शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

अतिवृष्टीमुळे उत्पादनावर होणार प्रतिकूल परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:50 IST

जून महिन्यात उशीरा पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड उशीरा केली. त्यातच जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे कपाशी, सोयाबीन आदी पीक अडचणीत आले आहे. यंदा कपाशीच्या पिकाची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र, अजूनही कपाशीच्या झाडाला बोंड लागण्यापूर्वी फुल व पात्या आलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देकपाशीची वाढ प्रचंड : फुल-पात्यांची मात्र कमतरता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जून महिन्यात उशीरा पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड उशीरा केली. त्यातच जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे कपाशी, सोयाबीन आदी पीक अडचणीत आले आहे. यंदा कपाशीच्या पिकाची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र, अजूनही कपाशीच्या झाडाला बोंड लागण्यापूर्वी फुल व पात्या आलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.लोकमतने जिल्ह्यातील अनेक गावात जावून यासंदर्भात आढावा घेतला. शेतांमध्ये शेतकऱ्यांची भेट घेवून माहिती जाणून घेतली असता यंदा कपाशीचे झाडे मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे शेतकरी सांगतात. अतिवृष्टीमुळे निंदनाचा खर्चही प्रचंड प्रमाणात वाढला आहे. २५० रूपये रोज एका महिला मजूराला द्यावा लागतो.मजूर गावातून शेतात आणण्यासाठी व त्यांना सोडून देण्यासाठी ऑटोरिक्षाला प्रति दिवस ३०० रूपये द्यावे लागतात. फवारणीचा खर्चही दरररोज एक हजार रूपयाच्यावर आहे. पºहाटी मोठ्या प्रमाणावर वाढली असली तरी फुल, पाती मात्र आलेली नाही. दिवाळी, दसºयात दरवर्षी कापूस निघतो. यंदा दसºयात किंवा दिवाळीत सितादेवी होणार नाही, अशी माहिती शेतकºयांनी दिली. ग्रामीण भागात मजुरांची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. आता हाताने हॅन्डल मारण्याच्या स्प्रेपंपाने कुणीही फवारणी करायला येत नाही. सर्वांना बॅटरीचा पंप लागतो. तो पंप असेल तरच मजूर कामावर येतात. अन्यथा फवारणीचे काम करण्यास कुणीही तयार नसल्याचे शेतकºयांनी सांगितले. जे शेतकरी स्वत: शेतात उभे राहून फवारणी करून घेतात, त्यांचे काम ठिक आहे. परंतु इतरांच्या भरोशावर फवारणीचे काम करायचे असेल तर मजूर पंपाचा नोझल मोठा करून तासाभरात फवारणीचे काम उरकवतो, अशी माहिती शेतकºयांनी दिली. एकूणच अति पावसामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.संपूर्ण कुटुंब शेतातग्रामीण भागात फिरत असताना अनेक शेतांमध्ये संपूर्ण कुटुंब शेतात काम करीत असल्याचे दिसून आले. यंदा ज्या लोकांनी ठेक्याने व मक्त्याने शेती करण्यासाठी घेतली आहे, त्यांना कदाचित अतिवृष्टीमुळे तोटा येण्याची शक्यता आहे. कारण शेतीचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. तुलनेत उत्पादन होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती शेतकºयांनी दिली.

टॅग्स :floodपूर