शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
2
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
3
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
4
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
5
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
6
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
7
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
8
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
9
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
10
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
11
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
12
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली
13
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
14
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
15
Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!
16
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
17
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
18
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
19
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
20
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?

आपत्तीकाळात शुल्कवाढीऐवजी श्रेष्ठतम शिक्षणावर भर; महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 12:39 IST

शुल्कवाढ न करता देशातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत स्वस्त आणि श्रेष्ठतम शिक्षण दिले जाईल, असे मत हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा.रजनीश कुमार शुक्ल यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकुलगुरूंचे प्रतिपादनभारतातील एकमेव विद्यापीठ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड काळामध्ये सर्वच घटकांवर विपरित परिणाम झाला आहे. यातून शिक्षण क्षेत्रही सुटलेले नाही पण, समाजाच्या अगदी शेवटच्या घटकातील विद्यार्थ्याला श्रेष्ठतम शिक्षण मिळावे, हा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचा उद्देश आहे. म्हणूनच शुल्कवाढ न करता देशातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत स्वस्त आणि श्रेष्ठतम शिक्षण दिले जाईल, असे मत हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा.रजनीश कुमार शुक्ल यांनी व्यक्त केले.हिंदी विश्वविद्यालयाच्या सभागृहात पत्रपरिषद घेण्यात आली. यावेळी प्र-कुलगुरू हनुमानप्रसाद शुक्ल, प्र-कुलगुुरू चंद्रकांत रागीट व कुलसचिव कादर नवाज खान आदी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण देणारे हिंदी विश्व विद्यालय हे भारतातील एकमेव विद्यापीठ आहे. शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणाचा स्वीकार करून अध्ययन-अध्यापनाला कधीच सुरुवात झाली आहे. यावर्षी ३०० जागांकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून तब्बल नऊ देशांतील विद्यार्थ्यांनी संपर्क साधून प्रवेशाकरिता इच्छा व्यक्त केली आहे.

या विद्यापीठात पदवी, पदव्युत्तरच्या विविध अभ्यासक्रमासोबतच महात्मा गांधी यांचे विचार देशपातळीवर पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोविड काळामध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू असून ऑक्टोबर महिन्यापासून अध्यापनाचे कार्य सुरू केले जाणार आहे. परीक्षा न घेता उत्तीर्ण केल्यास मिळालेल्या ‘कोविड’ गुणपत्रिकेमुळे विद्यार्थ्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे परीक्षा घेऊनच त्याच्या गुणवत्तेचे प्रमाणपत्र दिले जाईल, असेही कुलगुरू प्रा. रजनीश शुक्ल यांनी सांगितले.

ऑनलाईन समुपदेशनाची केंद्राने घेतली दखलहिंदी विश्व विद्यालयामध्ये विविध देशातील विद्यार्थी शिक्षणाकरिता येतात. या लॉकडाऊन काळामध्ये ३७० विद्यार्थी विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये होते. त्यांना सुरक्षित ठेवून त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले. अद्याप ७० ते ८० विद्यार्थी वास्तव्यास असून सुरक्षित आहेत. या कालावधीत मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन दोन मानसोपचारतज्ज्ञांची नियुक्ती केली. त्यांनी विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांचेही ऑनलाईन समुपदेशन केले. याचीच दखल घेत केंद्र सरकारने केंद्रीय समुपदेशन केंद्र स्थापन करून येथीलच मानसोपचारतज्ज्ञांची निवड केली आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

विद्यार्थी बेकार होणार नाहीनवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थी बेकार होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. विद्यार्थ्याचा एका वर्षाचा प्रश्न नसतो, तर आयुष्याचा असतो, त्यामुळे परिस्थितीमुळे त्याने पहिले वर्ष पूर्ण करून शिक्षण सोडले तर त्याला डिप्लोमा दिला जाईल. पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येऊ त्याने शिल्लक राहिलेले शिक्षण पूर्ण केल्यास तो आपली पदवी पूर्ण करू शकणार आहे. परिस्थिती किंवा अडचणीमुळे विद्यार्थी बेकार होणार नाही. या विश्व विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच चार पैसे मिळावे म्हणून ‘कमवा आणि शिका’ ही योजना राबविली जात आहे. यामध्ये गेल्यावर्षी ५६ टक्के विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याने त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावरही भर असल्याचे कुलगुुरूंनी सांगितले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र