शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

वीज देयक वसुलीत आर्वी विभाग जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:01 IST

वीज वितरण कंपनीकडून घरगुती ग्राहकांना तथा व्यावसायिकांना प्रत्येक महिन्याला दिल्या जाणाºया वीजबिलाची आर्वी विभागामध्ये प्रभावीपणे वसुली सुरू आहे.

ठळक मुद्दे८० टक्के उद्दिष्ट पूर्ण : वीज चोरी पकडण्यातही अग्रेसर

अमोल सोटे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : वीज वितरण कंपनीकडून घरगुती ग्राहकांना तथा व्यावसायिकांना प्रत्येक महिन्याला दिल्या जाणाºया वीजबिलाची आर्वी विभागामध्ये प्रभावीपणे वसुली सुरू आहे. नागरिकही देयक वेळीच भरून महावितरणला सहकार्य करीत आहेत.कार्यकारी अभियंत्यांच्या प्लॅनप्रमाणे कारवाई सरू असल्यामुळे सध्या ८० टक्के वसुलीचा टप्पा गाठण्यात आला. वीजचोरी पकडण्यासाठी तयार केलेल्या पथकाकडून धडक कार्यवाही करण्यात येत आहे. इतर तालुक्याच्या तुलनेत आर्वी हा अव्वल ठरला आहे.वीज वितरण कंपनीचे विभागीय कार्यालय आर्वी येथे असून या अंतर्गत आर्वी, आष्टी, कारंजा, खरांगणा, पुलगाव या पाच उपविभागाचे काम सदर कार्यालयाच्या देखरेखीत चालते. शेतीच्या वापरासाठी दिल्या जाणाºया वीज पुरवठ्याचे प्रमाणे ४५ टक्के तर व्यापारी वापरासाठीचे प्रमाण २५ टक्के आहे. उर्वरीत ३० टक्के वीज पुरवठा घरगुती वापरासाठी दिल्या जातो. या सर्वांचे बजेट काढले तर साधारणत: ५५ टक्के वसुली प्रत्येक महिन्याला होते. त्याची टक्केवारी घरगुती वापरात ८० इतकी आहे. कार्यकारी अभियंता निलेश गायकवाड यांनी गेल्या ३ वर्षांपासून वीज वसुलीचे नियोजन आखून प्रभावी पद्धतीने वसूली केली. यासाठी प्रत्येक उपविभागाच्या स्वतंत्र मिटींग घेवून वरचेवर आढावा घेतला जात आहे. कार्यालयातील कर्मचारी ग्राहकांची मोबाईल यादी तयार करून सर्वांना भ्रमणध्वनीवर संपर्क केल्या जातो. बील भरायच्या अंतम तारखेनंतर अतिरिक्त आकारणीचा सहन करावा लागणार भुर्दंड यामुळे ग्राहकही प्रतिसाद देतात. कर्मचारी घरोघरी फिरून वसुली करतात. कार्यकारी अभियंता निलेश गायकवाड यांच्या नियोजनबद्ध आराखड्याला पाचही उपविभागाने प्रतिसाद दिला. ग्राहकांच्या समस्याही सोडविण्याला प्राधान्य दिल्या जाते. प्रत्येक महिन्याला रिडींग घेवून देयक दिल्या जाते. शासनाच्या यादीत आर्वी विभाग वसुलीत जिल्ह्यात अव्वल असल्याचे सांगण्यात येते. उर्जामंत्री बावनकुळे यांनी कार्यकारी अभियंता गायकवाड यांचा गौरव केला. मुख्यालयी राहून सर्व प्रकरणे निकााली काढण्याचा सन्मानही त्यांना मिळाला आहे. नागरिकांकडून येणारी प्रत्येक तक्रार झटपट निकाली काढून शेतकºयांसह नागरिकांना दिलासा देण्यासाठी सदर विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.प्रत्येक तक्रारकर्त्याचे केले जाते समाधानआर्वी विभागात येणाºया आष्टी(श.), कारंजा (घा.) व आर्वी तालुक्यातील जंगलव्याप्त परिसरातील प्रत्येक घर प्रकाशमान करण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. परिसरातील शेतकºयांसह नागरिकांची येणारी प्रत्येक तक्रार निकाली काढून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न येथील कार्यरत कर्मचारी व अधिकाºयांकडून केला जात आहे. नागरिकही देयक वेळीच भरून महावितरणला सहकार्य करतात.