शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

वाहतुकीच्या समस्येमुळे तुरीचे ढीग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 23:45 IST

ऑनलाईन लोकमतवर्धा : शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा याकरिता शासनाच्यावतीने जिल्ह्यात सात केंद्रांवर तुरीची खरेदी सुरू केली. मात्र हिंगणघाट व समुद्रपूर येथील केंद्रांवर खरेदी झालेली तूर गोदामात नेण्याकरिता वाहतूकदार नकार देत असल्याने तूर बाजार समितीतच पडून आहे. या तुरीची नाफेडकडे नोंद झाली नसल्याने या शेतकऱ्यांना त्यांचे चुकारे केव्हा मिळतील असा नवा ...

ठळक मुद्देहिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील प्रकार

ऑनलाईन लोकमतवर्धा : शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा याकरिता शासनाच्यावतीने जिल्ह्यात सात केंद्रांवर तुरीची खरेदी सुरू केली. मात्र हिंगणघाट व समुद्रपूर येथील केंद्रांवर खरेदी झालेली तूर गोदामात नेण्याकरिता वाहतूकदार नकार देत असल्याने तूर बाजार समितीतच पडून आहे. या तुरीची नाफेडकडे नोंद झाली नसल्याने या शेतकऱ्यांना त्यांचे चुकारे केव्हा मिळतील असा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.हिंगणघाट, समुद्रपूर येथील वाहतूकदारांनी जुन्या थकबाकीसाठी नवीन शेतमाल गोदामात पोहोचविणार नाही अशी भूमिका घेतली आहे. या संदर्भात जिल्हा मार्केटिंग अधिकारी व वाहतूकदार यांच्यात चर्चा झाली; मात्र चर्चेचे फलित झाले नाही. परिणामी शेतकऱ्यांची तूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डावर ढीग लावून तशीच पडून आहे. या तुरीची जोपर्यंत नाफेडच्या गोदामात आवक दाखविली जाणार नाही. तोपर्यंत तिच्या खरेदीवर शिक्कामोर्तब होणार नाही. यामुळे शेतकºयांचे चुकारे केव्हा होईल हे सांगणे सध्यातरी अवघड झाल्याचे दिसत आहे.चण्याच्या खरेदीचा मुहूर्त लवकरचशेतकºयांचा चणा बाजारात येणे सुरू झाले आहे. नित्याप्रमाणे शेतकºयांचा शेतमाल येताच त्याचे भाव पडण्याचा प्रकारही झाला. सध्या चण्याला व्यापाऱ्यांकडून ३५०० रूपयांच्या आसपास दर मिळत आहे. हा दर शासकीय दराच्या तुलनेत अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. यामुळे निदान हमी भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून आहे. ही अपेक्षापूर्ती होण्यासाठी नाफेडचे खरेदी केंद्र केव्हा सुरू होईल याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहे. खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात शासनाच्या सूचना आल्या असून येत्या. एक ते दोन दिवसात जिल्ह्यात चणा खरेदी सुरू होण्याची चिन्हे दिसत आहे.चणा खरेदीचा मुहूर्त साधण्याची तयाारी नाफेडच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. मात्र तुरीचे चुकारे थकल्याने चण्याच्या चुकाऱ्यांचा नवा प्रश्न पुन्हा सामोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे शासनाला चन्या द्यावा की व्यापाऱ्यांला या विवंचनेत सध्या शेतकरी असून तो व्यापाऱ्यांच्या जाळ्यात अडकण्याची दाट शक्यता आहे.