शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
4
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
5
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
6
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
8
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
9
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
10
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
11
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
12
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
13
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
14
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
15
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
16
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
17
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
18
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
19
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
20
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक

निवडणूक विभाग इंटरनेटवर माघारलेलाच

By admin | Updated: October 9, 2016 00:31 IST

शासनाचे अर्धे अधिक काम आॅनलाईन होत असताना निवडणूक विभाग मात्र या कामात माघारलेला असल्याचे दिसून आले आहे.

तीन वर्षांपासून यादी बदललीच नाही : नागरिकांना माहिती मिळणे कठीण रूपेश मस्के कारंजा (घा.)शासनाचे अर्धे अधिक काम आॅनलाईन होत असताना निवडणूक विभाग मात्र या कामात माघारलेला असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्याच्या संकेत स्थळावर जिल्ह्याच्या निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांची जुनीच यादी कायम असल्याने नागरिकांना कोणाशी संपर्क साधावा, असा प्रश्न पडला आहे. सध्या मतदार यादी अपडेट करण्याचे काम सुरू असताना अधिकाऱ्यांच्या या जुन्या यादीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. डीजीटल इंडीयाचा सर्वत्र गाजावाजा होत आहे. अनेक विभाग आॅनलाईन होत आहे. दिवसागणिक नागरिकांना सर्वच सेवा आॅनलाईन देण्याच्या बाता शासनाकडून करण्यात येत आहे. सध्या राज्यात जिल्हा परिषद, नगर परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत आहे. यात निवडणूक विभागाकडून नव्या याद्या तयार करण्याचे व नव्या मतदारांची नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. या संदर्भात नागरिकांना शासनाकडून योग्य माहिती मिळावी, याकरिता त्यांच्याकडून इंटरनेटचा वापर करून आपल्या विभागाचा अधिकारी कोण, याचा शोध घेत माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. येथे मात्र जुनेच अधिकारी कार्यरत असल्याने त्यांना माहिती मिळणे कठीण जात आहे. यादीत असलेल्या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधला असता तो चुकीचा असल्याचे दिसून आले. ही यादी एक दोन नाहीत तर तब्बल तीन वर्षांपासून ‘अपडेट’ झाली नसल्याचे दिसून आले. यामुळे निवडणूक विभाग त्यांच्या कामासंदर्भात किती सतर्क आहे, याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. सध्या नविन मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरू आहे. यामुळे अशा चुका निवडणूक विभागाने दुरुस्त कराव्या अशी जनसामान्यांची मागणी आहे. तेव्हा याकडे संबंधीत विभागाने अद्यावत माहितीच्या दृष्टिने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. आॅनलाईन अर्जाद्वारे मतदार नोंदणीनिवडणूक विभागाव्दारे आॅनलाईन सेवा सुरु करण्यात आली आहे. यात युवकांना स्वत: इंटरनेटच्या सहाय्याने नवीन मतदार नोंदणी अथवा तत्सम प्रकारच्या सेवा आॅनलाईन अर्जाव्दारे घेता येते. याचा बऱ्याच अंशी नागरिकांना फायदाही होत आहे; परंतु काही अडचणी किंवा शंका अथवा माहिती पाहिजे असल्यास किंवा जिल्ह्यानुसार जिल्हा संपर्क यादीतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावयाचा असल्यास निवडणूक आयोगाच्या वेबसाईडवर जावून क्लीक केल्यानंतर जिल्हा संपर्क यादी येते. या यादीतील कार्यालयाच्या क्रमांकाव्यातिरिक्त एकही क्रमांक अपडेट केला नसल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे ईतरही सेवा अपडेट आहे अथवा नाही याबाबत शंका निर्माण होत आहे. जिल्ह्यात निवडणुकीचे वारे जिल्ह्यातच नाही तर राज्यात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. यामुळे निवडणूक विभागाच्यावतीने नवीन मतदार नोंदणी सुरू आहे. शिवाय विविध कामांची माहिती नागरिकांना मिळावी, याकरिता इंटरनेटवर ती टाकण्यात येत आहे. आजच्या युगात सर्वत्र स्मार्ट फोन असल्याने नागरिकांना कोणतीही माहिती एका क्लिकवर पाहिजे आहे. यातच नागरिकांकडून निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर भेट देतात; मात्र त्यांना पाहिजे असलेली माहिती मिळत नाही. यामुळे निवडणूक विभागाने ही यादी अपडेट करण्याची गरज वर्तविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आऊट आॅफ कव्हरेज एरिया या संदर्भात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना विचारणा करण्याकरिता त्यांचा भ्रमणध्वनीवर संपर्क साधला तो आऊट आॅफ कव्हरेज एरिया दाखवित होता. ही बाब खरी असेलही. पण ती तालुका नाही तर जिल्हा स्तरावर पूर्ण केली जाते. यामुळे या संदर्भात काहीच बोलू शकत नाही. -सुरेश मडावी, तहसीलदार, कारंजा (घाडगे)