शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

संकट काळात महाराष्ट्राने एकतेचे दर्शन घडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 00:04 IST

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यात आलेल्या महापूरात लोक संकटात सापडली असताना महाराष्ट्रातील जनता जातीभेद, धर्मभेद विसरुन महापूरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी धावून आली.

ठळक मुद्देसदाशिव खोत : स्वातंत्र्यदिनाचा वर्धापनदिन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यात आलेल्या महापूरात लोक संकटात सापडली असताना महाराष्ट्रातील जनता जातीभेद, धर्मभेद विसरुन महापूरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी धावून आली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सैन्य, नौदल आणि वायुसेनेच्या दलासोबतच सर्व जिल्ह्यातून मदतीचा ओघ सुरु आहे. संकटाच्या काळात महाराष्ट्राने एकतेचे दर्शन घडविले. असाच एकसंघपणा राज्याच्या विकासासाठी जनतेने दाखवावा, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाशिव खोत यांनी केले.भारतीय स्वातंत्र्याचा ७२ वा वर्धापनदिनाचा मुख्य शासकिय कार्यक्रम जिल्हा क्रिडा संकुल येथे पार पडला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर जिल्हाधिकारी संजय दैने, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, अतिरिक्त मुख्य कार्र्यकारी अधिकारी सत्यजित बढे, निवासी उपजिलहाधिकारी विजया बनकर आदींची उपस्थिती होती.यावेळी ना. खोत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त जनहित संस्थेचे अध्यक्ष सतीश बावसे व त्यांच्या चमूला तसेच प्रसन्न अविनाश बोधनकर यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परीक्षेत राष्ट्रीय, राज्यस्तरावर गुणवत्ता यादीत स्थान पटकावलेल्या विद्यार्थी अपूर्वा वनकर, शंतनू बारई व अमन खोडे, स्केटींग स्पर्धेत सुवर्ण पदक पटविलेले मैत्री ताकसांडे, तेजस बोरकर विद्यार्थ्यांचा व प्रशिक्षक विद्यापाल नाईक यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जनहित मंचच्यावतीने पुरग्रस्तासाठी २१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ना. सदाशिव खोत यांच्याकडे सुर्पुद करण्यात आला.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनministerमंत्री