शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात होतेय नालेसफाई

By admin | Updated: June 16, 2017 01:19 IST

पावसाळ्यापूर्वी शहरातील मोठे नाले, नाल्या साफ करणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे आणि पावसाचे पाणी कुणाच्या घरात शिरणार नाही,

जिल्ह्यातील पालिकांचा प्रकार : वर्धेतही मजुरांकडून काढला जातोय गाळलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळ्यापूर्वी शहरातील मोठे नाले, नाल्या साफ करणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे आणि पावसाचे पाणी कुणाच्या घरात शिरणार नाही, याची दक्षता घेण्याचे नियोजन पालिका प्रशासनाला करावे लागते. जिल्ह्यातील बहुतांश नगर पंचायत, नगर पालिकांनी ते नियोजन केलेही; पण कामे मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर केली जात असल्याचे दिसते. परिणामी, नाल्यांचा उपसा करताना मजुरांनाच तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. वर्धा नगर परिषदेने शहरातील मोठे नाले, लोकवस्तीतील नाल्यांच्या सफाईचे नियोजन केले होते. यातून पावसाळ्यापूर्वी शहर स्वच्छ होणे गरजेचे होते; पण आज जून महिन्याची १५ तारीख आली असताना शहरातील नाले साफच झालेले नाहीत. सध्या गोंड प्लॉट परिसरातून वाहणाऱ्या मुख्य नाल्याची मजुरांकडून सफाई करून घेतली जात आहे. मुख्य मार्गावर असलेल्या पुलाखालून मजूर मागील दोन दिवसांपासून गाळ उपसण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात बुधवारी मजुरांना नाल्यात पुलाखाली साप आढळून आला. फावडे लागल्याने जखमी सापामुळे मजुरांचीही गाळाचा उपसा करण्याची हिंमत होत नव्हती. पावसाळा सुरू झाला असून पावसाचे तथा सांडपाणी या नाल्यातून दररोज वाहते. दरवर्षी हा नाला जेसीबीच्या माध्यमातून साफ केला जात होता तर पुलाखालील भाग मजुरांकडून साफ करून घेतला जात होता; पण यंदा जेसीबी दिसून आला नाही. मजुरांकडून नालेसफाईची कामे करून घेतली जात असल्याचे पाहावयास मिळाले. शहरातील अन्य नाल्यांची सफाई अद्याप शिल्लक आहे. मग, गल्ली-बोळातील नाल्यांची सफाई आणि कचरा निर्मूलन ही कामे कधी होणार, हा प्रश्नच आहे.पुलगाव शहरातील मुख्य नाल्यातही गाळ व कचरापुलगाव शहरातून वाहणारा मुख्य नाला काही दिवसांपूर्वी साफ करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. असे असले तरी नाला अद्यापही गाळाने बुजून असल्याचे दिसून येते. हा नाला गांधीनगर भागात फुटलेल्या अवस्थेत आहे. शनिमंदिर परिसरात नाल्यामध्ये गाळ व कचरा साचला आहे. शिवाय नाचणगाव रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या भागात कचरा आणि गाळाचे साम्राज्य दिसते. शहरातील इतर नाल्यांचीही तिच स्थिती आहे. परिणामी, पावसाळ्यात नाला ओसंडून वाहणार असून नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका कायम आहे. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.