शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

भंगार बसगाड्यांमुळे चालक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 21:59 IST

लक्झरी बसेस सुरू करून राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे. असे असले तरी भंगार बसेस मात्र रस्त्यावरून हटविल्या जात नसल्याचे पाहावयास मिळत आहे. परिणामी, अत्यल्प वेतनातील नोकरीही भंगार बसेसमुळे चालकांना नाईलाज म्हणून करावी लागत आहे.

ठळक मुद्देसाधारण बसेसचा लांब पल्ल्यासाठी वापर : अत्यल्प वेतनातील नोकरीचाही नाईलाज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लक्झरी बसेस सुरू करून राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे. असे असले तरी भंगार बसेस मात्र रस्त्यावरून हटविल्या जात नसल्याचे पाहावयास मिळत आहे. परिणामी, अत्यल्प वेतनातील नोकरीही भंगार बसेसमुळे चालकांना नाईलाज म्हणून करावी लागत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या संपाचा परिवहन महामंडळ व मंत्र्यांवर परिणाम न झाल्याने चालक, वाहक व कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या मानसिकतेत आहेत.राज्यातील शासकीय, निमशासकीय सेवांमध्ये सर्वात कमी वेतनाची नोकरी म्हणून राज्य परिवहन महामंडळाचे नाव समोर येत आहे. विशेषत: चालक आणि वाहक यांना तर अत्यल्प वेतनावर हेलपाटेच मारावे लागत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नको ती नोकरी, असे मत चालक, वाहकांचे आहे. असे असले तरी दुसरा पर्याय नसल्याने तथा शासकीय नियमानुसार अन्य सुविधा मिळत असल्याने कुटुंबाचा खर्च भागत नसताना कर्मचारी कार्यरत असल्याचे त्यांच्याच बोलण्यातून समोर येत आहे. राज्य परिवहन महामंडळाने शिवशाही या नवीन लक्झरी बसेस सुरू केल्या आहेत. असे असले तरी त्या बोटावर मोजण्याइतक्याच आहेत. या बसेससाठी महामंडळाने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला; पण भंगार बसेस रस्त्यावरून हटवून त्या जागी नवीन बसेस आणण्याकरिता कुठलेही प्रयत्न होत नाही.वर्धा जिल्ह्यात पाच आगार आहेत. यातील सर्वच आगारांमध्ये भंगार बसेसचा भरणा करण्यात आलेला आहे. पुलगाव आगारामध्ये ४५ बसेस आहेत. यातील बहुतांश बसेस आऊट डेटेड झालेल्या आहेत. यामुळे त्या लांब पल्ल्यावर नेताना चालकांना विचार करावा लागतो. असे असले तरी अधिकारी मात्र कुठलीही बस नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर आदी ठिकाणी पाठवित असल्याची कुजबूज ऐकावयास मिळते. पुलगाव ते नागपूर प्रवासी घेऊन जाणाºया बसेस ४० ते ५० किमी प्रती तास या गतीच्या वर सरकत नाहीत. परिणामी, चालकांना बस चालवावी की नाही, असा प्रश्न पडतो. शिवाय बसमध्ये बसल्यानंतर प्रत्येक टप्पर वेगवेगळे लावल्यागत आवाज होतो. यामुळे प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. रविवारी सकाळी १०.१५ वाजता पुलगाव येथून नागपूरकडे निघालेली बस ४० किमी प्रती तास या वेगाच्या वर धावत नव्हती. चालकाला महत् प्रयत्नांनी सदर बस वर्धा बसस्थानकापर्यंत आणावी लागली. बसची गती आणि आवाज पाहून नागपूरचे प्रवासी घ्यावे की नाही, असा प्रश्नही चालक व वाहकांना पडला होता. बस कुठे बंद तर पडणार नाही ना, अशी भीतीही त्यांना सतावत होती. यामुळे देवळी येथून प्रवाशांनीही दुसऱ्या बसने प्रवास करण्यालाच पसंती दिली.ग्रामीण भागात साधारण बस म्हणून चालावी, अशी गाडी नागपूर, अमरावती येथे पाठविली जात असल्याचा सूर बसस्थानकावरील चालक, वाहकांमध्ये उमटत होता. असे असले तरी नोकरी आहे, करावीच लागेल म्हणून चालक बसगाड्या चालवित असल्याचे प्रकर्षाने जाणवले. काही वर्षांपूर्वी लागलेल्या चालकांना केवळ १२ हजार ५०० ते १५ हजार रुपये वेतनावर नोकरी करावी लागत असल्याची त्यांच्याकडून सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी केलेल्या आंदोलनात महामंडळाला तीन महिन्यांचे ‘अल्टीमेटम’ देण्यात आले होते; पण त्याचा उपयोग झालेला नाही. यामुळे आता बेमुदत संप करणार असल्याची स्पष्टोक्ती काही चालकांकडून देण्यात आली आहे. या प्रकारामुळे पुन्हा प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार टाळण्यासाठी परिवहन महामंडळाने चालक, वाहक व कर्मचाºयांचे वेतन तथा भंगार बसेसमध्ये सुधारणा करणेच गरजेचे झाले आहे.‘दे धक्का’ बसेसमुळे अवैध प्रवासी वाहतूक जोमातवर्धा, पुलगाव, हिंगणघाट, तळेगाव आणि आर्वी या पाचही आगारांमध्ये बहुतांश भंगार बसेसचा भरणा करण्यात आलेला आहे. परिणामी, येथील बसेला कधी, कुठे धक्का मारावा लागेल, हे सांगणेच कठीण झाले आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या यशवंती बसेस तर बेभरवशाच्याच झाल्या आहेत. मागील दहा दिवसांत धक्का माराव्या लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. वर्धा आगारातून माळेगाव (ठेका) जाणारी तथा पुलगाव आगाराच्या आर्वी मार्गावर चालणाऱ्या अनेक बसेस धक्कामार आहेत. यामुळे चालक व वाहकही त्रस्त आहेत. परिणामी, हे प्रवासी अवैध प्रवासी वाहतुकीकडे वळताना दिसतात.