शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

आयुष्यातील प्रत्येक संकटाला आव्हान म्हणून स्वीकारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:55 IST

गुणवंत, ज्ञानवंत, भाग्यवंत आणि कष्टकऱ्यांनी आपले ज्ञान, अपार कष्ट, मेहनत, चिकाटी व प्रामाणीकपणा या जोरावर जे यश प्राप्त केले असते ते समाजापुढे येणे महत्त्वाचे असते. त्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्याकडून भावी आयुष्यात अधिक चांगले समाजोपयोगी व दिशादर्शक काम करण्याची प्रेरणा मिळेल.

ठळक मुद्देरामदास तडस : तैलिक महासभेच्या मेळाव्यात गुणवंतांसह खासदारांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गुणवंत, ज्ञानवंत, भाग्यवंत आणि कष्टकऱ्यांनी आपले ज्ञान, अपार कष्ट, मेहनत, चिकाटी व प्रामाणीकपणा या जोरावर जे यश प्राप्त केले असते ते समाजापुढे येणे महत्त्वाचे असते. त्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्याकडून भावी आयुष्यात अधिक चांगले समाजोपयोगी व दिशादर्शक काम करण्याची प्रेरणा मिळेल. तसेच आपल्या विद्यार्थी जिवनात अनेक संकटे येतात, या आयुष्यातील प्रत्येक संकटाचा आव्हान म्हणून स्वीकार करावा, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा वर्धा जिल्हा व संताजी सेवा सांस्कृतिक मंडळ, कृष्णनगर वर्धा यांच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी आमदार राजू तिमांडे, माधव आनंद महाराज, शेखर शेंडे, सुधाकर सुरकार, रविकांत बालपांडे, प्रविण हिवरे, पंकज सायंकार, मिलिंद भेंडे, नरेंद्र मदनकर, निळकंठ पिसे, संतोष सेलूकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान खासदार रामदास तडस यांची तेली समाजाच्यावतीने लाडूतुला करण्यात आली. शिवाय जाहीर सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमादरम्यान दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर पी.एच.डी. प्राप्त मान्यवरांनाही यावेळी सन्मानीत करण्यात आले. खा. तडस पुढे म्हणाले, दहावी व बारावी नंतर विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याचा विचार करून आपले ध्येय निश्चित करावे. योग्य शिक्षण प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचे आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर जो ज्ञानासाठी करतो, तोच या युगात प्रगती करू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असेही यावेळी सांगितले. याप्रसंगी माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी आमदार राजू तिमांडे, माधव आनंद महाराज, शेखर शेंडे, रविकांत बालपांडे, प्रविण हिवरे यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन वैद्य व हिवरे यानी केले. कार्यक्रमाला प्रशांत बुरले, सुनील शिंदे, शैलेंद्र झाडे, शोभा तडस, सचिन सुरकार, जगन्नाथ लाकडे, नितीन साटोणे, सुधीर चाफले, विनायक तेलरांधे, पुष्पा डायगव्हाणे, सुरेंद्र खोंड, हरिष हांडे, किशोर गुजरकर, अतुल पिसे, चंद्रकांत चामटकर, सतीश इखार, देवा निखाडे, विनोद इटनकर, मनीष तेलरांधे आदींनी सहकार्य केले.