शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

सेलू, देवळी अन् आर्वी तालुक्यांत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 05:00 IST

मागील २४ तासांत वर्धा तालुक्यात ४६.६० मिमी, सेलू तालुक्यात ७६.४० मिमी, देवळी तालुक्यात ६९.५० मिमी, हिंगणघाट तालुक्यात ४०.५० मिमी, समुद्रपूर तालुक्यात ३३.५४ मिमी, आर्वी तालुक्यात ८३.२५ मिमी, आष्टी तालुक्यात ३९.०० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात ५०.८५ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मागील काही दिवस दडी मारलेल्या पावसाने बैल पोळ्याच्या दिवशी थांबून थांबून जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दमदार हजेरी लावली. यामुळे नदी व नाल्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात ४३९.६४ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली असून सेलू, देवळी तसेच आर्वी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. मागील २४ तासांत वर्धा तालुक्यात ४६.६० मिमी, सेलू तालुक्यात ७६.४० मिमी, देवळी तालुक्यात ६९.५० मिमी, हिंगणघाट तालुक्यात ४०.५० मिमी, समुद्रपूर तालुक्यात ३३.५४ मिमी, आर्वी तालुक्यात ८३.२५ मिमी, आष्टी तालुक्यात ३९.०० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात ५०.८५ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.संत्रासह कपाशीला बसला फटकाकारंजा (घा.) : मुसळधार पावसाचा उभ्या संत्रा पिकाला तसेच कपाशी पिकाला चांगलाच फटका बसला आहे. तालुक्याचा विचार केल्यास सावरडोह, बेलगाव, सुसुंद्रा, खापरी या भागातील कपाशी पिकाला मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. उभ्या सोयाबीन पिकाची पावसामुळे नासाडी झाली आहे. या भागातील नुकसानीची पाहणी करून शासकीय मदतीची मागणी होत आहे.नदी-नाले फुल्लरोहणा : मुसळधार पावसामुळे परिसरातील नदी व नाल्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. या परिसरातील कपाशी पिकाची पावसामुळे पातीगळ झाली असून, उभ्या सोयाबीन पिकाला फटका बसला आहे. 

पवनारची धाम नदी फुगलीपवनार : संततधार पावसामुळे येथील धाम नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून, सध्या धाम नदी दुथडी भरून वाहात आहे. धाम नदी दुथडी भरून वाहात असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असला तरी पाण्याने भरलेल्या नदीचे सौंदर्य बघण्यासाठी नागरिक एकच गर्दी करीत आहेत.

शेताला आले तळ्याचे स्वरूप- विरुळ (आकाजी) : विरुळ आकाजी परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने तसेच शेतामध्ये पावसाचे पाणी साचल्याने अनेक शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. शेतात साचलेेले पावसाचे पाणी शेताबाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात असून, जास्त पाण्यामुळे उभ्या पिकांवर विपरित परिणाम होत आहे. शिवाय शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.

तीन तालुक्यांत अपेक्षित पेक्षा जास्तच बरसलामागील २४ तासांत जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. सेलू तालुक्यात अपेक्षित पेक्षा ११.४० मिमी, देवळी तालुक्यात अपेक्षित पेक्षा ४.५० मिमी तर आर्वी तालुक्यात अपेक्षित पेक्षा तब्बल १८.२५ मिमी जादा पाऊस पडला असून तशी नोंद प्रशासनाने घेतली आहे.

कपाशीसह सोयाबीन पिकावर परिणामनंदोरी : मुसळधार पावसामुळे उभ्या सोयाबीन तसेच कपाशी पिकाला फटका बसला आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. महसूल विभागाने पाहणी करून नुकसानग्रस्तांना शासकीय मदत देण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :floodपूरRainपाऊस