शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय आबादीच्या जागेवर शेतकऱ्याचे अतिक्रमण

By admin | Updated: June 22, 2015 01:53 IST

गावाबाहेरील हनूमान मंदिराच्या मागील परिसरात शासकीय आबादी जमिनीवर दोन वर्षांपासून एका शेतकऱ्याने अतिक्रमण करीत अवैधरित्या कब्जा केला आहे.

सहा महिन्यांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष : चार शेतकऱ्यांची वहिवाट झाली बंद; कारवाई करण्यास चालढकलकारंजा (घा.) : गावाबाहेरील हनूमान मंदिराच्या मागील परिसरात शासकीय आबादी जमिनीवर दोन वर्षांपासून एका शेतकऱ्याने अतिक्रमण करीत अवैधरित्या कब्जा केला आहे. या जमिनीवर पेरणी करून सदर शेतकरी मालकी हक्क गाजवित आहे. एवढेच नव्हे तर भोवतालच्या चार शेतकऱ्यांची शेतात जाण्याची वहिवाटच बंद केली आहे. यामुळे त्या शेतकऱ्यांची पेरणीची कामे खोळंबली आहेत. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.या अतिक्रमणामुळे मारोती नामदेव कदमधाड सर्व्हे क्र. १०३१, १०३०, १०२१, भाऊराव डोमाजी बेलखेडे सर्व्हे क्र. १०२६, गणपत नत्थूजी सरोदे सर्व्हे क्र. १०२५ व किशोर भाऊराव मुकदम सर्व्हे क्र. १०२२ हे शेतकरी त्रस्त झाले आहे. त्यांची शेताची वहिवाट बंद झाल्याने शेतातील कामे खोळंबली आहेत. यामुळे शासकीय आबादी जागेवरील अतिक्रमण काढावे व वहिवाटीचा रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी ३० डिसेंबर २०१४, १४ जानेवारी व ४ फेबु्रवारी २०१५ रोजी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, पंचायत समिती, जिल्हाधिकारी यांना तक्रार सादर केली. ७ फेबु्रवारी रोजी विभागीय आयुक्तांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्वरित चौकशी करून अहवाल सादर करा व शेतकऱ्यांना कळवा, असे पत्र दिले; पण कार्यालयाने या पत्राला केराची टोपली दाखवित अतिक्रणधारकास पाठीशी घातले. गुरूवारी त्रस्त शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार गणेश बर्वे व तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांना भेटून कैफियत मांडली. संबंधित शेतकऱ्याला पेरणी करण्यापासून अटकाव करावा, अशी मागणी केली. यावर बर्वे यांनी सदर शेतकरी पेरणी करणार नाही. मी त्याला तसे पत्र देतो, असे सांगितले; पण शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या रमेश पांडुरंग सरोदे या शेतकऱ्याने शुक्रवारी पेरणी सुरू करून अरेरावीचा प्रत्यय दिला. पेरणी झाल्यानंतर शेतात जाता येणार नाही व गेल्यास अतिक्रमणधारक वाद घालेल, या भीतीने शुक्रवारी चारही शेतकऱ्यांनी गैरअर्जदार पेरणी करीत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांना कळविले. यावर तहसीलदार बालपांडे यांनी अतिक्रणधारक शेतकरी रमेश सरोदे यांनी पेरणी करू नये, असे पत्र दिले आहे. यावरही त्याने पेरणी केली तर फौजदारी गुन्हा दाखल करू, अशी ग्वाही दिली; पण अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. वरिष्ठांनी याकडे लक्ष देत आबादी जमिनीवरील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)विभागीय आयुक्तांच्या आदेशालाही केराची टोपलीवहिवाट बंद झालेल्या चार शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली. यावरून अतिक्रमण हटविण्याचे आदेश देण्यात आले होते; पण या आदेशालाही केराची टोपली दाखविण्यात आली. एक वर्षापासून कारवाई करण्यास टाळाटाळ करणारे तहसीलदार खरोखरच कारवाई करणार काय, शासकीय जमीन ताब्यात घेतील काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. २१ मे रोजी मंडळ अधिकाऱ्याने जागेची पाहणी करून सरोदे यांनी जेसीबीद्वारे आबादी जमीन उठीत केल्याचे अहवालात नमूद केले आहे; पण तहसीलदार बालपांडे यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.आबादी जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यास पेरणी न करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. यानंतरही शेतकऱ्याने पेरणी केली तर त्याच्या विरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.- गजेंद्र बालपांडे, तहसीलदार, कारंजा (घा.).