शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वीजेच्या लपंडावाने उद्योजक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 22:31 IST

औद्योगिक क्षेत्रामध्ये चोवीस तास विद्युत पुरवठा करणे बंधनकारक असतानाही महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडीत केल्या जात आहे. यामुळे उद्योगांना फटका बसत असल्याने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याकडे वारंवार तक्रार करुनही कानाडोळा केला जातो.

ठळक मुद्देएमआयडीसी : असोसिएशनच्या तक्रारीकडे अधीक्षक अभियंत्याचा कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : औद्योगिक क्षेत्रामध्ये चोवीस तास विद्युत पुरवठा करणे बंधनकारक असतानाही महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडीत केल्या जात आहे. यामुळे उद्योगांना फटका बसत असल्याने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याकडे वारंवार तक्रार करुनही कानाडोळा केला जातो. असा आरोप संतप्त एमआयडीसी असोसिएशन च्यावतीने करण्यात आला आहे.ग्राहकांना सेवा पुरविण्यात अव्वल असल्याचा डांगोरा पिटणाऱ्या महावितरणचे अनेक तापदायक प्रकार उघडकीस येत आहे. सुरुवातील मीटरच्या तुटवड्याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागला. तसेच तुटलेली विद्यूत जोडणी दुरुस्त करण्यासाठी महिनाभर शेतकºयांना प्रतिक्षा करावी लागते तर काही ठिकाणी वारंवार तक्रारीकरुनही महावितरणचे अधिकारी विद्युत चोरीला आळा न घालता सहकार्य करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. आता तर औद्योगिक क्षेत्रालाच महावितरणने अडचणीत आल्याचे तक्रारीअंती पुढे आले आहे. एमआयडीसी परिसरात चोवीस तास उद्योग सुरु राहत असल्याने येथे विद्युतही चोवीस तास पुरविणे अपेक्षीत आहे. परंतू एमआयडीसी परिसरात वारंवार उद्योजगांना विद्युत खंडणाचा त्रास सहन करावा लागतो. उद्योग बंद राहिला तर कामगार व उत्पादनातील नुकसानही उद्योजकांना सहन करावे लागतात. महावितरणच्या या हलगर्जीपणामुळे उद्योजकांना लाखो रुपयाचे नुकसान सहन करावे लागत असल्याची ओरड असोसिएशनकडून होत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन उद्योजकांची समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.तासभरात लाखोंचे नुकसानएमआयडीसीतील उद्योजकांना रविवारी चांगलाच फटका सहन करावा लागला. दुपारी साडेबारा वाजतादरम्यान जवळपास एक तास विद्युत पुरवठा बंद राहिला. त्यामुळे परिसरातील सर्वच उद्योग ठप्प पडल्याने लाखो रुपयाचे नुकसान उद्योजकांना सहन करावे लागले. यासंदर्भात महावितरणडे तक्रार करुनही प्रश्न सुटत नसल्याने नागपूर येथील मुख्य अभियंत्याकडे तक्रार करण्यात आली आहे.अधीक्षक अभियंत्याची मुख्यालयाला दांडीरविवारी एमआयडीसी परिसरातील विद्यूत पुरवठा तासभरासाठी खंडीत करण्यात आल्याने एमआयडीसी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे यांना भेटण्यासाठी वेळ मागितला.पण,त्यांनी वेळ दिला नाही. तसेच मुख्य अभियंता घुगल यांनाही फोन केला असता प्रतिसाद दिला नसल्याचे असोसिएशनकडून सांगण्यात आले. आज सुटीचा दिवस असल्याने अधिकारी मुख्यालयी नव्हते. त्यांनी भ्रमणध्वनीवर प्रतिसाद देणे अपेक्षीत होते. परंतु तसे केले नसल्याने तक्रार कुणाकडे करावी, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.उद्योगांचा कारभार हा वीजेवरच अवलंबून आहे. त्यासाठी उद्योजक लाखो रुपयाचे देयकही अदा करतात.परंतु तरीही उद्योजकांना दररोज वीजेच्या लपंडावाचा सामना करावा लागतो. तसेच विद्युत देयकही वेळेवर मिळत नसल्याने उद्योजकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागतो. आधीच मंदीचा काळ असतांना विद्युत वितरणच्या भोंगळ कारभारामुळे नुकसान सहन करावे लागत असल्याने उद्योग बंद पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.अधीक्षक अभियंता संपर्क क्षेत्राबाहेरएमआयडीसीतील अडचणींबाबत माहिती जाणून घेण्यासाठी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी संपर्क क्षेत्राबाहेर असल्याचे सांगत होता.वीजेचा लपंडाव हा नेहमीचाच झाला आहे. या महिन्यात आठवेळा विद्यूत पुरवठा खंडीत झाल्याने उद्योजकांना नुकसानीचा सामना करावा लागता. माझ्या एकट्याचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले असून या एमआयडीसीत दीडशेच्या आसपास उद्योजक आहेत. त्यामुळे लाखोंचे नुकसान सहन करावे लागत आहे. याबाबत वारंवार तक्रार करुनही अधीक्षक अभियंता देशपांडे लक्ष देत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.- प्रवीण हिवरे, अध्यक्ष एमआयडीसी असोसिएशन, वर्धा

टॅग्स :electricityवीज