शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

भिडीचा प्रवासी निवारा कोसळण्याच्या स्थितीत

By admin | Updated: August 29, 2014 00:02 IST

स्थानिक प्रवासी निवाऱ्याच्या दुरुस्तीकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे येथील निवाऱ्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून तो कधी कोसळेल, याची शाश्वती नाही.

भिडी : स्थानिक प्रवासी निवाऱ्याच्या दुरुस्तीकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे येथील निवाऱ्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून तो कधी कोसळेल, याची शाश्वती नाही. यामुळे जीवितहानी होण्याचा धोका वाढला आहे. हा प्रकार टाळण्याकरिता या समस्येची दखल घेऊन येथे नवीन प्रवासी निवारा बांधावा, अशी येथील नागरिकांनी मागणी केली आहे.भिडी बसस्थानक हे परिसरातील नागरिकांकरिता महत्त्वाचे आहे. नागपूर-यवतमाळ या राज्य मार्गावर भिडी गाव येते. या गावावरुन यवतमाळ, माहुर, मरठवाडा तसेच वर्धा, नागपूर येथे जाण्याकरिता बसगाड्या मिळतात. शिअवाय येथे काही जलद बसगाड्यांचे थांबे देण्यात आले आहे. यामुळे जवळपास २० ते २५ गावातील प्रवासी येथील बसथांब्यावरून गाडी घेतात. येथील प्रवासी निवाऱ्यावरुन परिसरातील गावाकडे जाण्याकरिता बस मिळते. यामुळे १० ते १२ खेड्यावरील प्रवासी येथून ये-जा करतात. येथील प्रवासी निवाऱ्यावर कायम वर्दळ असते. दररोज येथून ४०० ते ५०० प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे येथील प्रवासी निवारा महत्त्वाचा आहे. परिवहन मंडळाला भिडी स्थानकावरुन चांगले आर्थिक उत्पन्न प्राप्त होते. परंतु येथे सुविधा देण्याकडे परिवहन मंडळाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा प्रत्यय येथील नागरिकांना येतो. स्थानिक प्रवासी निवाऱ्याच्या भिंतीला मोठमोठे तडे गेले आहे. ती भिंत केव्हाही कोसळू शकेल अशा स्थितीत आहे. तरीही त्याची साधी डागडूजी केली जात नाही. यासह येथे प्रवाशांना बसण्याची योग्य व्यवस्था नाही. येथे दिवसाला अनेक प्रवासी येतात तरीही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली नाही. प्रवासी निवाऱ्याची दैनावस्था प्रवाशांच्या जीवावर बेतणारी ठरु शकते. विशेषत: विद्याथी या प्रवासी निवाऱ्यात थांबत असतात. मोठी दुर्घटना होण्यापूर्वी येथील प्रवासी निवारा त्वरीत बांधण्यात यावा, अशी ग्रामस्थ व प्रवाश्यांची मागणी आहे. संबंधित विभागाने लक्ष देत कार्यवाही अरुन प्रवासी, विद्यार्थी यांना दिलासा देण्याची मागणी आहे.(वार्ताहर)