शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

अवेळी खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे तालुक्यात काळोख

By admin | Updated: June 22, 2015 01:54 IST

एक आठवड्यापासून शहरात सतत विजेचा लपंडाव होत असल्याने तालुका काळोखात गडप झाल्याचे चित्र आहे.

कारंजा (घा.) : एक आठवड्यापासून शहरात सतत विजेचा लपंडाव होत असल्याने तालुका काळोखात गडप झाल्याचे चित्र आहे. ३३ केव्हीचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने २४-२४ तास तालुका अंधारात असतो. वीज कंपनीचे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत असून कारवाईची मागणी होत आहे.तालुक्यातील नारा, सावळी, कारंजा, कन्नमवारग्राम, ठाणेगाव, जुनापाणी आदी फिडर अंतर्गत येत असलेला वीज पुरवठा ३३ केव्ही मुख्य लाईनमध्ये वारंवार बिघाड येतो. यामुळे तालुक्यातील वीज पुरवठा सतत खंडित होतो. चार-पाच तास विद्युत सुरळीत झाली की लगेच बे्रकडाऊन होते. यामुळे तालुक्यातील नागरिकांना मुसळधार पाऊस व काळोख यात खितपत राहावे लागते. दैनंदिन विजेच्या वापरावर असलेल्या कामांतही व्यत्यय निर्माण होत आहे. अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने कित्येक तास वीज खंडित राहते. याबाबत नागरिकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्यास उलट उत्तरे दिली जातात. मुकेश टुले या व्यक्तीस याचा अनुभव आला. ३३ केव्हीचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यास बे्रकडाऊनवर काम करणारे अभियंता व कर्मचाऱ्यांनी नेमका बिद्याड शोधणे गरजेचे असते; पण अभियंता व कर्मचारीही मुख्यालयी राहत नसल्याने एका तासाच्या कामासाठी रात्रभर वीज पुरवठा बंद असतो. यामुळे नागरिकांना काळोखात चाचपडावे लागते. शनिवारी रात्री ९ वाजता वीज पुरवठा खंडित झाला तो दुपारी १ वाजता सुरू झाला. अधिकारी जागेवर असते तर रात्री दोनच तासात वीज पुरवठा सुरळीत होऊ शकला असता; पण कुणीही नसल्याने तालुक्यातील नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले. हा प्रकार नित्याचाच झाला आहे. यात वीज कंपनीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे प्रमाणपत्र प्रकरणांची कामेही रखडल्याचे चित्र आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत तालुक्यातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)