शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

तरोडा आदर्श ग्राम करण्यासाठी सर्वांचा पुढाकार आवश्यक

By admin | Updated: January 31, 2015 23:25 IST

आदर्श ग्राम निर्माणात भौतिक सुविधांबरोबरच गावाचा सर्वांगिण विकास होणे आवश्यक आहे. एकमेकांशी नाते अधिक दृढ, होणे आवश्यक आहे. समाजात आदर्श निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने

पालकमंत्री : जनधन योजनेंतर्गत ग्रामस्थांना बँकेच्या पासबुकचे वितरणवर्धा : आदर्श ग्राम निर्माणात भौतिक सुविधांबरोबरच गावाचा सर्वांगिण विकास होणे आवश्यक आहे. एकमेकांशी नाते अधिक दृढ, होणे आवश्यक आहे. समाजात आदर्श निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने स्वत:पासून प्रारंभ केला तरच देशाची प्रगती होणे शक्य आहे. प्रगतीबरोबरच आई-वडीलांचा सांभाळही प्रत्येकाने करावा, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले. संस्कृतचे व्यासंगी मा.गो.वैद्य यांच्या सारख्या महान व्यक्तींच्या गावात सर्वांनी मिळून आदर्शग्रामाकरिता पुढकार घेण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी गावकऱ्यांना दिला. जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी नगर जिल्ह्यातील हिवरेबाजार हे आदर्श गाव असल्याने त्या धरतीवर अधिक सक्षमपणे आपणही आदर्श ग्राम बनविण्यासाठी एकत्र यावे, असे प्रतिपादन केले. यावेळी खा. रामदास तडस यांनीही गावाच्या विकासाकरिता सर्वतोपरी प्रयत्न प्रशासनातर्फे करण्यात येत असून ग्रामस्थांनीही सकारात्मकतेने यापुढेही सहकार्य करावे, असे सांगितले.यावेळी आ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, जिल्हा परिषद अध्यक्ष चित्रा रणनवरे, शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, जिल्हाधिकारी एन. नवीन सोना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, सामाजिक वनीकरण विभागाचे बडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भूयार, तहसीलदार राहुल सारंग आदींची उपस्थिती होती.प्रारंभी सभागृह बांधकामाचा श्रीफळ वाढवून पालकमंत्री यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमामध्ये पालकमंत्र्यांच्याहस्ते जनधन योजनेच्या लाभार्थी मंदा बोरकर, सुनंदा तिमांडे, अंजना लांडगे, सुस्मिता बोरकर, भारत टेंबसे, बेबीनंदा ताकसांडे आणि सुनंदा कोरडे यांना पंजाब नॅशनल बँकेचे पासबुक वितरित करण्यात आले. यावेळी बँकेचे सहायक सरव्यवस्थापक शर्मा यांचीही उपस्थिती होती. वर्ग दोन मधील जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरीत केलेला सातबारा हरिभाऊ तिमांडे, विनोद तिमांडे, ज्ञानेश्वर बलखंडे, शालिक चांभारे आणि नत्थु तिमांडे यांना पालकमंत्र्यांच्याहस्ते वितरित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूयार यांनी केले. संचालन प्रकाश डायरे यांनी केले तर आभार राहुल सारंग यांनी मानले.(प्रतिनिधी)