शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आपत्तीकाळात शुल्कवाढीऐवजी श्रेष्ठतम शिक्षणावर भर; महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 12:39 IST

शुल्कवाढ न करता देशातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत स्वस्त आणि श्रेष्ठतम शिक्षण दिले जाईल, असे मत हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा.रजनीश कुमार शुक्ल यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकुलगुरूंचे प्रतिपादनभारतातील एकमेव विद्यापीठ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड काळामध्ये सर्वच घटकांवर विपरित परिणाम झाला आहे. यातून शिक्षण क्षेत्रही सुटलेले नाही पण, समाजाच्या अगदी शेवटच्या घटकातील विद्यार्थ्याला श्रेष्ठतम शिक्षण मिळावे, हा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचा उद्देश आहे. म्हणूनच शुल्कवाढ न करता देशातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत स्वस्त आणि श्रेष्ठतम शिक्षण दिले जाईल, असे मत हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा.रजनीश कुमार शुक्ल यांनी व्यक्त केले.हिंदी विश्वविद्यालयाच्या सभागृहात पत्रपरिषद घेण्यात आली. यावेळी प्र-कुलगुरू हनुमानप्रसाद शुक्ल, प्र-कुलगुुरू चंद्रकांत रागीट व कुलसचिव कादर नवाज खान आदी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण देणारे हिंदी विश्व विद्यालय हे भारतातील एकमेव विद्यापीठ आहे. शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणाचा स्वीकार करून अध्ययन-अध्यापनाला कधीच सुरुवात झाली आहे. यावर्षी ३०० जागांकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून तब्बल नऊ देशांतील विद्यार्थ्यांनी संपर्क साधून प्रवेशाकरिता इच्छा व्यक्त केली आहे.

या विद्यापीठात पदवी, पदव्युत्तरच्या विविध अभ्यासक्रमासोबतच महात्मा गांधी यांचे विचार देशपातळीवर पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोविड काळामध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू असून ऑक्टोबर महिन्यापासून अध्यापनाचे कार्य सुरू केले जाणार आहे. परीक्षा न घेता उत्तीर्ण केल्यास मिळालेल्या ‘कोविड’ गुणपत्रिकेमुळे विद्यार्थ्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे परीक्षा घेऊनच त्याच्या गुणवत्तेचे प्रमाणपत्र दिले जाईल, असेही कुलगुरू प्रा. रजनीश शुक्ल यांनी सांगितले.

ऑनलाईन समुपदेशनाची केंद्राने घेतली दखलहिंदी विश्व विद्यालयामध्ये विविध देशातील विद्यार्थी शिक्षणाकरिता येतात. या लॉकडाऊन काळामध्ये ३७० विद्यार्थी विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये होते. त्यांना सुरक्षित ठेवून त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले. अद्याप ७० ते ८० विद्यार्थी वास्तव्यास असून सुरक्षित आहेत. या कालावधीत मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन दोन मानसोपचारतज्ज्ञांची नियुक्ती केली. त्यांनी विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांचेही ऑनलाईन समुपदेशन केले. याचीच दखल घेत केंद्र सरकारने केंद्रीय समुपदेशन केंद्र स्थापन करून येथीलच मानसोपचारतज्ज्ञांची निवड केली आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

विद्यार्थी बेकार होणार नाहीनवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थी बेकार होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. विद्यार्थ्याचा एका वर्षाचा प्रश्न नसतो, तर आयुष्याचा असतो, त्यामुळे परिस्थितीमुळे त्याने पहिले वर्ष पूर्ण करून शिक्षण सोडले तर त्याला डिप्लोमा दिला जाईल. पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येऊ त्याने शिल्लक राहिलेले शिक्षण पूर्ण केल्यास तो आपली पदवी पूर्ण करू शकणार आहे. परिस्थिती किंवा अडचणीमुळे विद्यार्थी बेकार होणार नाही. या विश्व विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच चार पैसे मिळावे म्हणून ‘कमवा आणि शिका’ ही योजना राबविली जात आहे. यामध्ये गेल्यावर्षी ५६ टक्के विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याने त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावरही भर असल्याचे कुलगुुरूंनी सांगितले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र