शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यालगतच्या विहिरी ठरताहेत अपघातास कारण

By admin | Updated: January 2, 2017 00:12 IST

रस्त्याच्या लगत असलेल्या विहिरी अत्यंत धोकादायक ठरतात. रस्त्यांचे बांधकाम करीत असताना सदर विहिरींचा बंदोबस्त करणे गरजेचे असते;

संबंधित विभागाचे दुर्लक्ष : विहिरीला लोखंडी कठडे लावून सुरक्षित करण्याची मागणी चिकणी (जामणी) : रस्त्याच्या लगत असलेल्या विहिरी अत्यंत धोकादायक ठरतात. रस्त्यांचे बांधकाम करीत असताना सदर विहिरींचा बंदोबस्त करणे गरजेचे असते; पण त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसते. यामुळे अपघाताचा धोका बळावला आहे. चिकणी गावालगत असलेल्या शेतातील विहिरही धोकादायक ठरत आहे. याबाबत संबंधित विभागाला सूचना देऊनही कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे ही विहीर अपघातास कारण ठरत आहे. येथील बसस्थानकाच्या समोरून व गावाच्या मध्यभागातून वर्धा मार्ग आहे. हा मार्ग पडेगाव, सालोड, सावंगी (मेघे) मार्गे वर्धा असा गेला आहे. यामुळे चिकणी व जामणी या दोन्ही गावांची वर्दळ याच रस्त्याने असते. विशेष म्हणजे, सावंगी (मेघे) येथे रुग्णालय असल्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ राहते. पडेगाव येथून देवळीला शिक्षण घेण्याकरिता व ग्रामस्थांची बाजारपेठ असल्याने त्यांचीही ये-जा असते. या रस्त्याचे खडीकरण २० वर्षांपूर्वी तर डांबरीकरण ५ ते ६ वर्षांपूर्वी झाले; पण अद्यापही या रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीला लोखंडी कठडे लावण्यात आले नाही. सदर विहीर मोठी आहे. यात मोठे वाहन ट्रक, बस कोसळू शकते. चिकणी गावाला लागून मनोज देशमुख यांचे शेत आहे. या शेतात पूर्वीपासूनच एक विहीर आहे. ही विहीर चिकणी-वर्धा मार्गालगत अवघ्या दोन फुट अंतरावर आहे. यामुळे कधीही अपघात होऊ शकतो. विहिरीच्या सभोवताल कुंपण असून गवत व कचरा वाढला आहे. यामुळे ही विहीर दिसत नसल्याने अपघात होऊ शकतो. यामुळे ग्रामस्थांमध्ये धास्ती पसरली आहे. प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना समज देत विहिरीच्या बंदोबस्ताची उपाययोजना करावी. विहिरीला लोखंडी कठडे लावावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.(वार्ताहर) खडीकरणामुळे विहीर झाली रस्त्याला समांतर चिकणी येथील शेतकरी देशमुख यांच्या गावालगतच्या शेतात मोठी विहीर आहे. ही विहीर वडिलोपार्जित असून तिला तोंडी बांधलेली आहे. असे असले तरी रस्त्याचे बांधकाम नंतर झाले. यात खडीकरण करण्यात आल्याने विहीर आणि रस्ता समांतर झाला आहे. परिणामी, या विहिरीत पडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुरक्षेसाठी एकतर रस्ता व विहिरीच्या मधे लोखंडी कठडे बसवावे वा विहिरीची तोंडी आणखी उंच करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.