शहरं
Join us  
Trending Stories
1
हृदयद्रावक! मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
2
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
3
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
4
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
5
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
6
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
7
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
8
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
9
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
10
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
11
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
12
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
13
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
14
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
15
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
16
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
17
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
18
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
19
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
20
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग

अवेळी खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे तालुक्यात काळोख

By admin | Updated: June 22, 2015 01:54 IST

एक आठवड्यापासून शहरात सतत विजेचा लपंडाव होत असल्याने तालुका काळोखात गडप झाल्याचे चित्र आहे.

कारंजा (घा.) : एक आठवड्यापासून शहरात सतत विजेचा लपंडाव होत असल्याने तालुका काळोखात गडप झाल्याचे चित्र आहे. ३३ केव्हीचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने २४-२४ तास तालुका अंधारात असतो. वीज कंपनीचे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत असून कारवाईची मागणी होत आहे.तालुक्यातील नारा, सावळी, कारंजा, कन्नमवारग्राम, ठाणेगाव, जुनापाणी आदी फिडर अंतर्गत येत असलेला वीज पुरवठा ३३ केव्ही मुख्य लाईनमध्ये वारंवार बिघाड येतो. यामुळे तालुक्यातील वीज पुरवठा सतत खंडित होतो. चार-पाच तास विद्युत सुरळीत झाली की लगेच बे्रकडाऊन होते. यामुळे तालुक्यातील नागरिकांना मुसळधार पाऊस व काळोख यात खितपत राहावे लागते. दैनंदिन विजेच्या वापरावर असलेल्या कामांतही व्यत्यय निर्माण होत आहे. अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने कित्येक तास वीज खंडित राहते. याबाबत नागरिकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्यास उलट उत्तरे दिली जातात. मुकेश टुले या व्यक्तीस याचा अनुभव आला. ३३ केव्हीचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यास बे्रकडाऊनवर काम करणारे अभियंता व कर्मचाऱ्यांनी नेमका बिद्याड शोधणे गरजेचे असते; पण अभियंता व कर्मचारीही मुख्यालयी राहत नसल्याने एका तासाच्या कामासाठी रात्रभर वीज पुरवठा बंद असतो. यामुळे नागरिकांना काळोखात चाचपडावे लागते. शनिवारी रात्री ९ वाजता वीज पुरवठा खंडित झाला तो दुपारी १ वाजता सुरू झाला. अधिकारी जागेवर असते तर रात्री दोनच तासात वीज पुरवठा सुरळीत होऊ शकला असता; पण कुणीही नसल्याने तालुक्यातील नागरिकांना रात्रभर अंधारात राहावे लागले. हा प्रकार नित्याचाच झाला आहे. यात वीज कंपनीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे प्रमाणपत्र प्रकरणांची कामेही रखडल्याचे चित्र आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत तालुक्यातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)