शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

ना रांगा, ना नागरिकांची गर्दी; तरी बँकांत ‘फस्ट डे' १० कोटी

By महेश सायखेडे | Updated: May 23, 2023 18:18 IST

खात्यात जमा करण्यासाठी नो लिमिट : बदलून घेण्यासाठी २० हजारांची मर्यादा

वर्धा : केंद्रातील मोदी सरकारने दोन हजार रुपयांचे चलन असलेली नोट व्यवहारातून बाद करण्याचे जाहीर केले आहे. हा निर्णय जाहीर करताना संबंधित नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा अवधी दिला आहे. मंगळवारपासून दाेन हजारांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आज वर्धा जिल्ह्यातील विविध बँकांत सुमारे १० कोटींचे मूल्य असलेल्या दोन हजारांच्या नोटा जमा झाल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे दोन हजारांच्या नोटा बदलून घेण्यासाठी तसेच त्या बँक खात्यात जमा करून घेण्यासाठी मंगळवारी कुठल्याही बँकेच्या शाखेसमोर नागरिकांच्या तोबा गर्दी होत रांगा लागल्या नव्हत्या. दोन हजारांच्या नोटा बँक खात्यात जमा करण्यासाठी कुठलीही लिमिट नाही. पण संबंधित नोटा बदलून घेण्यासाठी २० हजारांची मर्यादा असल्याचे सांगण्यात आले, हे विशेष.

दोन हजारांच्या नोटांचा दोन वर्षांपासून पुरवठा नाहीच

केंद्रातील मोदी सरकारने पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा व्यवहारातून बंद केल्यावर जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील प्रत्येक बँकेसमोर नागरिकांची तोबा गर्दी होत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर नंतर केंद्र सरकारने दोन हजारांच्या नोटा आर्थिक व्यवहारासाठी बहाल केल्या. पण याच दाेन हजारांच्या नोटांचा मागील दोन वर्षांपासून आरबीआयकडून वर्धा जिल्ह्याला पुरवठा झालेला नसल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.

एसबीआयच्या ट्रेझरी शाखेत आल्या ४९ नोटा

मंगळवारी दोन हजारांच्या नोटा बदलण्याच्या पहिल्या दिवशी दुपारी १२.३० वाजेपर्यंत सुमारे पाच नागरिकांनी दोन हजारांच्या एकूण ४९ नोटा बँकत जमा करून दुसऱ्या नोटा घेतल्याचे लोकमतच्या प्रतिनिधीशी बोलताना बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :bankबँकwardha-acवर्धा