शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अवेळी खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे तालुक्यात काळोख

By admin | Updated: June 22, 2015 01:54 IST

एक आठवड्यापासून शहरात सतत विजेचा लपंडाव होत असल्याने तालुका काळोखात गडप झाल्याचे चित्र आहे.

कारंजा (घा.) : एक आठवड्यापासून शहरात सतत विजेचा लपंडाव होत असल्याने तालुका काळोखात गडप झाल्याचे चित्र आहे. ३३ केव्हीचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने २४-२४ तास तालुका अंधारात असतो. वीज कंपनीचे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत असून कारवाईची मागणी होत आहे.तालुक्यातील नारा, सावळी, कारंजा, कन्नमवारग्राम, ठाणेगाव, जुनापाणी आदी फिडर अंतर्गत येत असलेला वीज पुरवठा ३३ केव्ही मुख्य लाईनमध्ये वारंवार बिघाड येतो. यामुळे तालुक्यातील वीज पुरवठा सतत खंडित होतो. चार-पाच तास विद्युत सुरळीत झाली की लगेच बे्रकडाऊन होते. यामुळे तालुक्यातील नागरिकांना मुसळधार पाऊस व काळोख यात खितपत राहावे लागते. दैनंदिन विजेच्या वापरावर असलेल्या कामांतही व्यत्यय निर्माण होत आहे. अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने कित्येक तास वीज खंडित राहते. याबाबत नागरिकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्यास उलट उत्तरे दिली जातात. मुकेश टुले या व्यक्तीस याचा अनुभव आला. ३३ केव्हीचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यास बे्रकडाऊनवर काम करणारे अभियंता व कर्मचाऱ्यांनी नेमका बिद्याड शोधणे गरजेचे असते; पण अभियंता व कर्मचारीही मुख्यालयी राहत नसल्याने एका तासाच्या कामासाठी रात्रभर वीज पुरवठा बंद असतो. यामुळे नागरिकांना काळोखात चाचपडावे लागते. शनिवारी रात्री ९ वाजता वीज पुरवठा खंडित झाला तो दुपारी १ वाजता सुरू झाला. अधिकारी जागेवर असते तर रात्री दोनच तासात वीज पुरवठा सुरळीत होऊ शकला असता; पण कुणीही नसल्याने तालुक्यातील नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले. हा प्रकार नित्याचाच झाला आहे. यात वीज कंपनीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे प्रमाणपत्र प्रकरणांची कामेही रखडल्याचे चित्र आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत तालुक्यातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)