शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीच्या शासकीय केंद्रांवर कर्मचाऱ्यांची बोंब

By admin | Updated: February 26, 2017 00:49 IST

तुरीचे दर पडल्याने शासनाने नाफेड आणि भारतीय खाद्य निगमच्या माध्यमातून शासकीय दरात तूर खरेदीचा निर्णय घेतला.

शेतकऱ्यांचे उपनिबंधकांना साकडे : पुरक सेवा देण्याच्या सूचना रूपेश खैरी   वर्धा तुरीचे दर पडल्याने शासनाने नाफेड आणि भारतीय खाद्य निगमच्या माध्यमातून शासकीय दरात तूर खरेदीचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार जिल्ह्यातील बाजार समित्यांत या दोन्ही शासकीय एजन्सीचे केंद्र सुरू केले; मात्र येथे कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची बोंब असल्याने तूर घेवून आलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. वर्धा जिल्ह्यात बाजार समिती आणि त्यांच्या उपबाजारातून शेतमालाची खरेदी होत आहे. व्यापाऱ्यांकडून मिळणारे अत्यल्प दर टाळण्याकरिता नाफेडची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली. त्याच्या मदतील भारतीय खाद्य निगम आणि विदर्भ मार्केटींग फेडरेशनच्यावतीने हमीभावात तुरीची खरेदी होत आहे. यामुळे केंद्रावर शेतकऱ्यांची आवक वाढत आहे. अनेकांनी दर वाढीच्या प्रतीक्षेत तूर घरीच ठेवली होती. आणि आता तुरीचे नवे उत्पादनही निघणे सुरू झाले आहे. यामुळे बाजारात तुरीची आवक वाढत आहे. बाजारातील दर हमीभावापेक्षा कमी असल्याने शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी आहे; मात्र येथे कर्मचाऱ्यांची कमतरता शेतकऱ्यांकरिता डोकेदुखी ठरत आहे. शासकीय केंद्रावर तुरीची वाढलेली आवक आणि असलेली कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ होत आहे. शेतमाल घेवून आलेल्या शेतकऱ्यांना रात्र बाजार समितीच्या आवारातच काढावी लागत आहे. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी उपनिबंधक कार्यालयात धाव घेतली. शेतकऱ्यांच्या या तक्रारीवरून उपनिबंधक कार्यालयात नाफेड आणि भारतीय खाद्य निगमच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बाजार समितीच्या सभापतींची बैठक झाली. या बैठकीत केंद्रावरील कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या, तसेच शेतकऱ्यांची होत असलेली धावपळ थांबविण्याकरिता नवे केंद्र सुरू करण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती आहे. सात केंद्रातून ४७ हजार क्विंटल खरेदी जिल्ह्यातील सात शासकीय खरेदी केंद्रांमधून ४६ हजार ८२५ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. त्यामध्ये आर्वीत १२ हजार ६८६ क्विंटल, हिंगणघाट १९ हजार ५२२, वर्धा ४ हजार ५३१, सेलूत ६ हजार १४९, सिंदी (रेल्वे)त दोन हजार ९३६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकरिता ही कागदपत्रे आवश्यक शासकीय यंत्रणेला तुरीची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना काही कागदपत्रेही सोबत द्यावी लागत आहेत. त्यामध्ये सातबारा, पेरापत्रक, ओळखपत्र तसेच बँक पासबुकाची झेरॉक्स यंत्रणेला द्यावयाची आहे. जास्तीत जास्त वेळ होणार खरेदी जिल्ह्यात बाजार समितीत्यात नाफेड आणि भारतीय खाद्य निगमच्यावतीने शासकीय दरात तूर खरेदी होत आहे. मात्र हे केंद्र मोजकेच काळ सुरू राहत असल्याने येथे येणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण होते. वेळ संपल्याने अनेक शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल घेवून परतीचा मार्ग पकडावा लागत आहे. यात त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. यामुळे बाजार समितीतील केंद्र अधिकाधिक काळ सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. तीन नवे केंद्र सुरू होणार सध्या हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, कारंजा (घाडगे) केंद्रावरून नाफेडची खरेदी होत आहे. तर वर्धा, सेलू आणि सिंदी येथे भारतीय खाद्य निगमची खरेदी आहे. यामुळे या केंद्रावर परिसरातील शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी करण्याकरिता आणखी तीन नवे केंद्र उघडण्यात येणार आहे. यात समुद्रपूर, देवळी आणि सिंदी बाजार समितीचा समावेश आहे.