शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

कामात आनंद मानला की सगळं जमतं!

By admin | Updated: January 24, 2015 22:59 IST

आतापर्यंतचं आयुष्य केवळ कष्ट उपसण्यात गेलं. पण हाताला चव होती म्हणून लोकांना खाऊ घालण्याचं काम इमानदारीनं केलं. मुख्य म्हणजे त्यात समाधान मानलं. त्यामुळे लोकही चांगलच बोलतात.

रस्त्यावरचे जीवन : कामाच्या धडपडीने दिले आशाबार्इंना बळपराग मगर - वर्धाआतापर्यंतचं आयुष्य केवळ कष्ट उपसण्यात गेलं. पण हाताला चव होती म्हणून लोकांना खाऊ घालण्याचं काम इमानदारीनं केलं. मुख्य म्हणजे त्यात समाधान मानलं. त्यामुळे लोकही चांगलच बोलतात. हे सगळ आशाबाई ठेल्यावर काम करताना सहज सांगतात. कामाची लय अचूक साधत त्या आपल्या भावनांना वाट मोकळी करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सारं काही सांगून जातो. ४५ ते ५० च्या आसपास असलेल्या आशा राम गोडे थोडीथोडकी नव्हे तर १३ वर्षांपासून आर्वी नाका परिसरात ठेला चालवितात. त्या सांगतात, अगदी सहा महिन्याच्या असतानाच त्यांचा हात भाजला. त्यामुळे बोटांना काहीसं अधूपन आलं. शिक्षण जेमतेम तिसरीपर्यंतच, घरची परिस्थिती बेताचीच. त्यामुळे घरोघरी स्वयंपाक करायला सुरुवात केली. लग्नानंतरही सगळं लयबद्ध सुरू होत. कामाची धडपड आणि येत असलेला स्वयंपाक पाहून मदतीचा हात दिलेल्या काही जवळच्यांनी स्वतंत्र ठेला टाकून स्वत:चा व्यवसाय टाकण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला भीती वाटली पण आपण सर्वांशी चांगलं असलं की सगळे आपल्याशीही चांगलच वागतात या मतावर विश्वास ठेवत ठेला सुरू केला. आज पोटाची निकड भागते. लोकही खाऊन सुखी होतात. मग आणखी काय हवं. मूल बाळ नाही, नवऱ्याच्या डोळ्याचं आॅपरेशन झालं आहे. त्यामुळे आता केवळ नवऱ्यासाठीच जगायच आहे. आतापर्यंत कामात देव मानला. आताही तेच करायचं असं जगण्याचं साधं सोपं तत्वज्ञान त्या काम करतानाच सांगून मोकळ्या होतात.