शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

शिक्षण विभागाच्या डुलक्या; दांडीबहाद्दरांचे फावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 22:02 IST

बारावी विज्ञान शाखेच्या दांडीबहाद्दराना आळा घालण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक्स हजेरी सुरु केली. पण जिल्ह्यातील बहुतांश खासगी कनिष्ठ महाविद्यालयाने या प्रणालीला हरताळ फासला आहे.

ठळक मुद्देबायोमेट्रिक्सची चौकशी समिती कागदोपत्रीच : बारावीच्या मौखिक परीक्षेला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बारावी विज्ञान शाखेच्या दांडीबहाद्दराना आळा घालण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक्स हजेरी सुरु केली. पण जिल्ह्यातील बहुतांश खासगी कनिष्ठ महाविद्यालयाने या प्रणालीला हरताळ फासला आहे. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या माध्यमिक शिक्षण विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे दांडी बहाद्दरांचे चांगलेच फावते आहे. परिणामी वर्षभर महाविद्यालयात उपस्थित नसलेले विद्यार्थीही आता मौखिक परीक्षा देत असून येत्या दिवसात अंतिम परीक्षेलाही ते समोरे जाणार आहे. त्यामुळे शासनाच्या उद्देशाला शिक्षण विभागाकडूनच मुठमाती मिळत आहे.विज्ञान शाखेत अकरावीला प्रवेश घेणारे विद्यार्थी शिकवणी वर्गाच्या माध्यमातून किंवा स्वत: कनिष्ठ महाविद्यालयात नाममात्र प्रवेश घेऊन दोन वर्ष महाविद्यालयाला दांडी मारतात. केवळ मौखिक, प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेलाच ते उपस्थित होतात. विशेषत: ७५ टक्के उपस्थिती असल्याशिवाय परीक्षेला बसता येत नाही. असा बोर्डाचा नियम आहे. हा नियम अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित, स्वअर्थसाहाय्य कनिष्ठ महाविद्यालयाला लागू होतो. असे असतानाही काही अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय सोडले तर इतरांनी नाममात्र प्रवेश नोंदवून बोगस विद्यार्थ्यांच्या भरोशावर आपली दुकानदारी चालविली आहे. यालाच आळा घालण्याकरिता शासनाने बायोमेट्रिक्स हजेरी यावर्षीपासून सुरु केली. त्यानुसार जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांनी बायोमॅट्रीक्स लावली पण, अंमलबजावनीकडे दुर्लक्ष होत आहे. शिक्षण विभागाकडूनच कोणताही पाठपुरावा केल्या जात नसल्याने बायोमेट्रिक्स हजेरी नंतरही काही अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय वगळता इतर महाविद्यालयात वर्षभर दांडी मारणारे विद्यार्थी आता मौखिक व प्रात्यक्षिक परीक्षेकरिता अवतरले आहे. याकरिताही संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी उत्तम मॅनेजमेंट केल्याने महाविद्यालयांची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राहत आहे.या महाविद्यालयांचा बायोमेट्रिक्सला ठेंगाजिल्ह्यातील आठही तालुक्यात अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित, स्वअर्थसाहाय्य असे ६० कनिष्ठ महाविद्यालयाल आहे. शिक्षण विभागाच्या माहितीनुसार त्यातील ५४ महाविद्यालयांनी बायोमेट्रिक्स प्रणाली लावली आहे. पण सहा कनिष्ठ महाविद्यालयाने याकडे पाठ फिरविल्याने शासनाच्या आदेशाची अवहेलना केल्याचे दिसून येते. यामध्ये जिल्हा परिषद महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय वर्धा, स्व.के.जी.वाघ विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रोहणा, संत गजाननप्रसाद कनिष्ठ महाविद्याल गिरड, जे.डी.कनिष्ठ महाविद्यालय वासी, संस्कार ज्ञानपीठ समुद्रपूर, व्यंकटेश कनिष्ठ महाविद्यालय येळाकेळी इत्यादी कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे.आदेशाची अंमलबजावनी नाहीविज्ञान शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयात बायोमेट्रिक्स हजेरीप्रणालीबाबत लोकमते वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्य धनराज तेलंग यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या प्रश्नावरुन जिल्हा परिषद अध्यक्षांनी बायोमेट्रिक्स हजेरीच्या अंमलबजावणी संदर्भात ठराव घेत मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. पण ही समिती कागदोपत्रीच असल्याने खासगी कनिष्ठ महाविद्यालयांची मनमर्जी सुरुच आहे. सभागृहाच्या आदेशानंतरही समितीने दखल घेतलेली दिसून येत नाही. त्यामुळे वर्षभर गायब असलेले विद्यार्थीही आता मौखिक व प्रात्यक्षिक परीक्षा देत असल्याने आता तरी या समितीने महाविद्यालयात जाऊन चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे.जिल्ह्यात विज्ञान शाखेचे ६० कनिष्ठ महाविद्यालय आहेत. त्यातील ५४ महाविद्यालयांनी बायोमॅट्रीक्स प्रणाली लावली आहे. तर ६ महाविद्यालयांनी अद्यापही बायोमॅट्रीक्स लावलेली नाही. त्यामुळे या ६ महाविद्यालयाचा अहवाल उपसंचालकांकडे पाठविण्यात आला आहे. त्यांच्या निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाईल.अजय गुल्हाणे, मुख्य कार्यपालन अधिकारी