शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

३२ वर्षांनंतरही संपादित जमिनी सातबारावरच

By admin | Updated: June 22, 2016 01:54 IST

शासनाने सिंचनासाठी धरणांची निर्मिती केली. तालुक्यातही अप्पर वर्धा धरणाच्या डाव्या कालव्याची निर्मिती झाली.

शेतकऱ्यांकडून संपादित जमिनीचे होताहेत खरेदी-विक्रीचे व्यवहार अमोल सोटे आष्टी (शहीद)शासनाने सिंचनासाठी धरणांची निर्मिती केली. तालुक्यातही अप्पर वर्धा धरणाच्या डाव्या कालव्याची निर्मिती झाली. यावेळी बुडीत क्षेत्रातील जमिनी संपादित केल्या. त्याचा मोबदलाही शेतकऱ्यांना देण्यात आला; मात्र शासकीय ‘काम अन् वर्षोगिनती थांब’ याचा प्रत्यय येथे येत आहे. कालव्यांसाठी संपादित जमिनीची आराजी ३२ वर्षांनंतरही सातबारावर कायम आहे. या नोंदी कमी करण्याचे काम तहसीलदार व पटवाऱ्यांचे आहे. याकडे त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे उघड होत आहे. परिणामी शेतकरी या संपादित जमिनीची खरेदी विक्री करीत असल्याचे समोर येत आहे. अप्पर वर्धा प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते १८ डिसेंबर १९७६ रोजी झाले. या धरणाअंतर्गत डावा कालवा ४२.४० किमी तर उजवा कालवा ९५.५० किमी बांधण्यात आला. त्याचे एकूण सिंचनक्षेत्र १ लाख ४ हजार ४०० हेक्टर आहे. सिंचन क्षमता एकूण लाभक्षेत्र १ लक्ष १६ हजार ९७० हेक्टर असून मशागत योग्य लाभक्षेत्र ९३ हजार ६०३ हेक्टर, सिंचनाखाली लाभक्षेत्र ७० हजार १६९ हेक्टर आले आहे. या धरणाचे काम १९९३ साली पूर्ण झाले. १९८२ मध्ये तालुक्यातील जमीन डाव्या कालव्यासाठी संपादीत करून मोबदला देण्यात आला. कालवे, पाटसऱ्या बांधकाम पूर्ण झाले. शेतकऱ्यांच्या सातबारावर एकूण आराजीमधून बुडीत क्षेत्राची (संपादित) आराजी कमी होणे आवश्यक असताना तसे झाले नाही. त्या आजही कायम आहे. शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयाकडे मागणी करूनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी खरेदी-विक्री करताना पूर्ण जमिनीचीच करीत आहे.