शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

वैदर्भीय बेरोजगार युवकांचा एल्गार मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 21:51 IST

हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातील वैदर्भीय बेरोजगार युवकांतर्फे गुरुवारी एल्गार मोर्चाचे आयोजन केले होते. शासनाने गत २० वर्षांपासून प्रशासनात करावयाच्या नोकर भरतीवर घातलेली बंदी उठवून वर्षात ७२ हजार नवीन नेमणुका करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा गत आठवड्यात केली.

ठळक मुद्देविदर्भ राज्य आघाडी : आंदोलनातून बेरोजगारांना नोकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातील वैदर्भीय बेरोजगार युवकांतर्फे गुरुवारी एल्गार मोर्चाचे आयोजन केले होते. शासनाने गत २० वर्षांपासून प्रशासनात करावयाच्या नोकर भरतीवर घातलेली बंदी उठवून वर्षात ७२ हजार नवीन नेमणुका करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा गत आठवड्यात केली. यात ७२ हजार नोकऱ्या विदर्भातील बेरोजगार युवकांना मिळाव्या याकरिता उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.गत अनेक वर्षांपासून विदर्भातील तरुण बेरोजगार आहे. महाराष्ट्र शासनामध्ये अनेंकदा शासकीय नोकरभरती झाली; परंतु विदर्भातील बेरोजगार तरुणांना मात्र न्याय मिळाला नाही. नागपूर करारानुसार शासकीय नोकरीमध्ये सुद्धा विदर्भातील तरुणांना २३ टक्के वाटा मिळायला पाहिजे होता. तो मिळाला नाही. म्हणून १९६० पासून विदर्भामध्ये नोकरीच्या संदर्भात ४ लाख एवढा अनुशेष निर्माण झालेला आहे. गत अनेक वर्षांपासून महाराष्ट्र सरकारने नोकरभरती केलेली नाही. यावर्षी मुख्यमंत्र्यांनी ७२ हजार शासकीय पदे भरण्याचे जाहीर केले. ३६ हजार नोकऱ्या सन २०१८ मध्ये व ३६ हजार नोकऱ्या २०१९ मध्ये जाहीर केले आहे. विदर्भाचा अनुशेष लक्षात घेता ७२ हजार पदे विदर्भातील बेरोजगारांकरिता राखीव ठेवावे. यामुळे विदर्भाचा अनुशेष कमी होईल. यामुळे मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेवून विदर्भातील जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी विदर्भ राज्य उपाध्यक्ष अनिल जवादे यांनी केले. या मोर्चामध्ये शहर अध्यक्ष शकील अहमद, संयोजक महेश माकडे, विधानसभा अध्यक्ष बंटी रघाटाटे, तालुका अध्यक्ष जयंत धोटे, युवा तालुका अध्यक्ष अश्विन तावाडे, महिला अध्यक्ष सुनिता भितघरे, युवा शहर अध्यक्ष अजय मुळे, महासचिव विक्की भितघरे, भारत पाटील, रहेमत खॉ पठाण, प्रवीण हटवार, रामू सोगे, सुरज शेंडे, सुमीत हिंगे, हेमा दुरबुडे, सुरत नौकरकर, निखिल तडस, निखिल डेकाटे, सुरज टिपले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ