शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात होतेय नालेसफाई

By admin | Updated: June 16, 2017 01:19 IST

पावसाळ्यापूर्वी शहरातील मोठे नाले, नाल्या साफ करणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे आणि पावसाचे पाणी कुणाच्या घरात शिरणार नाही,

जिल्ह्यातील पालिकांचा प्रकार : वर्धेतही मजुरांकडून काढला जातोय गाळलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळ्यापूर्वी शहरातील मोठे नाले, नाल्या साफ करणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे आणि पावसाचे पाणी कुणाच्या घरात शिरणार नाही, याची दक्षता घेण्याचे नियोजन पालिका प्रशासनाला करावे लागते. जिल्ह्यातील बहुतांश नगर पंचायत, नगर पालिकांनी ते नियोजन केलेही; पण कामे मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर केली जात असल्याचे दिसते. परिणामी, नाल्यांचा उपसा करताना मजुरांनाच तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. वर्धा नगर परिषदेने शहरातील मोठे नाले, लोकवस्तीतील नाल्यांच्या सफाईचे नियोजन केले होते. यातून पावसाळ्यापूर्वी शहर स्वच्छ होणे गरजेचे होते; पण आज जून महिन्याची १५ तारीख आली असताना शहरातील नाले साफच झालेले नाहीत. सध्या गोंड प्लॉट परिसरातून वाहणाऱ्या मुख्य नाल्याची मजुरांकडून सफाई करून घेतली जात आहे. मुख्य मार्गावर असलेल्या पुलाखालून मजूर मागील दोन दिवसांपासून गाळ उपसण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात बुधवारी मजुरांना नाल्यात पुलाखाली साप आढळून आला. फावडे लागल्याने जखमी सापामुळे मजुरांचीही गाळाचा उपसा करण्याची हिंमत होत नव्हती. पावसाळा सुरू झाला असून पावसाचे तथा सांडपाणी या नाल्यातून दररोज वाहते. दरवर्षी हा नाला जेसीबीच्या माध्यमातून साफ केला जात होता तर पुलाखालील भाग मजुरांकडून साफ करून घेतला जात होता; पण यंदा जेसीबी दिसून आला नाही. मजुरांकडून नालेसफाईची कामे करून घेतली जात असल्याचे पाहावयास मिळाले. शहरातील अन्य नाल्यांची सफाई अद्याप शिल्लक आहे. मग, गल्ली-बोळातील नाल्यांची सफाई आणि कचरा निर्मूलन ही कामे कधी होणार, हा प्रश्नच आहे.पुलगाव शहरातील मुख्य नाल्यातही गाळ व कचरापुलगाव शहरातून वाहणारा मुख्य नाला काही दिवसांपूर्वी साफ करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. असे असले तरी नाला अद्यापही गाळाने बुजून असल्याचे दिसून येते. हा नाला गांधीनगर भागात फुटलेल्या अवस्थेत आहे. शनिमंदिर परिसरात नाल्यामध्ये गाळ व कचरा साचला आहे. शिवाय नाचणगाव रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या भागात कचरा आणि गाळाचे साम्राज्य दिसते. शहरातील इतर नाल्यांचीही तिच स्थिती आहे. परिणामी, पावसाळ्यात नाला ओसंडून वाहणार असून नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका कायम आहे. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.