शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यालगतच्या विहिरी ठरताहेत अपघातास कारण

By admin | Updated: January 2, 2017 00:12 IST

रस्त्याच्या लगत असलेल्या विहिरी अत्यंत धोकादायक ठरतात. रस्त्यांचे बांधकाम करीत असताना सदर विहिरींचा बंदोबस्त करणे गरजेचे असते;

संबंधित विभागाचे दुर्लक्ष : विहिरीला लोखंडी कठडे लावून सुरक्षित करण्याची मागणी चिकणी (जामणी) : रस्त्याच्या लगत असलेल्या विहिरी अत्यंत धोकादायक ठरतात. रस्त्यांचे बांधकाम करीत असताना सदर विहिरींचा बंदोबस्त करणे गरजेचे असते; पण त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसते. यामुळे अपघाताचा धोका बळावला आहे. चिकणी गावालगत असलेल्या शेतातील विहिरही धोकादायक ठरत आहे. याबाबत संबंधित विभागाला सूचना देऊनही कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे ही विहीर अपघातास कारण ठरत आहे. येथील बसस्थानकाच्या समोरून व गावाच्या मध्यभागातून वर्धा मार्ग आहे. हा मार्ग पडेगाव, सालोड, सावंगी (मेघे) मार्गे वर्धा असा गेला आहे. यामुळे चिकणी व जामणी या दोन्ही गावांची वर्दळ याच रस्त्याने असते. विशेष म्हणजे, सावंगी (मेघे) येथे रुग्णालय असल्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ राहते. पडेगाव येथून देवळीला शिक्षण घेण्याकरिता व ग्रामस्थांची बाजारपेठ असल्याने त्यांचीही ये-जा असते. या रस्त्याचे खडीकरण २० वर्षांपूर्वी तर डांबरीकरण ५ ते ६ वर्षांपूर्वी झाले; पण अद्यापही या रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीला लोखंडी कठडे लावण्यात आले नाही. सदर विहीर मोठी आहे. यात मोठे वाहन ट्रक, बस कोसळू शकते. चिकणी गावाला लागून मनोज देशमुख यांचे शेत आहे. या शेतात पूर्वीपासूनच एक विहीर आहे. ही विहीर चिकणी-वर्धा मार्गालगत अवघ्या दोन फुट अंतरावर आहे. यामुळे कधीही अपघात होऊ शकतो. विहिरीच्या सभोवताल कुंपण असून गवत व कचरा वाढला आहे. यामुळे ही विहीर दिसत नसल्याने अपघात होऊ शकतो. यामुळे ग्रामस्थांमध्ये धास्ती पसरली आहे. प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना समज देत विहिरीच्या बंदोबस्ताची उपाययोजना करावी. विहिरीला लोखंडी कठडे लावावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.(वार्ताहर) खडीकरणामुळे विहीर झाली रस्त्याला समांतर चिकणी येथील शेतकरी देशमुख यांच्या गावालगतच्या शेतात मोठी विहीर आहे. ही विहीर वडिलोपार्जित असून तिला तोंडी बांधलेली आहे. असे असले तरी रस्त्याचे बांधकाम नंतर झाले. यात खडीकरण करण्यात आल्याने विहीर आणि रस्ता समांतर झाला आहे. परिणामी, या विहिरीत पडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुरक्षेसाठी एकतर रस्ता व विहिरीच्या मधे लोखंडी कठडे बसवावे वा विहिरीची तोंडी आणखी उंच करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.