शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयात आता ई-टपाल सेवा

By admin | Updated: October 7, 2016 02:17 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना तात्काळ सेवा मिळावी म्हणून अनेक सेवा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आॅनलाईन देणे सुरू केले आहे.

एका क्लिकवर तक्रारींचा गोषवारा : जुलै २०१६ पासून संगणकीय प्रणालीचा वापरवर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना तात्काळ सेवा मिळावी म्हणून अनेक सेवा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आॅनलाईन देणे सुरू केले आहे. यात आणखी एक टप्पा गाठत जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ई-टपाल सेवा’ही आता सुरू करण्यात आली आहे. कार्यालयात प्राप्त होणारी सर्व पत्र, अर्जाची नोंद संगणकावर घेण्यात येत असून त्यांची तात्काळ माहिती मॅसेजद्वारे (एसएमएस) संबंधित व्यक्तीला देण्यात येत आहे.सामान्य जनतेला लागणाऱ्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचे कार्यालय म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय होय. जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयाशी समन्वय साधून जिल्ह्यातील विकास कामे आणि जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रामुख्याने काम करते. जिल्हाधिकारी कार्यालयात शासन, जनता आणि अन्य कार्यालयाकडून दिवसभरात साधारण ४०० ते ५०० एवढ्या मोठ्या प्रमाणात टपाल येते. टपालाची नोंद यापूर्वी नोंदवहीत हस्तलिखीतपणे करण्यात येत होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात लिखाणाचे कामकाज करावे लागत होते. शिवाय यासाठी नोंद वह्या आणि कागदाचा वापर अधिक होत असल्याने त्यांचे जनत करणे कठीण काम होते. या बाबींचा विचार करून जिल्हाधिकारी नवाल यांनी ‘ई-टपाल’ संगणकीय प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. टपाल प्रणालीसाठी कागद व नोंदवह्यांचा वापर पूर्णपणे बंद केल्याने कागदाची बचत होत आहे. पेपरलेस टपाल नोंदणीमुळे कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होण्यासह नागरिकांना त्यांच्या अर्ज नोंदीचा तपशील एसएमएसद्वारे मिळत असल्याने नागरिकांचा विश्वास बसत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील ई-टपाल हे लोकाभिमुख प्रशासन व पेपरलेस आॅफिससाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. नागरिकांनी अर्ज वा निवेदनासोबत मोबाईल क्रमांकही द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)अर्ज, निवेदनावरील कार्यवाईचीही संदेशाद्वारे माहितीई-टपाल सेवेसाठी एसओबीए.सीओ.आयएन/वर्धा हे संकेतस्थळ दिले असून जुलै २०१६ पासून सेवा सुरू झाली आहे. टपालामध्ये प्राप्त होणारी सर्व पत्रे, अर्ज, निवेदन यांची नोंद संगणकावर घेण्यात येत आहे. कार्यालयात सादर करण्यात आलेल्या अर्जाची नोंद संगणकावर घेताना संबंधित अर्जावर अर्जदाराचा मोबाईल क्रमांक असल्यास त्यांची नोंद घेण्यात येते. नोंद झाल्याबद्दल अर्जदारांच्या भ्रमध्वनीवर संदेश जातो. त्या संदेशामध्ये अर्जाचा आवक क्रमांक आणि दिनांक नमूद केलेला असतो. सदर पत्र संबंधित शाखेकडे आॅनलाईन पाठविले जाते. संबंधित शाखेने अर्ज स्वीकारल्यावर पुन्हा एकदा अर्जदाराच्या भ्रमध्वनीवर संदेश पाठविला जातो. अर्जदाराच्या अर्जावर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहितीही संदेशाद्वारे त्याला प्राप्त होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रत्येक शाखेला प्राप्त होणारे टपाल आणि निकाली काढण्यात आलेले टपाल यांचा गोषवारा जिल्हाधिकाऱ्यांना एका क्लिकवर पाहता येतो.