शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाचत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
6
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
7
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
8
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
9
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
10
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
11
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
12
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
13
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
14
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
15
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
16
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
17
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
18
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
19
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
20
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस

अतिवृष्टीमुळे उत्पादनावर होणार प्रतिकूल परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:50 IST

जून महिन्यात उशीरा पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड उशीरा केली. त्यातच जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे कपाशी, सोयाबीन आदी पीक अडचणीत आले आहे. यंदा कपाशीच्या पिकाची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र, अजूनही कपाशीच्या झाडाला बोंड लागण्यापूर्वी फुल व पात्या आलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देकपाशीची वाढ प्रचंड : फुल-पात्यांची मात्र कमतरता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जून महिन्यात उशीरा पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड उशीरा केली. त्यातच जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे कपाशी, सोयाबीन आदी पीक अडचणीत आले आहे. यंदा कपाशीच्या पिकाची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र, अजूनही कपाशीच्या झाडाला बोंड लागण्यापूर्वी फुल व पात्या आलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.लोकमतने जिल्ह्यातील अनेक गावात जावून यासंदर्भात आढावा घेतला. शेतांमध्ये शेतकऱ्यांची भेट घेवून माहिती जाणून घेतली असता यंदा कपाशीचे झाडे मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे शेतकरी सांगतात. अतिवृष्टीमुळे निंदनाचा खर्चही प्रचंड प्रमाणात वाढला आहे. २५० रूपये रोज एका महिला मजूराला द्यावा लागतो.मजूर गावातून शेतात आणण्यासाठी व त्यांना सोडून देण्यासाठी ऑटोरिक्षाला प्रति दिवस ३०० रूपये द्यावे लागतात. फवारणीचा खर्चही दरररोज एक हजार रूपयाच्यावर आहे. पºहाटी मोठ्या प्रमाणावर वाढली असली तरी फुल, पाती मात्र आलेली नाही. दिवाळी, दसºयात दरवर्षी कापूस निघतो. यंदा दसºयात किंवा दिवाळीत सितादेवी होणार नाही, अशी माहिती शेतकºयांनी दिली. ग्रामीण भागात मजुरांची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. आता हाताने हॅन्डल मारण्याच्या स्प्रेपंपाने कुणीही फवारणी करायला येत नाही. सर्वांना बॅटरीचा पंप लागतो. तो पंप असेल तरच मजूर कामावर येतात. अन्यथा फवारणीचे काम करण्यास कुणीही तयार नसल्याचे शेतकºयांनी सांगितले. जे शेतकरी स्वत: शेतात उभे राहून फवारणी करून घेतात, त्यांचे काम ठिक आहे. परंतु इतरांच्या भरोशावर फवारणीचे काम करायचे असेल तर मजूर पंपाचा नोझल मोठा करून तासाभरात फवारणीचे काम उरकवतो, अशी माहिती शेतकºयांनी दिली. एकूणच अति पावसामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.संपूर्ण कुटुंब शेतातग्रामीण भागात फिरत असताना अनेक शेतांमध्ये संपूर्ण कुटुंब शेतात काम करीत असल्याचे दिसून आले. यंदा ज्या लोकांनी ठेक्याने व मक्त्याने शेती करण्यासाठी घेतली आहे, त्यांना कदाचित अतिवृष्टीमुळे तोटा येण्याची शक्यता आहे. कारण शेतीचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. तुलनेत उत्पादन होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती शेतकºयांनी दिली.

टॅग्स :floodपूर