शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

वर्धेकरांमुळे सामाजिक कार्याला दिशा मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:27 IST

१९७७ मध्ये लग्न होऊन वर्ध्यातील बंग परिवारात आली तेव्हा सामाजिक कार्याच्या काहीच गंध नव्हता.पण, वर्धेकरांनी मुलीप्रमाणे प्रेम देऊन सामाजिक कार्यासाठी दिशा दिली, विश्वास निर्माण केला. त्यातुच माझ्या आयुष्यातील सामाजिक कार्यालया सुरुवात झाली, असे मत ज्येष्ठ समाजसेविका तथा सर्चच्या संचालिका पद्मश्री राणी अभय बंग यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देराणी बंग : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार सोहळा

वर्धा : १९७७ मध्ये लग्न होऊन वर्ध्यातील बंग परिवारात आली तेव्हा सामाजिक कार्याच्या काहीच गंध नव्हता.पण, वर्धेकरांनी मुलीप्रमाणे प्रेम देऊन सामाजिक कार्यासाठी दिशा दिली, विश्वास निर्माण केला. त्यातुच माझ्या आयुष्यातील सामाजिक कार्यालया सुरुवात झाली, असे मत ज्येष्ठ समाजसेविका तथा सर्चच्या संचालिका पद्मश्री राणी अभय बंग यांनी व्यक्त केले.वर्धा सोशल फोरमच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार सोहळ्याच्या उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. अनेकांत स्वाध्याय मंदिर परिसरात सपन्न झालेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष डॉ. अभ्युदय मेघे तर प्रमुख पाहूणे म्हणून सेल येथील कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश नेहा मोहीत पंचारिया यांची उपस्थिती होती. यासोबतच सत्कारमूर्ती ज्येष्ठ गांधीवादी करुणा फुटाणे, हिंगणघाटच्या कवयित्री मंजिरी भोयर (कोठेवार), आरंभा अनाथालयाच्या संचालिका माधवी शिवाजी चौधरी व बोरी येथील मॉ दुर्गा दारुबंदी महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रमीला वाघाडे यांचीही मंचावर उपस्थिती होती. राणी बंग यांनी उपस्थितांसोबत संवाद साधताना आपल्या जीवानाचा प्रवास उलगडा केला. आयुष्य हे सदैव रेड कार्पेट नसते, कधी अपयशही पचवता आलं पाहिजे. कारण अपयशामुळे आपल्यासमोर येणाऱ्या संकटावर मात करण्याची क्षमता निर्माण होते, असेही त्यांनी सांगितले. तसेच केवळ कायद्यात बदल करुन चालणार नाही तर पालकांनी पालकत्व निभविताना आपल्या पाल्यांना सुसंस्कृत व निर्भय बनवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी पालकांना केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मेघे यांनी फोरमच्या आतापर्यंतच्या वाटचालीची माहिती देत मार्गदर्शनही केले. यावेळी राणी बंग यांचा स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सत्कारमूर्तींना बंग यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सत्कारमूर्तींनी मनोगतातून सर्व सुविधा मिळणे म्हणजे सक्षमिकरण नाही तर उद्याची सक्षम व सुसंस्कारीत पिढी घडविणे म्हणजेच सशक्तिक रण होय असा सूर आवळला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.शिल्पा सातव यांनी केले. सन्मान पत्राचे वाचन मनिषा मेघे यांनी केले तर आभार फोरचे सचिव अविनाश सातव यांनी मानले. कार्यक्रमाला वर्धेकरांसह सोशल फोरमचे पदाधिकारी उपस्थित होते.