शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
5
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
6
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
7
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
8
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
9
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
10
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
11
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
12
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
13
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
14
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
15
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
16
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
17
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
18
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
19
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
20
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?

वाहतुकीच्या समस्येमुळे तुरीचे ढीग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 23:45 IST

ऑनलाईन लोकमतवर्धा : शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा याकरिता शासनाच्यावतीने जिल्ह्यात सात केंद्रांवर तुरीची खरेदी सुरू केली. मात्र हिंगणघाट व समुद्रपूर येथील केंद्रांवर खरेदी झालेली तूर गोदामात नेण्याकरिता वाहतूकदार नकार देत असल्याने तूर बाजार समितीतच पडून आहे. या तुरीची नाफेडकडे नोंद झाली नसल्याने या शेतकऱ्यांना त्यांचे चुकारे केव्हा मिळतील असा नवा ...

ठळक मुद्देहिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील प्रकार

ऑनलाईन लोकमतवर्धा : शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा याकरिता शासनाच्यावतीने जिल्ह्यात सात केंद्रांवर तुरीची खरेदी सुरू केली. मात्र हिंगणघाट व समुद्रपूर येथील केंद्रांवर खरेदी झालेली तूर गोदामात नेण्याकरिता वाहतूकदार नकार देत असल्याने तूर बाजार समितीतच पडून आहे. या तुरीची नाफेडकडे नोंद झाली नसल्याने या शेतकऱ्यांना त्यांचे चुकारे केव्हा मिळतील असा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.हिंगणघाट, समुद्रपूर येथील वाहतूकदारांनी जुन्या थकबाकीसाठी नवीन शेतमाल गोदामात पोहोचविणार नाही अशी भूमिका घेतली आहे. या संदर्भात जिल्हा मार्केटिंग अधिकारी व वाहतूकदार यांच्यात चर्चा झाली; मात्र चर्चेचे फलित झाले नाही. परिणामी शेतकऱ्यांची तूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डावर ढीग लावून तशीच पडून आहे. या तुरीची जोपर्यंत नाफेडच्या गोदामात आवक दाखविली जाणार नाही. तोपर्यंत तिच्या खरेदीवर शिक्कामोर्तब होणार नाही. यामुळे शेतकºयांचे चुकारे केव्हा होईल हे सांगणे सध्यातरी अवघड झाल्याचे दिसत आहे.चण्याच्या खरेदीचा मुहूर्त लवकरचशेतकºयांचा चणा बाजारात येणे सुरू झाले आहे. नित्याप्रमाणे शेतकºयांचा शेतमाल येताच त्याचे भाव पडण्याचा प्रकारही झाला. सध्या चण्याला व्यापाऱ्यांकडून ३५०० रूपयांच्या आसपास दर मिळत आहे. हा दर शासकीय दराच्या तुलनेत अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. यामुळे निदान हमी भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून आहे. ही अपेक्षापूर्ती होण्यासाठी नाफेडचे खरेदी केंद्र केव्हा सुरू होईल याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहे. खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात शासनाच्या सूचना आल्या असून येत्या. एक ते दोन दिवसात जिल्ह्यात चणा खरेदी सुरू होण्याची चिन्हे दिसत आहे.चणा खरेदीचा मुहूर्त साधण्याची तयाारी नाफेडच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. मात्र तुरीचे चुकारे थकल्याने चण्याच्या चुकाऱ्यांचा नवा प्रश्न पुन्हा सामोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे शासनाला चन्या द्यावा की व्यापाऱ्यांला या विवंचनेत सध्या शेतकरी असून तो व्यापाऱ्यांच्या जाळ्यात अडकण्याची दाट शक्यता आहे.