शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

सेलू, देवळी अन् आर्वी तालुक्यांत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 05:00 IST

मागील २४ तासांत वर्धा तालुक्यात ४६.६० मिमी, सेलू तालुक्यात ७६.४० मिमी, देवळी तालुक्यात ६९.५० मिमी, हिंगणघाट तालुक्यात ४०.५० मिमी, समुद्रपूर तालुक्यात ३३.५४ मिमी, आर्वी तालुक्यात ८३.२५ मिमी, आष्टी तालुक्यात ३९.०० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात ५०.८५ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मागील काही दिवस दडी मारलेल्या पावसाने बैल पोळ्याच्या दिवशी थांबून थांबून जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दमदार हजेरी लावली. यामुळे नदी व नाल्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात ४३९.६४ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली असून सेलू, देवळी तसेच आर्वी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. मागील २४ तासांत वर्धा तालुक्यात ४६.६० मिमी, सेलू तालुक्यात ७६.४० मिमी, देवळी तालुक्यात ६९.५० मिमी, हिंगणघाट तालुक्यात ४०.५० मिमी, समुद्रपूर तालुक्यात ३३.५४ मिमी, आर्वी तालुक्यात ८३.२५ मिमी, आष्टी तालुक्यात ३९.०० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात ५०.८५ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.संत्रासह कपाशीला बसला फटकाकारंजा (घा.) : मुसळधार पावसाचा उभ्या संत्रा पिकाला तसेच कपाशी पिकाला चांगलाच फटका बसला आहे. तालुक्याचा विचार केल्यास सावरडोह, बेलगाव, सुसुंद्रा, खापरी या भागातील कपाशी पिकाला मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. उभ्या सोयाबीन पिकाची पावसामुळे नासाडी झाली आहे. या भागातील नुकसानीची पाहणी करून शासकीय मदतीची मागणी होत आहे.नदी-नाले फुल्लरोहणा : मुसळधार पावसामुळे परिसरातील नदी व नाल्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. या परिसरातील कपाशी पिकाची पावसामुळे पातीगळ झाली असून, उभ्या सोयाबीन पिकाला फटका बसला आहे. 

पवनारची धाम नदी फुगलीपवनार : संततधार पावसामुळे येथील धाम नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून, सध्या धाम नदी दुथडी भरून वाहात आहे. धाम नदी दुथडी भरून वाहात असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असला तरी पाण्याने भरलेल्या नदीचे सौंदर्य बघण्यासाठी नागरिक एकच गर्दी करीत आहेत.

शेताला आले तळ्याचे स्वरूप- विरुळ (आकाजी) : विरुळ आकाजी परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने तसेच शेतामध्ये पावसाचे पाणी साचल्याने अनेक शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. शेतात साचलेेले पावसाचे पाणी शेताबाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात असून, जास्त पाण्यामुळे उभ्या पिकांवर विपरित परिणाम होत आहे. शिवाय शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.

तीन तालुक्यांत अपेक्षित पेक्षा जास्तच बरसलामागील २४ तासांत जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. सेलू तालुक्यात अपेक्षित पेक्षा ११.४० मिमी, देवळी तालुक्यात अपेक्षित पेक्षा ४.५० मिमी तर आर्वी तालुक्यात अपेक्षित पेक्षा तब्बल १८.२५ मिमी जादा पाऊस पडला असून तशी नोंद प्रशासनाने घेतली आहे.

कपाशीसह सोयाबीन पिकावर परिणामनंदोरी : मुसळधार पावसामुळे उभ्या सोयाबीन तसेच कपाशी पिकाला फटका बसला आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. महसूल विभागाने पाहणी करून नुकसानग्रस्तांना शासकीय मदत देण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :floodपूरRainपाऊस