शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

अकरा जलाशयातील पाणीसाठा तळालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 22:20 IST

यावर्षी पावसाने चांगलीच हुलकावणी दिल्याने पावसाळा उलटूनही नदी-नाल्यांना पूर आले नाही.परिणामी जिल्ह्यातील अकराही जलाशयातील पाण्याची पातळी आजही तळालाच लागली आहे.

ठळक मुद्दे७७ टक्के पावसाची नोंद : प्रकल्पात ४१.३६ टक्केच पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यावर्षी पावसाने चांगलीच हुलकावणी दिल्याने पावसाळा उलटूनही नदी-नाल्यांना पूर आले नाही.परिणामी जिल्ह्यातील अकराही जलाशयातील पाण्याची पातळी आजही तळालाच लागली आहे. सध्या सर्व जलाशयामध्ये केवळ ४१.३६ टक्के च पाणी उपलब्ध असल्याने डिसेंबर महिन्यापासूनच पाणीबाणी सुरु होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, कारंजा, हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू, वर्धा व देवळी या आठही तालुक्यात पावसाने यावर्षी दडी मारली. जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या दिवसात दमदार पाऊस झाला नसल्याने नद्या व जलाशय अद्यापही तहाणलेलच आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्यावर या एकाच पावसाने नद्या, नाल्यांना पूर आला होता. या एकाच पावसामुळे जलाशयाच्या पातळीत थोडी का होईना; पण वाढ झाली. आता पर्यंत जिल्ह्यामध्ये ७७ टक्के च पावसाची नोंद करण्यात आली आहे. या अल्प पावसामुळे वर्धा नगरपालिकेसह इतरही ग्रामपंचायतीमध्ये दोन दिवसाआड पाणी पुरवठा सुरु केला आहे.अजून हिवाळाही उलटायचा असतानाच ही परिस्थिती असल्याने उन्हाळ्यात परिस्थिती चिंतनीय आहे. डिसेंबर महिन्यापासूनच नागरिकांना पाण्याच्या झळा सोसाव्या लागणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने आतापासूनच पाणी बचतीशिवाय दुसरा पर्याय नाही. शहरात पाणी पुरवठा प्रभावित होणार आहे.रब्बी हंगामही धोक्यातजिल्ह्यातील अकरा जलाशयातून पिण्याकरिता, शेतीकरिता व उद्योगाकरिता पाणी पुरवठा केल्या जातो. सध्या जलाशयात ४१.३६ टक्के जलासाठा उपलब्ध आहे. यातील १५ टक्के पाणी हे संरक्षित ठेवल्या जाते तर उर्वरीत पाण्यातून पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता देण्यात येते. त्यानंतर सिंचन आणि नंतर उद्योगाला पाणी देणे अपेक्षीत आहे. परंतु सिंचनाला पाणी देण्यासाठी सिंचन विभागाने असमर्थता दर्शविल्याने यावर्षीचा रब्बी हंगामही अडचणी आला आहे. खरिपातही शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागता तर आताही पाण्याअभावी रब्बीतही नुकसान सहन करण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई