शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांनंतरही वाढीव पाणीपुरवठा योजना अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 05:00 IST

कत्राटदाराला ११ एप्रिल २०१७ मध्ये कार्यारंभ आदेश दिला. प्राकलनानुसार १८६ कि.मी.ची पाईपलाईन व ११ नवीन जलकुंभाचा समावेश असून कामाचा कालावधी २ वर्षांचा निर्धारित केला होता. पण, निर्धारित वेळेत काम होत नसल्याने कंत्राटदाराला प्रतिदिन ७७ हजार रुपये दंडाची नोटीस बजावली होती. तरीही निर्धारित कालावधीत काम पूर्ण झाले नाही.

ठळक मुद्देएक दिवसाआड पाणीपुरवठा : हिंगणघाटवासीयांना सोसावी लागतेय झळ

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहरातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी अमृत योजने अंतर्गत मंजूर झालेली ४४ कोटी ४१ लाख रुपयांची योजना निर्धारित कालावधीपेक्षा एक वर्ष जास्त होऊनही पूर्णत्वास गेली नाही. त्यामुळे यावर्षीही नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नारिकांना पाण्याची झळ सोसावी लागत आहे. त्यामुळे कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.वणा नदी काठावरील या शहरात दररोज प्रतिव्यक्तीला ९० लिटर पाणीपुरवठा करण्यासाठी शहरातील नळ योजना कमी पडत आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्याने विस्तारीत शहराची पाण्याची गरज भागविण्याकरिता अमृत योजनेंतर्गत ४४ कोटीं ४१ लाखाची पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली. कत्राटदाराला ११ एप्रिल २०१७ मध्ये कार्यारंभ आदेश दिला. प्राकलनानुसार १८६ कि.मी.ची पाईपलाईन व ११ नवीन जलकुंभाचा समावेश असून कामाचा कालावधी २ वर्षांचा निर्धारित केला होता. पण, निर्धारित वेळेत काम होत नसल्याने कंत्राटदाराला प्रतिदिन ७७ हजार रुपये दंडाची नोटीस बजावली होती. तरीही निर्धारित कालावधीत काम पूर्ण झाले नाही. आता पुन्हा एक वर्ष लोटूनही शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी मार्केट जवळील जलकुंभ, तहसील कार्यालय समोरील जलकुंभ व रामनगर वार्डातील न्यू म्युनिसिपल हायस्कूल परिसरातील जलकुंभाचे काम रखडले आहे. त्यामुळे ही वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करता येत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.जीवन प्राधिकरणचे होतेय दुर्लक्षया कामाच्या देखरेखेची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे सोपविली आहे.पण, त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे कंत्राटदाराची मनमर्जी सुरु आहे. अधिकाऱ्यांकडून नियमित देखरेख ठेवण्याऐवजी नागपुरातून कारभार चालवित आहे. या ठिकाणी सुरक्षिततेला बगल दिली जात आहे. ११ डिसेंबर २०१८ ला रामनगर वार्डातील न्यू म्युनिसिपल हायस्कूल परिसरातील जलकुंभाच्या कामादरम्यान एक मजूर पडून दगावला. गेल्यावर्षी आंबेडकर चौकात पाईपलाईनकरिता खोदलेल्या ७ फूट खड्यात मोहम्मद हुसैन हसन अली अजानी हा ४ वर्षीय बालक पडला होता पण; वेळीच मदत मिळाल्याने त्याचे प्राण वाचले.अमृत योजनेअंतर्गत शहराची वाढीव पाणीपुरवठा योजना विविध कारणांमुळे निर्धारित कालावधीत पूर्णत्वास आली नाही. सद्या स्थितीत कोरोनाचा प्रादुभार्वामुळे काम बंद आहे. तरी कंत्राटदाराकडून साहित्याची जुळवाजुळव सुरु असून सोशल डिस्टन्सिंग ठेवून कामाची सुरुवात करण्यात येईल. येत्या महिन्यात उर्वरीत कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.- दिनेश तपासे, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, न.प.हिंगणघाट.

टॅग्स :Waterपाणी