शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

आयुष्यातील प्रत्येक संकटाला आव्हान म्हणून स्वीकारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:55 IST

गुणवंत, ज्ञानवंत, भाग्यवंत आणि कष्टकऱ्यांनी आपले ज्ञान, अपार कष्ट, मेहनत, चिकाटी व प्रामाणीकपणा या जोरावर जे यश प्राप्त केले असते ते समाजापुढे येणे महत्त्वाचे असते. त्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्याकडून भावी आयुष्यात अधिक चांगले समाजोपयोगी व दिशादर्शक काम करण्याची प्रेरणा मिळेल.

ठळक मुद्देरामदास तडस : तैलिक महासभेच्या मेळाव्यात गुणवंतांसह खासदारांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गुणवंत, ज्ञानवंत, भाग्यवंत आणि कष्टकऱ्यांनी आपले ज्ञान, अपार कष्ट, मेहनत, चिकाटी व प्रामाणीकपणा या जोरावर जे यश प्राप्त केले असते ते समाजापुढे येणे महत्त्वाचे असते. त्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्याकडून भावी आयुष्यात अधिक चांगले समाजोपयोगी व दिशादर्शक काम करण्याची प्रेरणा मिळेल. तसेच आपल्या विद्यार्थी जिवनात अनेक संकटे येतात, या आयुष्यातील प्रत्येक संकटाचा आव्हान म्हणून स्वीकार करावा, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा वर्धा जिल्हा व संताजी सेवा सांस्कृतिक मंडळ, कृष्णनगर वर्धा यांच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी आमदार राजू तिमांडे, माधव आनंद महाराज, शेखर शेंडे, सुधाकर सुरकार, रविकांत बालपांडे, प्रविण हिवरे, पंकज सायंकार, मिलिंद भेंडे, नरेंद्र मदनकर, निळकंठ पिसे, संतोष सेलूकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान खासदार रामदास तडस यांची तेली समाजाच्यावतीने लाडूतुला करण्यात आली. शिवाय जाहीर सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमादरम्यान दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर पी.एच.डी. प्राप्त मान्यवरांनाही यावेळी सन्मानीत करण्यात आले. खा. तडस पुढे म्हणाले, दहावी व बारावी नंतर विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याचा विचार करून आपले ध्येय निश्चित करावे. योग्य शिक्षण प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचे आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर जो ज्ञानासाठी करतो, तोच या युगात प्रगती करू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असेही यावेळी सांगितले. याप्रसंगी माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी आमदार राजू तिमांडे, माधव आनंद महाराज, शेखर शेंडे, रविकांत बालपांडे, प्रविण हिवरे यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन वैद्य व हिवरे यानी केले. कार्यक्रमाला प्रशांत बुरले, सुनील शिंदे, शैलेंद्र झाडे, शोभा तडस, सचिन सुरकार, जगन्नाथ लाकडे, नितीन साटोणे, सुधीर चाफले, विनायक तेलरांधे, पुष्पा डायगव्हाणे, सुरेंद्र खोंड, हरिष हांडे, किशोर गुजरकर, अतुल पिसे, चंद्रकांत चामटकर, सतीश इखार, देवा निखाडे, विनोद इटनकर, मनीष तेलरांधे आदींनी सहकार्य केले.