शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

एमएसईबीच्या अभियंत्यांचे धरणे

By admin | Updated: January 6, 2017 01:21 IST

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी बोरगाव (मेघे) येथील महावितरणच्या कार्यालयासमोर

संबंधितांना निवेदन : मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन वर्धा : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी बोरगाव (मेघे) येथील महावितरणच्या कार्यालयासमोर सबॉर्डिनेट इंजिनिअर असोसिएशन (एमएसईबी) च्या नेतृत्त्वात विविध मागण्यांसाठी गुरुवारी धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन संबंध अधिकाऱ्यांना देण्यात आले असून मागण्यांचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. अभियंता विकास पानसरे यांच्या आत्महत्येस कारणीभूत अधीक्षक अभियंता सोलापूर व कार्यकारी अभियंता सोलापूर (ग्रा.) यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, तिन्ही कंपनीतील वर्क नॉर्म्स ठरविण्यात यावे, तिन्ही कंपनीतील अभियंत्यांच्या कामाचे तास ठरविण्यात यावे, माहिती संकलनाची यंत्रणा ठरविण्यात यावी, सभा घेण्याबाबतची नियमावली ठरविण्यात यावी, तिन्ही कंपनीमधील अभियंते व कर्मचाऱ्यांना लोकसेवकांचा दर्जा देण्यात यावा, अतिभारित उपविभाग व वितरण केंद्राचे विभाजन करण्यात यावे, प्रशासनाकडून अभियंत्यांवर होणारी एकतर्फी कार्यवाही करणे थांबवून सुदृढ वातावरणाची निर्मिती करण्यात यावी, बदली धोरणामध्ये सुधारणा व पारदर्शकता आणण्यात याव्या या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनकर्त्यांनी दिवसभर बोरगाव (मेघे) येथील महावितरणच्या कार्यालयासमोर धरणे देत संबंधीतांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या आंदोलनात एस.ई.ए.चे जयंत पैकीने, संजय पाटील, आकाश राजुरकर, सचिन सोनारकर, मंगेश ठाकरे, योगेश पांडे, अक्षय राजुरकर, प्रविण चांभारे, आलोक करंडे, हितेश मडापे, अतुल भैसारे, प्रथमेश बंगीनवार, भाऊसाहेब थुटे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी) सामूहिक रजेचा इशारा ४गुरूवारपासून बोरगाव (मेघे) येथील महावितरणच्या कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी अभियंत्यांनी आंदोलन सुरू केले आहे. संबंधितांना निवेदन देण्यात आले असून मागण्यांचा समानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास शुक्रवार ६ रोजी सर्व अभियंता सामूहिक रजेवर जाऊन शासनाच्या अधिकारी व कर्मचारी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविणार असल्याचे यावेळी आंदोलकांकडून सांगण्यात आले.