शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा...! ८ दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
2
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
3
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
4
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
5
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
6
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
7
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
8
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
9
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
10
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
11
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं
12
जेपी इन्फ्राटेकचे एमडी मनोज गौर यांना अटक; १२,००० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आहे आरोप
13
डॉलरसमोर रुपयाची मोठी घसरण! तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बाजारात काय स्थिती?
14
Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
15
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
16
विसरभोळे प्रवासी! ‘इतक्या’ कोटींच्या वस्तू रेल्वेत विसरले, रोज घेता येईल मोठी कार; पाहा, आकडा
17
Court: भटक्या कुत्र्यांमुळे संसारात विघ्न; पत्नीच्या एका सवयीमुळे पतीचा घटस्फोटासाठी अर्ज, नेमकं प्रकरण काय? 
18
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
19
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
20
Bhagvadgeeta: कोणतेही काम एका झटक्यात पूर्ण व्हावे, यासाठी 'हा' श्लोक २१ वेळा म्हणा!

आयुष्यातील प्रत्येक संकटाला आव्हान म्हणून स्वीकारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:55 IST

गुणवंत, ज्ञानवंत, भाग्यवंत आणि कष्टकऱ्यांनी आपले ज्ञान, अपार कष्ट, मेहनत, चिकाटी व प्रामाणीकपणा या जोरावर जे यश प्राप्त केले असते ते समाजापुढे येणे महत्त्वाचे असते. त्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्याकडून भावी आयुष्यात अधिक चांगले समाजोपयोगी व दिशादर्शक काम करण्याची प्रेरणा मिळेल.

ठळक मुद्देरामदास तडस : तैलिक महासभेच्या मेळाव्यात गुणवंतांसह खासदारांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गुणवंत, ज्ञानवंत, भाग्यवंत आणि कष्टकऱ्यांनी आपले ज्ञान, अपार कष्ट, मेहनत, चिकाटी व प्रामाणीकपणा या जोरावर जे यश प्राप्त केले असते ते समाजापुढे येणे महत्त्वाचे असते. त्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्याकडून भावी आयुष्यात अधिक चांगले समाजोपयोगी व दिशादर्शक काम करण्याची प्रेरणा मिळेल. तसेच आपल्या विद्यार्थी जिवनात अनेक संकटे येतात, या आयुष्यातील प्रत्येक संकटाचा आव्हान म्हणून स्वीकार करावा, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा वर्धा जिल्हा व संताजी सेवा सांस्कृतिक मंडळ, कृष्णनगर वर्धा यांच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी आमदार राजू तिमांडे, माधव आनंद महाराज, शेखर शेंडे, सुधाकर सुरकार, रविकांत बालपांडे, प्रविण हिवरे, पंकज सायंकार, मिलिंद भेंडे, नरेंद्र मदनकर, निळकंठ पिसे, संतोष सेलूकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान खासदार रामदास तडस यांची तेली समाजाच्यावतीने लाडूतुला करण्यात आली. शिवाय जाहीर सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमादरम्यान दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर पी.एच.डी. प्राप्त मान्यवरांनाही यावेळी सन्मानीत करण्यात आले. खा. तडस पुढे म्हणाले, दहावी व बारावी नंतर विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याचा विचार करून आपले ध्येय निश्चित करावे. योग्य शिक्षण प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचे आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर जो ज्ञानासाठी करतो, तोच या युगात प्रगती करू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असेही यावेळी सांगितले. याप्रसंगी माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी आमदार राजू तिमांडे, माधव आनंद महाराज, शेखर शेंडे, रविकांत बालपांडे, प्रविण हिवरे यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन वैद्य व हिवरे यानी केले. कार्यक्रमाला प्रशांत बुरले, सुनील शिंदे, शैलेंद्र झाडे, शोभा तडस, सचिन सुरकार, जगन्नाथ लाकडे, नितीन साटोणे, सुधीर चाफले, विनायक तेलरांधे, पुष्पा डायगव्हाणे, सुरेंद्र खोंड, हरिष हांडे, किशोर गुजरकर, अतुल पिसे, चंद्रकांत चामटकर, सतीश इखार, देवा निखाडे, विनोद इटनकर, मनीष तेलरांधे आदींनी सहकार्य केले.