शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

तांत्रिक त्रुट्यांमुळे कृषी विभागाचे बंधारे व शेततळे कुचकामी

By admin | Updated: October 7, 2014 23:38 IST

विदर्भातील शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठीच्या उद्दात्त हेतूने शासनाने कोट्यवधी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते़ त्यानुसार प्रथम प्राधान्य सिंचनासाठीच्या उपाययोजनांना दिले होते़ यामध्ये बंधारा

अमोल सोटे - वर्धाविदर्भातील शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठीच्या उद्दात्त हेतूने शासनाने कोट्यवधी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते़ त्यानुसार प्रथम प्राधान्य सिंचनासाठीच्या उपाययोजनांना दिले होते़ यामध्ये बंधारा बांधकाम आणि वैयक्तिक व सामूहिक शेततळे बांधण्यासाठी भरपूर तरतूद होती; मात्र योजना राबविताना तांत्रिकदृष्ट्या ज्ञान नसणाऱ्या कृषी विभागाने या योजनेची वाट लावल्याच्या प्रतिक्रीया उमटत आहे. आर्वी उपविभागात आष्टी तालुक्यामध्ये सन २००८-०९ पासून २०१३-१४ पर्यंत ३७२ बंधारे, २८४२ वैयक्तिक शेततळे, ४३५ सामूहिक शेततळे करण्यात आले़ आर्वी तालुक्यात ४०० बंधारे, ३९०० वैयक्तिक शेततळे, ६०० सामूहिक शेततळे, कारंजा (घाडगे) तालुक्यात ५४५ बंधारे, ३२०० वैयक्तिक शेततळे, ५३७ सामूहिक शेततळ्यांचे बांधकाम करण्यात आले़ बंधारा बांधकाम प्रत्येकी दोन लक्ष, वैयक्तिक शेततळे नऊ हजारांपासून ७० हजारांपर्यंत, सामूहिक शेततळ्यांकरिता एक लाखापासून सहा-सात लाखांपर्यंतची तरतूद शासनाने करून दिली होती़ यासाठी कुठल्याही तांत्रिक अभियंत्याची निवड केली नाही़ त्यामुळे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक यांच्या चमुने बांधकाम उरकविले. बांधकाम करताना जागेची निवड करताना नियमांना बगल देण्यात आली. एवढ्या बंधाऱ्यांपैकी आजआजघडीला आर्वी विभागात केवळ पाच-दहा बंधारे पाणी साठवून उभे आहे़ बाकीच्या बंधाऱ्याची अवस्था दयनीय झाली आहे़ शेततळे बांधकामासाठी व पाणलोटच्या कामासाठी नेमलेल्या एजंसीला कृषी सहायकांनी व्यवस्थित काम करू दिले नाही़ त्यामुळे थातूरमातूर कामे आटोपण्यात आली़कामाचे देयक काढताना कृषी सहायकांनी एजंसीमालकांना लालीपॉप देवून जास्त रेकॉर्ड करतो़ फक्त सेटींगचे पैसे बरोबर द्या, असा सल्ला दिला़ यामध्ये अनेक एजंसीमालक सामील झाले़ या साखळीमधून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावून कृषी सहायक, कृषी पर्यंवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी ही सबंध यंत्रणा ओल खावून खंबीर बनली. याचा पदार्फाश एका एजंसीमालकाने करून कृषी सहायक शेळके याला २० हजारांची लाच देताना पकडून दिले़ शेळके याने तीन मीटरचे शेततळे सहा मीटर रेकॉर्ड करून दीड लाखांची लाच मागितल्याचे यात समोर आले. अशी शेकडो प्रकरणे कृषी विभागाने सेटींग करून निस्तारल्याची चर्चा आहे. शेतकऱ्यांकरिता असलेल्या सिंचन सुविधांचे मात्र यात तीनतेरा वाजले आहे. यासाठी कृषी विभागाचे अधिकारी तथा कर्मचारी सर्वस्वी जबाबदार असल्याच्या प्रतिक्रीया उमटत आहेत. आर्वी उपविभागात झालेल्या सर्व कामांची तपासणी करण्याची मागणी शेतकरी करीत आहे़