शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

अकरा जलाशयातील पाणीसाठा तळालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 22:20 IST

यावर्षी पावसाने चांगलीच हुलकावणी दिल्याने पावसाळा उलटूनही नदी-नाल्यांना पूर आले नाही.परिणामी जिल्ह्यातील अकराही जलाशयातील पाण्याची पातळी आजही तळालाच लागली आहे.

ठळक मुद्दे७७ टक्के पावसाची नोंद : प्रकल्पात ४१.३६ टक्केच पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यावर्षी पावसाने चांगलीच हुलकावणी दिल्याने पावसाळा उलटूनही नदी-नाल्यांना पूर आले नाही.परिणामी जिल्ह्यातील अकराही जलाशयातील पाण्याची पातळी आजही तळालाच लागली आहे. सध्या सर्व जलाशयामध्ये केवळ ४१.३६ टक्के च पाणी उपलब्ध असल्याने डिसेंबर महिन्यापासूनच पाणीबाणी सुरु होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, कारंजा, हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू, वर्धा व देवळी या आठही तालुक्यात पावसाने यावर्षी दडी मारली. जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या दिवसात दमदार पाऊस झाला नसल्याने नद्या व जलाशय अद्यापही तहाणलेलच आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्यावर या एकाच पावसाने नद्या, नाल्यांना पूर आला होता. या एकाच पावसामुळे जलाशयाच्या पातळीत थोडी का होईना; पण वाढ झाली. आता पर्यंत जिल्ह्यामध्ये ७७ टक्के च पावसाची नोंद करण्यात आली आहे. या अल्प पावसामुळे वर्धा नगरपालिकेसह इतरही ग्रामपंचायतीमध्ये दोन दिवसाआड पाणी पुरवठा सुरु केला आहे.अजून हिवाळाही उलटायचा असतानाच ही परिस्थिती असल्याने उन्हाळ्यात परिस्थिती चिंतनीय आहे. डिसेंबर महिन्यापासूनच नागरिकांना पाण्याच्या झळा सोसाव्या लागणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने आतापासूनच पाणी बचतीशिवाय दुसरा पर्याय नाही. शहरात पाणी पुरवठा प्रभावित होणार आहे.रब्बी हंगामही धोक्यातजिल्ह्यातील अकरा जलाशयातून पिण्याकरिता, शेतीकरिता व उद्योगाकरिता पाणी पुरवठा केल्या जातो. सध्या जलाशयात ४१.३६ टक्के जलासाठा उपलब्ध आहे. यातील १५ टक्के पाणी हे संरक्षित ठेवल्या जाते तर उर्वरीत पाण्यातून पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता देण्यात येते. त्यानंतर सिंचन आणि नंतर उद्योगाला पाणी देणे अपेक्षीत आहे. परंतु सिंचनाला पाणी देण्यासाठी सिंचन विभागाने असमर्थता दर्शविल्याने यावर्षीचा रब्बी हंगामही अडचणी आला आहे. खरिपातही शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागता तर आताही पाण्याअभावी रब्बीतही नुकसान सहन करण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई