शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जिल्ह्यात सर्वदूर संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 23:36 IST

गुरूवारपासून सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारीही आपला जोर कायम ठेवल्याने जिल्ह्यातील आठही तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. जिल्ह्यात संततधार सुरू असलेल्या पावसामुळे तसेच वर्धा जिल्ह्या शेजारील नागपूर येथे मुसळधार पाऊस.....

ठळक मुद्देजनजीवन विस्कळीत : प्रशासनाने दिला तालुक्यांना सतर्कतेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गुरूवारपासून सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारीही आपला जोर कायम ठेवल्याने जिल्ह्यातील आठही तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. जिल्ह्यात संततधार सुरू असलेल्या पावसामुळे तसेच वर्धा जिल्ह्या शेजारील नागपूर येथे मुसळधार पाऊस झाल्याने वर्धा जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्ह्यातील आठही तालुका प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला.जूनच्या दुसऱ्या व शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांसह पावसाच्या प्रतीक्षेत असलेले अनेक जण सुखावले असले तरी संततधार पावसामुळे जनजीवन बऱ्यापैकी विस्कळीत झाले होते. सदर दमदार पावसामुळे रखडलेल्या पेरण्या पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे शेतकरी सांगतात. तर जिल्ह्यातील छोट्या व मोठ्या तसेच मध्यम जलाशयामधील पाणी पातळीवर बऱ्यापैकी वाढही झाली आहे. मोठ्या व मध्यम जलायशात मोडल्या जाणाऱ्या मदन उन्नई धरणाची पाणी पातळी अतिशय कमी झाली होती. शिवाय छोट्या जलाशयात मोडल्या जाणाऱ्या वर्धा शहरानजीकच्या रोठा १ व रोठा २ तसेच टाकळी बोरखेडी या जलाशायाची पाणी पातळी ‘बिलो’ होती; पण गुरूवारी रात्री पासून झालेल्या मुसळधार पावसामुळे याही जलाशयातील पाणी पातळीत वाढ झाल्याचे सांगण्यात येते.पोलीस प्रशासनही दक्षगुरूवारी रात्री पासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील कुठले-कुठले रस्ते बंद झालेत. शिवाय कुठे अनुचित प्रकार तर घडला नाही ना याची विचारणा जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांकडून जिल्हा पोलीस यंत्रणा शुक्रवारी वेळोवेळी करीत होते. जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती ओढावल्यास तात्काळ मदत कार्य करण्यासाठी पोलीस प्रशासन दक्ष असल्याचे दिसून आले.नागपूरकरांच्या मदतीसाठी वर्धेची रबर मोटर बोटनागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने सदर तालुक्यातील किरमिटी गाव परिसरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. त्या गावातील नागरिकांना मदत कार्य करण्यासाठी वर्धा जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी त्यांच्याकडे असलेली एक रबर मोटर बोट पाठविल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी दुपारी २.५५ वाजेपर्यंत बोट झटपट कशी पाठविता येईल यासाठीचे प्रयत्न सुरू होते.२०२.९३ मिमी पावसाची नोंदजिल्ह्यात गत २४ तासात एकूण २०२.९३ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. वर्धा तालुक्यात २६.१० मिमी, सेलू तालुक्यात ४४.०० मिमी, देवळी १६.०० मिमी, हिंगणघाट ३०.३२ मिमी, समुद्रपूर ३६.१८ मिमी, आर्वी ३०.५७ मिमी, आष्टी ७.१३ मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात १२.७५ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्याची सरासरी २५.३७ इतकी असल्याचे सांगण्यात आले.सीमावर्ती भागात ‘अलर्ट’नागपूर जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत सुमारे १६० मिमी पाऊस झाल्याचे सांगितले जात असल्याने वर्धा-नागपूर या सीमावर्ती भागातील नदी व मोठ्या नाल्या काढच्या गावांना वर्धा जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती निवारण विभागाच्यावतीने सतर्कतेचा इशारा दिला आहे. शिवाय वर्धा जिल्ह्यातील आठही तालुका प्रशासनाला कुठल्याही पूर परिस्थिशी दोन-दोन हात करण्यासाठी सज्ज करण्यात आले आहे.वायगाव (गोंड)-लाहोरीची वाहतूक ठप्पसमुद्रपूर : सततच्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी वाघाडी नदी दुथडी भरून वाहत होती. वाघाडी नदीच्या पूरामुळे वायगाव (गोंड) - लाहोरी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शिवाय परिसरातील काही शेत जमिनींना पावसाच्या पाण्यामुळे तळ्याचे स्वरूप आले होते. तालुक्यातील कांढळी तसेच गिरड परिसरातील नद्या दुथडी भरून वाहत असल्याने या परिसरातील काही भागात पूर सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती.नंदोरी-हिंगणघाट मार्ग पुरामुळे बंदनंदोरी : गुरूवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारीही आपला जोर कायम ठेवल्याने परिसरातील नदी व नाले दुथडी भरून वाहत असल्याचे दिसून आले. नंदोरी-हिंगणघाट मार्गावरील सावली गावाजवळील नदीला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद पडली होती.

टॅग्स :Rainपाऊस