शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

वर्धा जिल्ह्यात अकराशे रुपये क्विंटलची केळी सहाशे रुपयांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 14:53 IST

कोरोनामुळे केळी खाणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले. परिणामी, मागणी घटली.

ठळक मुद्दे केळी उत्पादकांना मोठा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जानेवारी, फेब्रुवारीमध्ये केळीला प्रतिक्विंटल अकराशे रुपये भाव होता. आता त्याच केळीला प्रतिक्विंटल सहाशे रुपयांचा भाव मिळत असल्याने केळी उत्पादकांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.कोरोनामुळे केळी खाणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले. परिणामी, मागणी घटली. शेतकऱ्यांचा माल तोडणीला आला की तो कापावाच लागतो, अन्यथा नुकसान होते. त्या काळात तोडणी झालेल्या केळीला बाजारात भाव मिळाला नाही. ज्या व्यापाऱ्यांनी हा माल खरेदी करून, पिकविण्याची प्रक्रिया करून बाजारात नेला. मात्र, उठाव नसल्याने केळीचे भाव पडले. अडचणींच्या काळात शेती हंगामावर केळीपासून रोख पैसा मिळतो. त्यावर संपूर्ण शेतीचा खर्च चालतो. मात्र, यंदा एकाएकी भावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. सेलू तालुक्यात सिंचन व्यवस्थेमुळे कमी झालेल्या केळीच्या बागा वाढत असताना अशा भावबाजीमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांची मानसिकता बदलत चालली आहे. तालुक्यात यंदा सोयाबीन व तुरीचा पेरा वाढला आहे. शेतकऱ्यांना फायदा मिळवून देणाऱ्या केळीच्या भावातील कोरोनामुळे झालेली घट शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीची ठरली आहे.

आम्ही कॅशक्रॉप म्हणून केळीच्या बागा लावतो. खूप मेहनत घेतो. यंदा कोरोनामुळे केळीची भाव पडले. जानेवारी, फेब्रुवारीत अकराशे बाराशे रुपये क्विंटलची केळी एकदम सहाशे रुपयांवर आली. सरकारने आमचाही विचार करायला हवा.- कवडू लटारे, केळी उत्पादक, शिवनगाव, ता. सेलू.

टॅग्स :fruitsफळे