शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

अतिवृष्टीमुळे उत्पादनावर होणार प्रतिकूल परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:50 IST

जून महिन्यात उशीरा पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड उशीरा केली. त्यातच जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे कपाशी, सोयाबीन आदी पीक अडचणीत आले आहे. यंदा कपाशीच्या पिकाची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र, अजूनही कपाशीच्या झाडाला बोंड लागण्यापूर्वी फुल व पात्या आलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देकपाशीची वाढ प्रचंड : फुल-पात्यांची मात्र कमतरता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जून महिन्यात उशीरा पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड उशीरा केली. त्यातच जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे कपाशी, सोयाबीन आदी पीक अडचणीत आले आहे. यंदा कपाशीच्या पिकाची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र, अजूनही कपाशीच्या झाडाला बोंड लागण्यापूर्वी फुल व पात्या आलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.लोकमतने जिल्ह्यातील अनेक गावात जावून यासंदर्भात आढावा घेतला. शेतांमध्ये शेतकऱ्यांची भेट घेवून माहिती जाणून घेतली असता यंदा कपाशीचे झाडे मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे शेतकरी सांगतात. अतिवृष्टीमुळे निंदनाचा खर्चही प्रचंड प्रमाणात वाढला आहे. २५० रूपये रोज एका महिला मजूराला द्यावा लागतो.मजूर गावातून शेतात आणण्यासाठी व त्यांना सोडून देण्यासाठी ऑटोरिक्षाला प्रति दिवस ३०० रूपये द्यावे लागतात. फवारणीचा खर्चही दरररोज एक हजार रूपयाच्यावर आहे. पºहाटी मोठ्या प्रमाणावर वाढली असली तरी फुल, पाती मात्र आलेली नाही. दिवाळी, दसºयात दरवर्षी कापूस निघतो. यंदा दसºयात किंवा दिवाळीत सितादेवी होणार नाही, अशी माहिती शेतकºयांनी दिली. ग्रामीण भागात मजुरांची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. आता हाताने हॅन्डल मारण्याच्या स्प्रेपंपाने कुणीही फवारणी करायला येत नाही. सर्वांना बॅटरीचा पंप लागतो. तो पंप असेल तरच मजूर कामावर येतात. अन्यथा फवारणीचे काम करण्यास कुणीही तयार नसल्याचे शेतकºयांनी सांगितले. जे शेतकरी स्वत: शेतात उभे राहून फवारणी करून घेतात, त्यांचे काम ठिक आहे. परंतु इतरांच्या भरोशावर फवारणीचे काम करायचे असेल तर मजूर पंपाचा नोझल मोठा करून तासाभरात फवारणीचे काम उरकवतो, अशी माहिती शेतकºयांनी दिली. एकूणच अति पावसामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.संपूर्ण कुटुंब शेतातग्रामीण भागात फिरत असताना अनेक शेतांमध्ये संपूर्ण कुटुंब शेतात काम करीत असल्याचे दिसून आले. यंदा ज्या लोकांनी ठेक्याने व मक्त्याने शेती करण्यासाठी घेतली आहे, त्यांना कदाचित अतिवृष्टीमुळे तोटा येण्याची शक्यता आहे. कारण शेतीचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. तुलनेत उत्पादन होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती शेतकºयांनी दिली.

टॅग्स :floodपूर