शहरं
Join us  
Trending Stories
1
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
2
Onion Price Hike : महाराष्ट्रात कांद्याचे भाव गगनाला भिडणार? नेमकं करण तरी काय?
3
सनातन धर्माला काहीही बोललं जातं तेव्हा हा राग कुठे जातो? शर्मिष्ठा पनोलीच्या अटकेवरून पवन कल्याण संतप्त
4
"पाकिस्तानने आधीच सिंधु पाणी कराराचे उल्लंघन केलेय", पाकच्या कांगाव्याला भारताकडून सडेतोड उत्तर!
5
विमान प्रवास होणार स्वस्त? विमान इंधनाच्या किमती सलग तिसऱ्यांदा घटल्या; काय आहेत सध्याचे दर?
6
अजित पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी राम-राम ठोकला; या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला
7
नातेवाईक बाहेर करत राहिले विरोध, पोलिसांनी ठाण्यात लावून दिलं लग्न, पोलीसच बनले वऱ्हाडी आणि...  
8
टाटा-रिलायन्सला सरकारी कंपनी ठरली सरस! आठवड्यात कमावला ५९,२३३ कोटी रुपयांचा नफा
9
३० कोटींची लॉटरी जिंकून पैसे गर्लफ्रेंडला दिले, दुसऱ्यासोबत फुर्र होऊन तिने बॉयफ्रेंडलाच कंगाल केले! 
10
भारताची नवीन 'रेड लाईन', पाकिस्तानात 300 KM घुसून हल्ले, CDS चौहान यांची मोठी माहिती
11
ईशान्य भारतात पावसाचा कहर, भूस्खलनासह विविध कारणांनी ३२ जणांचा मृत्यू  
12
पुढील आठवड्यात शेअर बाजारात 'लिस्टिंगचा धमाका'! १० कंपन्या करणार दणक्यात पदार्पण, गुंतवणूकदारांची चांदी?
13
रोज ६,५०० तरुणांची तंबाखूसेवनाला सुरुवात, दरवर्षी १८ लाख जण गमावतात आपला जीव
14
"संविधानामुळेच आपला देश संकटकाळातही एकसंध"; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे विधान
15
कॉलेजचं प्रेम आयुष्यात परतलं, आधीच विवाहित असलेल्या जवानानं पत्नीला संपवलं
16
चालकाला डुलकी लागली, कार थेट दुभाजक ओलांडून ट्रॅकला जाऊन धडकली; एकाचा मृत्यू, धुळे-सोलापूर महामार्गावरील घटना
17
आनंदाची बातमी...! LPG सिलिंडरची किंमत पुन्हा कमी झाली; 1 जूनपासून ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवा दर
18
फक्त SIP च नाही, आता 'STP' नेही वाढवा म्युच्युअल फंडातला परतावा! जाणून घ्या ही खास योजना!
19
पाकिस्तानमधील जीवितहानीबद्दल शोक करणारे वक्तव्य कोलंबियाने घेतले मागे- शशी थरूर
20
IPL 2025 : पुन्हा 'रोजंदारी'वर मिळालं काम! पण यावेळी MI नं दिला CSK पेक्षा दुप्पट पगार

वीज तारांच्या स्पर्शाने बैलजोडी ठार

By admin | Updated: June 19, 2016 01:59 IST

शेतात वखरणीचे काम सुरू असताना शेतात पडून असलेल्या जिवंत विद्युत तारांना बैलजोडीचा स्पर्श झाला.

रिधोरा येथील घटना : शेतकऱ्याचे ७० हजारांचे नुकसानसेलू : शेतात वखरणीचे काम सुरू असताना शेतात पडून असलेल्या जिवंत विद्युत तारांना बैलजोडीचा स्पर्श झाला. यात दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी काम करीत असलेल्या इसम थोडक्यात बचावला. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजता तालुक्यातील रिधोरा येथे घडली.मनोहर सावरकर यांनी मौजा रिधोरा येथील अशोक श्रीराम यांचे शेत ठेक्याने केले होते. शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. यामुळे सकाळी शेतात सारण्या फाडण्याच्या कामासाठी तो शेतात बैलजोडी घेऊन गेला होता. शेतात जिवंत विद्युत तारा पडून असतील, याची त्याला पुसटशी कल्पनाही नव्हती. यामुळे काम करीत असताना बैलांचा स्पर्श वीज तारांना झाला. यात बैलजोडी घटनास्थळीच ठार झाली. वखरणीचे काम करणारा भैया कुडसंगे हा मात्र थोडक्यात बचावला. ऐन हंगामात घडलेल्या या घटनेमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बैलजोडी ठार झाल्याने शेतकऱ्याचे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. या शेतकऱ्याला महावितरण कंपनीने त्वरित मदत द्यावी, अशी माणगी शेतकऱ्यांतून होत आहे.(तालुका प्रतिनिधी)जिल्ह्यात सरासरी १९.३९ मिमी पाऊसजिल्ह्यात शुक्रवारी सर्वत्र पावसाचे आगमन झाले. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सरासरी १९.३९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून एकूण १५५.१० मिमी पाऊस झाला आहे. यात वर्धा तालुक्यात १० मिमी, सेलू २५, देवळी ८.२०, हिंगणघाट ८.१०, समुद्रपूर १०.४०, आर्वी ३०, आष्टी ४२ आणि कारंजा तालुक्यात २१ मिमी पावसाची नोद करण्यात आली. शुक्रवारचा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र कोसळल्याने शेतातील कामांना वेग आल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी पेरणीकरिता दमदार पावसाची गरज व्यक्त होत आहे.