शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

शिक्षण विभागाच्या डुलक्या; दांडीबहाद्दरांचे फावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 22:02 IST

बारावी विज्ञान शाखेच्या दांडीबहाद्दराना आळा घालण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक्स हजेरी सुरु केली. पण जिल्ह्यातील बहुतांश खासगी कनिष्ठ महाविद्यालयाने या प्रणालीला हरताळ फासला आहे.

ठळक मुद्देबायोमेट्रिक्सची चौकशी समिती कागदोपत्रीच : बारावीच्या मौखिक परीक्षेला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बारावी विज्ञान शाखेच्या दांडीबहाद्दराना आळा घालण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक्स हजेरी सुरु केली. पण जिल्ह्यातील बहुतांश खासगी कनिष्ठ महाविद्यालयाने या प्रणालीला हरताळ फासला आहे. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या माध्यमिक शिक्षण विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे दांडी बहाद्दरांचे चांगलेच फावते आहे. परिणामी वर्षभर महाविद्यालयात उपस्थित नसलेले विद्यार्थीही आता मौखिक परीक्षा देत असून येत्या दिवसात अंतिम परीक्षेलाही ते समोरे जाणार आहे. त्यामुळे शासनाच्या उद्देशाला शिक्षण विभागाकडूनच मुठमाती मिळत आहे.विज्ञान शाखेत अकरावीला प्रवेश घेणारे विद्यार्थी शिकवणी वर्गाच्या माध्यमातून किंवा स्वत: कनिष्ठ महाविद्यालयात नाममात्र प्रवेश घेऊन दोन वर्ष महाविद्यालयाला दांडी मारतात. केवळ मौखिक, प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेलाच ते उपस्थित होतात. विशेषत: ७५ टक्के उपस्थिती असल्याशिवाय परीक्षेला बसता येत नाही. असा बोर्डाचा नियम आहे. हा नियम अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित, स्वअर्थसाहाय्य कनिष्ठ महाविद्यालयाला लागू होतो. असे असतानाही काही अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय सोडले तर इतरांनी नाममात्र प्रवेश नोंदवून बोगस विद्यार्थ्यांच्या भरोशावर आपली दुकानदारी चालविली आहे. यालाच आळा घालण्याकरिता शासनाने बायोमेट्रिक्स हजेरी यावर्षीपासून सुरु केली. त्यानुसार जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांनी बायोमॅट्रीक्स लावली पण, अंमलबजावनीकडे दुर्लक्ष होत आहे. शिक्षण विभागाकडूनच कोणताही पाठपुरावा केल्या जात नसल्याने बायोमेट्रिक्स हजेरी नंतरही काही अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय वगळता इतर महाविद्यालयात वर्षभर दांडी मारणारे विद्यार्थी आता मौखिक व प्रात्यक्षिक परीक्षेकरिता अवतरले आहे. याकरिताही संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी उत्तम मॅनेजमेंट केल्याने महाविद्यालयांची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राहत आहे.या महाविद्यालयांचा बायोमेट्रिक्सला ठेंगाजिल्ह्यातील आठही तालुक्यात अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित, स्वअर्थसाहाय्य असे ६० कनिष्ठ महाविद्यालयाल आहे. शिक्षण विभागाच्या माहितीनुसार त्यातील ५४ महाविद्यालयांनी बायोमेट्रिक्स प्रणाली लावली आहे. पण सहा कनिष्ठ महाविद्यालयाने याकडे पाठ फिरविल्याने शासनाच्या आदेशाची अवहेलना केल्याचे दिसून येते. यामध्ये जिल्हा परिषद महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय वर्धा, स्व.के.जी.वाघ विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रोहणा, संत गजाननप्रसाद कनिष्ठ महाविद्याल गिरड, जे.डी.कनिष्ठ महाविद्यालय वासी, संस्कार ज्ञानपीठ समुद्रपूर, व्यंकटेश कनिष्ठ महाविद्यालय येळाकेळी इत्यादी कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे.आदेशाची अंमलबजावनी नाहीविज्ञान शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयात बायोमेट्रिक्स हजेरीप्रणालीबाबत लोकमते वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्य धनराज तेलंग यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या प्रश्नावरुन जिल्हा परिषद अध्यक्षांनी बायोमेट्रिक्स हजेरीच्या अंमलबजावणी संदर्भात ठराव घेत मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. पण ही समिती कागदोपत्रीच असल्याने खासगी कनिष्ठ महाविद्यालयांची मनमर्जी सुरुच आहे. सभागृहाच्या आदेशानंतरही समितीने दखल घेतलेली दिसून येत नाही. त्यामुळे वर्षभर गायब असलेले विद्यार्थीही आता मौखिक व प्रात्यक्षिक परीक्षा देत असल्याने आता तरी या समितीने महाविद्यालयात जाऊन चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे.जिल्ह्यात विज्ञान शाखेचे ६० कनिष्ठ महाविद्यालय आहेत. त्यातील ५४ महाविद्यालयांनी बायोमॅट्रीक्स प्रणाली लावली आहे. तर ६ महाविद्यालयांनी अद्यापही बायोमॅट्रीक्स लावलेली नाही. त्यामुळे या ६ महाविद्यालयाचा अहवाल उपसंचालकांकडे पाठविण्यात आला आहे. त्यांच्या निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाईल.अजय गुल्हाणे, मुख्य कार्यपालन अधिकारी