंती केली.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १५० कोटी रुपयांची मदत करुन रिझर्व बँक आॅफ इंडियाकडून रद्द झालेला परवाना प्राप्त करुन दिला. परंतु शेतकऱ्यांना अद्यापही पीककर्ज दिले जात नाही. राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे राज्य सहकारी बँकेची शाखा तातडीने सुरु करावी. रामनगर लीजप्रकरण १९९१ पासून प्रलंबित होते. त्यांच्या नुतनीकरणाची प्रक्रिया पार पडली. मात्र, अद्यापही मालकी हक्क मिळाला नाही. त्यामुळे भूखंडधारकांना मालकी हक्काने पट्टे वाटप करावे. सेवाग्राम विकास आराखड्यात वरुड व पवनार या ग्रामपंचायतींचा समावेश केल्याने विकास होत आहे.तसेच नजिकच्या दहा ग्रामपंचायतींचाही आराखड्यात समावेश करुन निधी उपलब्ध करुन द्यावा.शहरालगतच्या दहा ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणव्दारे पाणीपुरवठा केल्या जातो.या पाण्याचे देयक हे शहरी दराने आकारले जात आहे. ते देयक ग्रामीण भागाच्या दरानुसार देण्यासाठी उपाययोजना करावी. तसेच अंगणवाडी सेविकांचे मानधन दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या खात्यात जमा व्हावे आणि त्यांना चतुर्थ श्रेणी लागू करावी. शहरासह लगतच्या गावातील पाणी टंचाई दूर करण्याकरिता महाकाळीच्या धाम प्रकल्पातून येळाकेळीपर्यंत पाईपलाईनव्दारे पाणीपुरवठा करण्याची मान्यता द्यावी.अमृत योजनेंतर्गत सुरु असलेल्या भूमिगत पाणीपुरवठा व मलनिस्सार णयोजनेच्या कामात नियोजनाचा अभाव असल्याने नागरिंकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आठवडाभरापूर्वीच या योजनेच्या खड्डयात पडल्याने बालकाचा करुण अंत झाला. त्यामुळे योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता उत्कृष्ट अधिकारी व यंत्रणेची नियुक्ती करावी. इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत अनेक लोकाभिमुख योजना राबविल्या जात आहे. या योजनेंतर्गत नोंदणीकृत कामगारांच्या मुलींच्या लग्नाकरिता ५१ हजार रुपयाचे अनुदान आणि कामगारांकरिता स्वतंत्र रुग्णालय सुरु करावे आणि येणाºया कालावधीत वर्धेपर्यंत नागपूर मेट्रोचे विस्तारीकरण करावे, या मागण्यांचे निवेदन दिले आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून या मागण्यांची पूर्तता करण्याबाबत सकारात्मकताही दर्शविली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPankaj Bhoyarपंकज भोयर