शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकली; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
2
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
3
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
5
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
6
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
7
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
8
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
9
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
10
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
11
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
12
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
13
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
14
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
15
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
16
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
17
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
18
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
19
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
20
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
Daily Top 2Weekly Top 5

७५७ अर्जांमध्ये आढळल्या त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 06:00 IST

विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अंती वर्धा विधानसभा मतदार क्षेत्रात ३ लाख १६ हजार ३५० मतदार असल्याचे पुढे आले. शिवाय काही अपवाद वगळता त्यांनी मतदानाचा हक्कही बजावला. पण याच निवडणुकीदरम्यान आणखी काही नव मतदार असल्याचे आणि त्यांनी नोंदणीच केली नसल्याचे पुढे आले होते.

ठळक मुद्देमतदार नोंदणी कार्यक्रम । त्रुटी दूर न केल्यास नोंदणी नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या सर्वसाधारण मतदार नोंदणीचा कार्यक्रम जिल्ह्यात राबविला जात आहे. आतापर्यंत तब्बल १० हजार ८६२ नागरिकांनी तालुकाकचेरीतील निवडणूक विभागाकडे नाव नोंदविणे, नाव कमी करणे, नावात दुरूती करणे, पत्ता किंवा यादी भाग क्रमांक बदलविण्यासाठी रितसर अर्ज केले आहेत. सदर अर्जांची छानणी युद्धपातळीवर सुरू असून ७५७ अर्जामध्ये विविध त्रुट्या आढळून आल्याने अर्जदारांना एसएमएस करण्यात आले आहेत. सदर त्रुटींची पूर्तता वेळीच न केल्यास अर्जदाराला मतदानापासूनच वंचित राहवे लागणार आहे.विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अंती वर्धा विधानसभा मतदार क्षेत्रात ३ लाख १६ हजार ३५० मतदार असल्याचे पुढे आले. शिवाय काही अपवाद वगळता त्यांनी मतदानाचा हक्कही बजावला. पण याच निवडणुकीदरम्यान आणखी काही नव मतदार असल्याचे आणि त्यांनी नोंदणीच केली नसल्याचे पुढे आले होते. त्यामुळे निवडणूक विभागाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन नव्याने मतदार नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या नव्या मतदार नोंदणी कार्यक्रमानुसार १२ एप्रिल २०२० पर्यंत नागरिकांना नाव नोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे. मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरू झाल्यापासून २० फेबु्रवारीपर्यंत नाव नोंदणीसाठी १ हजार ८४०, नाव कमी करण्यासाठी ४ हजार ४९२, नावात दुरूस्तीसाठी ३ हजार ९६७ तर पत्ता किंवा यादी भाग बदलासाठी ५६३ व्यक्तींनी आॅफलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत. या अर्जाची छानणी सध्या युद्धपातळीवर होत असून ७५७ अर्जांमध्ये त्रुट्या आढळून आल्या आहेत. ज्या व्यक्तीच्या अर्जात त्रुटी आढळली त्या व्यक्तीस त्रुटीबाबतची माहिती एसएमएसद्वारे देण्यात आली आहे.५७२ व्यक्तींनी सादर केली नाही ‘रेफरन्स कॉपी’मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर अनेक व्यक्ती करतात. पण ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जदाराने रेफरन्स कॉपी तालुक्याच्या निवडणूक कार्यालयात वेळीच सादर करणे क्रमप्राप्त आहेत. पण ऑनलाईन पद्धतीचा वापर करून अर्ज करणाऱ्या ५९२ व्यक्तींपैकी सुमारे ५७२ अर्जदारांनी रेफरन्स कॉपीच वर्धा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाकडे सादर केलेले नाहीत. रेफरन्स कॉपी न सादर करणाऱ्यांची त्रुट्यांअभावी नोंदणीच होणार नसल्याचे सांगण्यात आले.मतदान केंद्रांवर होताहेत याद्या प्रसिद्धतालुका प्रशासनाच्या निवडणूक विभागाकडून अर्ज नमुना सात प्राप्तचे नमुना १० मधील २८ याद्या मतदान केंद्रांवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तर नमुना आठ प्राप्तचे नमुना ११ मधील ७१ याद्या मतदान केंद्रांवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यावर नागरिकांना आक्षेप नोंदविता येणार आहे.नव मतदारांची नोंदणी व्हावी. शिवाय अचूक मतदार यादी तयार व्हावी यासाठी निवडणूक विभागाच्या सूचनेवरून मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू आहे. ज्या अर्जात त्रुट्या आढळल्या त्या अर्जदारांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात आली आहे. त्यांनी त्रुट्यांची वेळीच पूर्तता करणे क्रमप्राप्त आहे.- भगवान वनकर, नायब तहसीलदार, निवडणूक वर्धा.

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदान