शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

वाहतुकीच्या समस्येमुळे तुरीचे ढीग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 23:45 IST

ऑनलाईन लोकमतवर्धा : शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा याकरिता शासनाच्यावतीने जिल्ह्यात सात केंद्रांवर तुरीची खरेदी सुरू केली. मात्र हिंगणघाट व समुद्रपूर येथील केंद्रांवर खरेदी झालेली तूर गोदामात नेण्याकरिता वाहतूकदार नकार देत असल्याने तूर बाजार समितीतच पडून आहे. या तुरीची नाफेडकडे नोंद झाली नसल्याने या शेतकऱ्यांना त्यांचे चुकारे केव्हा मिळतील असा नवा ...

ठळक मुद्देहिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील प्रकार

ऑनलाईन लोकमतवर्धा : शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा याकरिता शासनाच्यावतीने जिल्ह्यात सात केंद्रांवर तुरीची खरेदी सुरू केली. मात्र हिंगणघाट व समुद्रपूर येथील केंद्रांवर खरेदी झालेली तूर गोदामात नेण्याकरिता वाहतूकदार नकार देत असल्याने तूर बाजार समितीतच पडून आहे. या तुरीची नाफेडकडे नोंद झाली नसल्याने या शेतकऱ्यांना त्यांचे चुकारे केव्हा मिळतील असा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.हिंगणघाट, समुद्रपूर येथील वाहतूकदारांनी जुन्या थकबाकीसाठी नवीन शेतमाल गोदामात पोहोचविणार नाही अशी भूमिका घेतली आहे. या संदर्भात जिल्हा मार्केटिंग अधिकारी व वाहतूकदार यांच्यात चर्चा झाली; मात्र चर्चेचे फलित झाले नाही. परिणामी शेतकऱ्यांची तूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डावर ढीग लावून तशीच पडून आहे. या तुरीची जोपर्यंत नाफेडच्या गोदामात आवक दाखविली जाणार नाही. तोपर्यंत तिच्या खरेदीवर शिक्कामोर्तब होणार नाही. यामुळे शेतकºयांचे चुकारे केव्हा होईल हे सांगणे सध्यातरी अवघड झाल्याचे दिसत आहे.चण्याच्या खरेदीचा मुहूर्त लवकरचशेतकºयांचा चणा बाजारात येणे सुरू झाले आहे. नित्याप्रमाणे शेतकºयांचा शेतमाल येताच त्याचे भाव पडण्याचा प्रकारही झाला. सध्या चण्याला व्यापाऱ्यांकडून ३५०० रूपयांच्या आसपास दर मिळत आहे. हा दर शासकीय दराच्या तुलनेत अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. यामुळे निदान हमी भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून आहे. ही अपेक्षापूर्ती होण्यासाठी नाफेडचे खरेदी केंद्र केव्हा सुरू होईल याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहे. खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात शासनाच्या सूचना आल्या असून येत्या. एक ते दोन दिवसात जिल्ह्यात चणा खरेदी सुरू होण्याची चिन्हे दिसत आहे.चणा खरेदीचा मुहूर्त साधण्याची तयाारी नाफेडच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. मात्र तुरीचे चुकारे थकल्याने चण्याच्या चुकाऱ्यांचा नवा प्रश्न पुन्हा सामोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे शासनाला चन्या द्यावा की व्यापाऱ्यांला या विवंचनेत सध्या शेतकरी असून तो व्यापाऱ्यांच्या जाळ्यात अडकण्याची दाट शक्यता आहे.