शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 22:40 IST

सेवाग्राम येथे बहुप्रतीक्षित सेवाग्राम विकास आराखडा व सिंदी (रेल्वे) येथील ड्राय पोर्टच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित होता.

ठळक मुद्देसेलू येथील कापूस उत्पादकांची भर कार्यक्रमात निदर्शने

वर्धा : सेवाग्राम येथे बहुप्रतीक्षित सेवाग्राम विकास आराखडा व सिंदी (रेल्वे) येथील ड्राय पोर्टच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित होता. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर अतिथी म्हणून ना. नितीन गडकरी, ना. सुधीर मुनगंटीवार ना. मदन येरावार यांची उपस्थिती होती. कार्यक्रम ऐन मध्यावर असताना मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच शेतकºयांनी घोषणा देत निषेध नोंदविला. निषेध नोंदविणारे शेतकरी सेलू येथील असून त्यांनी कापसाचे फसलेल्या चुकºयांची मागणी केली.सिंदी (रेल्वे) बाजार समितीत असलेल्या श्रीकृष्ण जिनिंगचा मालक टालाटुले याने या भागातील शेतकºयांना गंडा घालून पळ काढला. या व्यापाºयाकडून रक्कम मिळण्याकरिता शेतकºयांनी वर्धेपासून दिल्लीपर्यंत आंदोलने केली. यात त्यांना चुकारे देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. शेतकºयांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने टालाटुलेच्या संपत्तीचा लिलाव करण्याचे आदेश दिले; मात्र वेळीच लिलावावर स्थगनादेश आला. यामुळे शेतकºयांना अद्यापही त्यांचे फसलेले चुकारे मिळाले नाही. यामुळे संतापलेल्या शेतकºयांनी या कार्यक्रमात येत आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्र्यांना आश्वासनाची आठवण देण्याकरिता त्यांचे भाषण सुरू होताच नारेबाजी केली. यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. यावरून नारेबाजी करणाºया शेतकºयांना पोलिसांनी पकडून सेवाग्राम पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले.सेवाग्रामच्या सरपंचाशी चर्चा टाळलीसेवाग्राम येथे बहुचर्चित सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत विकास कामे करण्यात येत आहे. या कामांत सेवाग्राम गावाचा कुठलाही विकास होणार नसल्याचा आरोप सेवाग्रामच्या सरपंच रोशणा जामलेकर यांनी केला. या संदर्भातच त्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याकरिता गेल्या असता त्यांना परत पाठविल्याचा आरोप त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.आयटक पदाधिकारी नजर कैदेतआयटक संलग्न अंगणवाडी कर्मचारी युनियन व आशा गट प्रवर्तक संघटनेचे दिलीप उटाणे, वंदना कोळणकर, संध्या म्हैसकर, विजया पावडे, मैना उईके, माला भगत यांना पकडून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात आयटक पदाधिकारी यांना नजर कैदेत ठेवण्यात आले होते.मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आटोपल्यावर त्यांच्याशी भेट करून देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते; पण तसे झाले नाही. यामुळे या कर्मचाºयांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करून शासनाचा निषेध नोंदविला.