शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

एमएसईबीच्या अभियंत्यांचे धरणे

By admin | Updated: January 6, 2017 01:21 IST

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी बोरगाव (मेघे) येथील महावितरणच्या कार्यालयासमोर

संबंधितांना निवेदन : मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन वर्धा : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी बोरगाव (मेघे) येथील महावितरणच्या कार्यालयासमोर सबॉर्डिनेट इंजिनिअर असोसिएशन (एमएसईबी) च्या नेतृत्त्वात विविध मागण्यांसाठी गुरुवारी धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन संबंध अधिकाऱ्यांना देण्यात आले असून मागण्यांचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. अभियंता विकास पानसरे यांच्या आत्महत्येस कारणीभूत अधीक्षक अभियंता सोलापूर व कार्यकारी अभियंता सोलापूर (ग्रा.) यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, तिन्ही कंपनीतील वर्क नॉर्म्स ठरविण्यात यावे, तिन्ही कंपनीतील अभियंत्यांच्या कामाचे तास ठरविण्यात यावे, माहिती संकलनाची यंत्रणा ठरविण्यात यावी, सभा घेण्याबाबतची नियमावली ठरविण्यात यावी, तिन्ही कंपनीमधील अभियंते व कर्मचाऱ्यांना लोकसेवकांचा दर्जा देण्यात यावा, अतिभारित उपविभाग व वितरण केंद्राचे विभाजन करण्यात यावे, प्रशासनाकडून अभियंत्यांवर होणारी एकतर्फी कार्यवाही करणे थांबवून सुदृढ वातावरणाची निर्मिती करण्यात यावी, बदली धोरणामध्ये सुधारणा व पारदर्शकता आणण्यात याव्या या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनकर्त्यांनी दिवसभर बोरगाव (मेघे) येथील महावितरणच्या कार्यालयासमोर धरणे देत संबंधीतांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या आंदोलनात एस.ई.ए.चे जयंत पैकीने, संजय पाटील, आकाश राजुरकर, सचिन सोनारकर, मंगेश ठाकरे, योगेश पांडे, अक्षय राजुरकर, प्रविण चांभारे, आलोक करंडे, हितेश मडापे, अतुल भैसारे, प्रथमेश बंगीनवार, भाऊसाहेब थुटे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी) सामूहिक रजेचा इशारा ४गुरूवारपासून बोरगाव (मेघे) येथील महावितरणच्या कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी अभियंत्यांनी आंदोलन सुरू केले आहे. संबंधितांना निवेदन देण्यात आले असून मागण्यांचा समानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास शुक्रवार ६ रोजी सर्व अभियंता सामूहिक रजेवर जाऊन शासनाच्या अधिकारी व कर्मचारी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविणार असल्याचे यावेळी आंदोलकांकडून सांगण्यात आले.